शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

१३५ दिवसांचे धानाचे वाण ९० दिवसांत निसवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 23:43 IST

पावसाळ्यात जड धान लागवड करून अधिक उत्पन्न घेण्यासाठी लाखांदूर व पिंपळगाव येथील शेतकºयांनी पाटरू सिड्स कंपनीचे ४४४४ हे भात वाण विकत घेऊन लागवड केली.

ठळक मुद्देकृषी अधिकाºयांकडे शेतकºयांची तक्रार : १०० ते १५० एकर शेतीमधील धानपीक धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : पावसाळ्यात जड धान लागवड करून अधिक उत्पन्न घेण्यासाठी लाखांदूर व पिंपळगाव येथील शेतकºयांनी पाटरू सिड्स कंपनीचे ४४४४ हे भात वाण विकत घेऊन लागवड केली. मात्र सदर धानाचे वाण ८५ ते ९० दिवसात निसवल्यामुळे शेतकºयांवर संकट ओढवले असून मळणी करण्यासाठी कसरत करून तुटपुंजा धान घरी आणण्याची वेळ आली आहे.लाखांदूर तालुका हा चौरास भाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या भागातील शेती दोन भात पिक व रब्बी पिक घेत असतात. अशातच पावसाचे दिवस असल्याने पाणी साचून राहत असलेल्या शेतामध्ये १३० ते १३५ दिवस मळणीला येत असलेला व धानाचे वाणाची पेरणी करतात. अशातच लाखांदूर व पिंपळगाव येथील शेतकºयांनी कृषी केंद्रामार्फत पाटरू सिड्स कंपनीचे १३० ते १३५ दिवसात मळणीसाठी तयार होत असणारे ४४४४ हे धानाचे वाण असून एका लोंबमध्ये ३०० ते ४०० धान होते तर एकरी उत्पादन २२ ते २७ क्विंटल होत असल्याचे माहिती पत्रकातून कंपनीने सांगितले यावरून सदर शेतकºयांनी या वाणाची लागवड केली. मात्र लागवडीपासून ८५ ते ९० दिवसात धानाचा निसवा झाला तर काही दिवसात मळणीला येत आहे.आपण जड धान लावल्यानंतर एवढ्या कमी दिवसात धानाचा निसवा कसा झाला म्हणून तालुका कृषी अधिकारी व कृषी केंद्राला माहिती दिली. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी यांनी उपविभागीय कृषी अधिकारी एम.झेड. खान, कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रम समन्वय डॉ.उषा डोंगरवार, पीक संरक्षण अधिकारी डॉ.निलेश वझीरे, कृषी अधिकारी निलेश गेडाम, कृषी विस्तार अधिकारी संजय लांजेवार यांनी विजय शाहू, आसाराम चांदेवार, देवराम परशुरामकर, राहुल कोटरंगे, मनोहर खरकाटे यांच्या शेताची पाहणी करून हे वाण ८५ ते १० दिवसात निसवल्याने शेतकºयांचे उत्पादनात काही प्रमाणात घट येईल असे सांगून आम्ही सर्वेक्षण करून तो अहवाल संबंधित कंपनीला पाठवू व असे उपविभागीय कृषी अधिकाºयांनी सांगितले. तालुका कृषी अधिकारी गेडाम यांनी तज्ज्ञ अधिकाºयांकडून सर्वेक्षण करून किती नुकसान झाले आणि नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले. पाटरू सिड्सचे क्षेत्र अधिकारी अविनाश शेंडे म्हणाले, ही समस्या उष्णतेच्या कारणामुळे आली असून कमी दिवसात धान निसवला असेल असे सांगितले. शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम अधिकारी करीत असतील तर कृषी विभागाने दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.