शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

१५ व्या वित्त आयोगाच्या निधी खर्चासाठी पीएफएमएस व डीएससी प्रणाली अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:24 IST

लाखांदूर : शासनाच्या १५ व्या वित्त आयोगअंतर्गत २०२०-२१ वर्षात लाखांदूर पंचायत समितीतील एकूण ६२ ग्रामपंचायतींसाठी ४ कोटी १६ लाख ...

लाखांदूर : शासनाच्या १५ व्या वित्त आयोगअंतर्गत २०२०-२१ वर्षात लाखांदूर पंचायत समितीतील एकूण ६२ ग्रामपंचायतींसाठी ४ कोटी १६ लाख ८८ हजार ४१६ रुपयांचे अनुदान उपलब्ध केले आहे. यंदाच्यावर्षी ६२ ग्रामपंचायतींसाठी ३ कोटी ३१ लाख ६९ हजार ५५५ रुपयांची राशी उपलब्ध केली. दोन वित्तीय वर्षात मिळून तालुक्यातील एकूण ६२ ग्रामपंचायतींना विविध कामांसाठी १५ व्या वित्त आयोगांतर्गत दरवर्षी दोन हप्त्याअंतर्गत तब्बल ७ कोटी ४८ लाख ५७ हजार ९७१ रुपयांचे अनुदान उपलब्ध केले गेले आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाद्वारा या अनुदानअंतर्गत विविध बंधित तथा अबंधित कामे करण्यासाठी शासन निर्देशानुसार पीएफएमएस व डीएससी प्रणाली विकसित न करण्यात आल्याने ही प्रणालीच अडसर ठरत आहे.

तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीअंतर्गत दोन्ही वर्षाचे अनुदान राशी अखर्चित आहे. शासनाच्या १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत ग्रामपंचायतीला प्राप्त अनुदान राशीमधून बंधित तथा अबंधित अशी दोनप्रकारची कामे करावयाची आहेत. अबंधित कामांतर्गत आरोग्य, शिक्षण, महिला व बाल विकाससह अन्य कामे केली जात आहेत, तर बंधित कामाअंतर्गत वीज, पाणीपुरवठा व स्वच्छता विषयक कामे केली जात आहेत. शासनाच्या जिल्हा परिषदेद्वारा अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत क्षेत्रातील पथदिव्यांच्या वीज बिलाचा भरणा केला जात होता. मात्र वर्षभरापासून तालुक्यातील एकूण ६२ ग्रामपंचायतींअंतर्गत पथदिव्यांच्या वीज बिलाचा भरणा न करण्यात आल्याने तालुक्यातील संपूर्ण ६२ ग्रामपंचायतअंतर्गत १०६.१३ लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे, तर शासनाच्या विविध पाणी पुरवठा योजनेअंतर्गत तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतीअंतर्गत २२.९० लाख रुपयांचे वीजबिल थकीत असल्याची माहिती देण्यात आली आहे. लाखांदूर तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात असलेल्या पथदिव्यांच्या वीजबिलाचा गत वर्षभरापासून भरणा न करण्यात आल्याने तालुक्यातील २३ गावांतील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. या २३ गावाअंतर्गत २३.४७ लाख रुपयांचे पथदिव्यांचे वीजबिल थकीत असल्याची माहिती आहे. शासनाच्या विविध पाणीपुरवठा योजनेअंतर्गत वर्षभरापासून पाणी कराचा भरणा न करण्यात आल्याने तालुक्यातील तब्बल १३ ग्रामपंचायतींचे पाणी पुरवठा योजनेचे वीजबिल खंडित करण्यात आल्याची माहिती आहे. राज्य शासनाद्वारा २३ जूनरोजी शासनाच्या १५ व्या वित्त आयो अंतर्गत पथदिवे तथा पाणी पुरवठा योजनेचे थकीत वीज बिलाचा भरणा करण्याची अनुमती देण्यात आल्याने राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना दिलासा मिळाला आहे. त्यानुसार वीज कंपनीअंतर्गत करण्यात येणाऱ्या कारवाईपासून नागरिकांना सूट मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

बॉक्स

शासनाच्या अनुदानातून देयकाचा होणारा भरणा शासनाच्या जिल्हा परिषदद्वारा गत काही वर्षांपासून पथदिव्यांचे वीजबिल तथा स्थानिक ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांनी पाणीपुरवठा योजनेचे पाणी कराचा भरणा न करण्यात आल्याने वीजबिलाचा भरणा करण्यात आला नाही. या स्थितीत तालुक्यातील विविध ग्रामपंचायत क्षेत्रातील पथदिवे व पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केला गेल्याने तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच व अन्य पदाधिकारी संघटनांद्वारे शासनाला वीज बिलाचा भरणा करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत जारी केलेल्या निर्देशानुसार ग्रामपंचायत प्रशासनाला केंद्र शासनाच्या १५ व्या वित्त आयोगांतर्गत प्राप्त अनुदान राशीमधून पथदिवे व पाणी पुरवठा योजनेचे थकित बिलाचा भरणा करण्याची परवानगी देण्यात आली आहे.