शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

१.२८ लाख लोकांची अग्निसुरक्षा रामभरोसे

By admin | Updated: December 22, 2014 22:42 IST

प्रशासकीय कामाकाजातील सर्वाेच्च स्थान असलेल्या मंत्रालयाला आग लागल्यानंतर सर्वच तालुकास्तरीय ग्रामपंचायतीला अग्निशामक वाहनाची सोय करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते.

साकोली : प्रशासकीय कामाकाजातील सर्वाेच्च स्थान असलेल्या मंत्रालयाला आग लागल्यानंतर सर्वच तालुकास्तरीय ग्रामपंचायतीला अग्निशामक वाहनाची सोय करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र या आश्वासनाला आठ महिन्यांचा कालावधी लोटला तरी असून तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतीला अग्निशामक वाहन मिळालेले नाही. त्यामुळे साकोली तालुक्याला कुठेही आग लागल्यास भंडारा किंवा तुमसर येथून व्यवस्था करावी लागते.साकोली येथे सर्वच विभागाचे तालुकास्तरीय कार्यालय आहे. त्यामुळे अतिमहत्वाची दस्ताऐवज या कार्यालयात असतात. त्या दस्ताऐवजाची सुरक्षा करणे काळाची गरज ठरली आहे. यासाठी प्रत्येक कार्यालयात रात्रपाळीला चौकीदाराची सोय केली आहे. शासनाच्या माध्यमातून ही कागदपत्रे जोपासण्यासाठी सर्वाेतोपरी हालचाली होत असले तरी एखाद्यावेळी शासकीय कार्यालयाला आग लागल्यास ती आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाची येथे सोयच नाही. मागील उन्हाळ्यात साकोली येथील एलआयसी कार्यालयाला आग लागल्याने त्यातील महत्वाची दस्ताऐवज जळून खाक झाले होते. कारण तुमसर येथून अग्नीशामक दलाला येईपर्यंत बराच उशीर झाला होता.साकोली तालुक्यातून चुलबंद नदीसह बरेच लहान मोठे तलाव, नाले आहेत. पुरपरिस्थितीच्या वेळी अग्निशामन विभागाची महत्वाची भूमिका असते. परंतु ज्या विभागावर ही संपूर्ण सुरक्षा अवलंबून आहे. त्या विभागाकडेच शासनाचे दुर्लक्ष आहे. दिवसेंदिवस लोकसंख्या वास्तवच आहे. त्यामुळे गावाचा विस्तारही वाढला आहे. (तालुका प्रतिनिधी)