शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

१४१ विहिरींचे काम अर्धवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 22:23 IST

गोंदिया जिल्ह्यासाठी एकूण दोन हजार विहिरी मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यापैकी २५० विहिरी सालेकसा तालुक्याला देण्यात आल्या. मात्र तालुक्यात एकूण २५० पैकी १४१ विहीरींचे काम अद्यापही अपूर्ण असल्याची माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देतालुक्यात २५० मंजूर : ४३ टक्के विहिरींचे काम पूर्ण

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : गोंदिया जिल्ह्यासाठी एकूण दोन हजार विहिरी मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यापैकी २५० विहिरी सालेकसा तालुक्याला देण्यात आल्या. मात्र तालुक्यात एकूण २५० पैकी १४१ विहीरींचे काम अद्यापही अपूर्ण असल्याची माहिती समोर आली आहे.महाराष्टÑ शासनाच्या मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत गोंदिया जिल्ह्यासह पूर्वी विदर्भात मागेल त्याला विहीर योजना राबविण्यात आली. या योजनेंतर्गत पूर्वी विदर्भात एकूण ११ हजार सिंचन विहिरींचा धडक कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. या मोहिमेची सुरुवात डिसेंबर २०१६ मध्ये झाली असून दीड वर्ष लोटूनही निम्यापेक्षा जास्त विहिरींचे काम अर्धवट आहे. येत्या खरीप हंगामापूर्वी सर्व विहिरींचे काम पूर्ण होण्याचा दावा संंबंधित विभाग करीत असला तरी ज्या वेगाने काम चालत आहे त्यानुसार सर्व विहिरी यंदा पूर्ण होतील की नाही, याबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.जिल्हा परिषद लघू पाटबंधारे विभागातर्फे सदर सिंचन विहिरींचे काम हाती घेण्यात आले आहे. मागील खरीप हंगामापूर्वी काही मोजक्या विहिरींचे काम पूर्ण झाले होते. बाकीच्या विहिरींचे काम यंदा सुरु करण्यात आले आहेत. २५० पैकी आतापर्यंत फक्त १०९ विहिरीचे काम पूर्ण झाले आहे. तर १४१ विहिरींचे काम सुरू असून त्यापैकी २४ विहिरींचे काम ९० टक्क्यांवर पोहोचले आहे.एकूण २५० विहिरींच्या कामाची देखरेख तीन अभियंत्यांकडे आहे. शाखा अभियंता यु.एम. इसळ यांच्याकडे १३४, एस.एम. मेश्राम ४६ आणि डी.एम. गायधने यांच्याकडे ६९ विहिरींचे काम देण्यात आले आहे. यापैकी इसळ यांच्याकडील ६५, मेश्राम यांच्याकडील २० विहिरी आणि गायधने यांच्याकडील २४ विहिरींचे काम पूर्ण झाले आहे.यात १०४ विहिरींमध्ये बोअरवेल खोदण्यात आले असून अशा १०३ विहिरींमध्ये पुरेसा पाणी लागलेला आहे. ज्या १४१ विहिरींचे काम होणे बाकी आहे, त्यात २५ टक्के काम पूर्ण झालेल्या २४ विहिरी, ५० टक्के काम पूर्ण झालेल्या ६४ विहिरी, ७५ टक्के काम पूर्ण झालेल्या ३२ विहिरी आणि ९० टक्के काम पूर्ण झालेल्या एकूण २४ विहिरी आहेत. शाखा अभियंता यु.एम. इसळ यांच्या देखरेखीतील १३४ पैकी ६५ विहिरींचे काम पूर्ण झाले. ७४ विहिरींचे काम अपूर्ण आहे. एस.एम. मेश्राम यांच्याकडील ४६ विहिरींपैकी २० विहिरी पूर्ण झाल्या असून २७ विहिरींचे बांधकाम अपूर्ण आहे. तर डी.एम. गायधने यांच्याकडील ६९ विहिरींपैकी २४ विहिरींचे काम पूर्ण झाले असून ४५ विहिरींचे बांधकाम अपूर्ण आहे.एकूण सहा कोटींचा खर्चसालेकसा तालुक्याला जिल्ह्यातील दोन हजार मंजूर विहिरींपैकी २५० विहिरी मंजूर करण्यात आल्या. यासाठी एकूण सहा कोटी २५ हजारांचा निधी आवश्यक आहे. परंतु आतापर्यंत तीन कोटी ७७ लाख ५० हजार रुपये एवढा निधी तालुक्याला प्राप्त झाला आहे. त्यापैकी तीन कोटी ७७ लाख १० हजार रुपये विहिरींच्या लाभार्थ्यांना टप्याटप्याने देण्यात आले. आतापर्यंत एकूण २१९ लाभार्थ्यांना निधी वाटप करण्यात आला. फक्त ४० हजारांचा निधी शिल्लक आहे. उर्वरित निधी लवकर मिळावा व लाभार्थ्यांच्या विहिरींचे काम वेळेवर पूर्ण होऊन त्याचा शेतकऱ्यांना लाभ मिळावा, अशी मागणी आहे.शेकडो शेतकरी प्रतीक्षा यादीतमागेल त्याला विहीर योजनेंतर्गत शेतकºयांना सिंचनाची सोय म्हणून शासनाने बोअरवेलसह विहीर बनविण्याचे अनुदान शंभर टक्के देण्याची योजना राबविली. यानुसार सालेकसा तालुक्यात जवळपास ४०० च्या वर शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज केले होते. तर काही इच्छुक शेतकरी विहीत वेळेत अर्ज करायला मुकले. परंतु शासनाने तालुक्याला फक्त २५० विहिरीच मंजूर केल्यामुळे शेकडोंच्या संख्येने शेतकरी प्रतीक्षा यादीत आहेत. तर तालुक्याला विहिरींचा कोटा वाढविण्यात यावा व गरजू आणि वरथेंबी पावसावर अवलंबित शेतकºयांना विहीर बोअरवेलचा लाभ मिळावा, अशी मागणी सर्वसामान्य शेतकरीवर्ग करीत आहे.