शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

जिल्ह्यात १५ नवीन शिवभोजन केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:27 IST

भंडारा : कोरोना संचारबंदीच्या काळात हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. दोन वेळच्या जेवणाचाही प्रश्न निर्माण झाला ...

भंडारा : कोरोना संचारबंदीच्या काळात हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. दोन वेळच्या जेवणाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत शासनाने शिवभोजन योजनेतून निशुल्क थाळी देण्याचा निर्णय घेतला. आता पुन्हा राज्यात नवीन ३८ शिवभोजन केंद्राला मंजुरी देण्यात आली. त्यातील सर्वाधिक १५ केंद्र भंडारा जिल्ह्याला मिळाले. राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नामुळे गरजूंना १५०० अतिरिक्त शिवभोजन थाळ्यांचा लाभ मिळणार आहे.

राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने भंडारा जिल्ह्यासाठी १५ नवीन शिवभोजन केंद्रांना मान्यता दिली. जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी शासनाच्या १ जानेवारी २०२०च्या शासन निर्णय निकषाची पूर्तता करीत खात्री करूनच नवीन शिवभोजन केंद्र सुरू करण्यास मान्यता प्रदान केली.

जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रामध्ये पवनी शहरात कुणाल भोगे, अड्याळ येथे राहुल साम्रुतवार यांच्या शिवभोजन केंद्राला मान्यता देण्यात आली. लाखांदूर तालुक्यात भारतीय युवा बहुउद्देशीय संस्था बारव्हा तसेच मासळ या दोन ठिकाणी तर दीक्षा महिला बहुउद्देशीय संस्थेला लाखांदूर येथे मान्यता देण्यात आली. तुमसर तालुक्यात महिला बचत गट सरदार नगर आणि लुंबिनी महिला बचत गट मालवीय नगर, साकोली तालुक्यात दिशा महिला बहुउद्देशीय संस्थेला साकोली बसस्थानक तर आयुष संस्थेला एकोडी फाटा साकोली येथे मान्यता देण्यात आली. लाखनी तालुक्यात लाखनी येथे विजय चाचेरे, पोहरा येथे रोहित साखरे तर भंडारा तालुक्यात मोतीराम बहुउद्देशीय संस्थेचे राहुल निर्वाण, नवयुवक बहुउद्देशीय संस्था असे दोन शिवभोजन केंद्र असणार आहेत. मोहाडी तालुक्यात विजय पारधी यांचे मोहाडी शहरात व आंधळगाव येथे अनिल कोहाडे यांचे शिवभोजन केंद्र राहणार आहे.

खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नामुळे १५ केंद्र मंजूर झाले असून प्रत्येक केंद्रात १०० थाळ्यांची मान्यता असून यामुळे जिल्ह्यात १५०० अतिरिक्त शिवभोजन थाळ्या उपलब्ध होणार आहेत.