शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

१३५ दिवसांचे धानाचे वाण ९० दिवसांत निसवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 23:43 IST

पावसाळ्यात जड धान लागवड करून अधिक उत्पन्न घेण्यासाठी लाखांदूर व पिंपळगाव येथील शेतकºयांनी पाटरू सिड्स कंपनीचे ४४४४ हे भात वाण विकत घेऊन लागवड केली.

ठळक मुद्देकृषी अधिकाºयांकडे शेतकºयांची तक्रार : १०० ते १५० एकर शेतीमधील धानपीक धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : पावसाळ्यात जड धान लागवड करून अधिक उत्पन्न घेण्यासाठी लाखांदूर व पिंपळगाव येथील शेतकºयांनी पाटरू सिड्स कंपनीचे ४४४४ हे भात वाण विकत घेऊन लागवड केली. मात्र सदर धानाचे वाण ८५ ते ९० दिवसात निसवल्यामुळे शेतकºयांवर संकट ओढवले असून मळणी करण्यासाठी कसरत करून तुटपुंजा धान घरी आणण्याची वेळ आली आहे.लाखांदूर तालुका हा चौरास भाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या भागातील शेती दोन भात पिक व रब्बी पिक घेत असतात. अशातच पावसाचे दिवस असल्याने पाणी साचून राहत असलेल्या शेतामध्ये १३० ते १३५ दिवस मळणीला येत असलेला व धानाचे वाणाची पेरणी करतात. अशातच लाखांदूर व पिंपळगाव येथील शेतकºयांनी कृषी केंद्रामार्फत पाटरू सिड्स कंपनीचे १३० ते १३५ दिवसात मळणीसाठी तयार होत असणारे ४४४४ हे धानाचे वाण असून एका लोंबमध्ये ३०० ते ४०० धान होते तर एकरी उत्पादन २२ ते २७ क्विंटल होत असल्याचे माहिती पत्रकातून कंपनीने सांगितले यावरून सदर शेतकºयांनी या वाणाची लागवड केली. मात्र लागवडीपासून ८५ ते ९० दिवसात धानाचा निसवा झाला तर काही दिवसात मळणीला येत आहे.आपण जड धान लावल्यानंतर एवढ्या कमी दिवसात धानाचा निसवा कसा झाला म्हणून तालुका कृषी अधिकारी व कृषी केंद्राला माहिती दिली. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी यांनी उपविभागीय कृषी अधिकारी एम.झेड. खान, कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रम समन्वय डॉ.उषा डोंगरवार, पीक संरक्षण अधिकारी डॉ.निलेश वझीरे, कृषी अधिकारी निलेश गेडाम, कृषी विस्तार अधिकारी संजय लांजेवार यांनी विजय शाहू, आसाराम चांदेवार, देवराम परशुरामकर, राहुल कोटरंगे, मनोहर खरकाटे यांच्या शेताची पाहणी करून हे वाण ८५ ते १० दिवसात निसवल्याने शेतकºयांचे उत्पादनात काही प्रमाणात घट येईल असे सांगून आम्ही सर्वेक्षण करून तो अहवाल संबंधित कंपनीला पाठवू व असे उपविभागीय कृषी अधिकाºयांनी सांगितले. तालुका कृषी अधिकारी गेडाम यांनी तज्ज्ञ अधिकाºयांकडून सर्वेक्षण करून किती नुकसान झाले आणि नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले. पाटरू सिड्सचे क्षेत्र अधिकारी अविनाश शेंडे म्हणाले, ही समस्या उष्णतेच्या कारणामुळे आली असून कमी दिवसात धान निसवला असेल असे सांगितले. शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम अधिकारी करीत असतील तर कृषी विभागाने दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.