शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

९ महिन्यांत १२६ जणांचा अपघाती मृत्यू

By admin | Updated: October 24, 2015 02:54 IST

जिल्ह्यात अपघाताच्या संख्येत घट व्हावी, असा उद्देश वाहतूक विभागाचा असला तरी यावर्षी अपघातांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे़ ...

देवानंद नंदेश्वर भंडाराजिल्ह्यात अपघाताच्या संख्येत घट व्हावी, असा उद्देश वाहतूक विभागाचा असला तरी यावर्षी अपघातांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे़ जिल्ह्यात मागील नऊ महिन्यांमध्ये १२६ जणांचा अपघातात मृत्यू झाला़ अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा सतत वाढत असतानाही वाहतूक विभागाने ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत़ भंडारा जिल्ह्याची लोकसंख्या १२ लाखांच्यावर आहे़ यात भंडारा शहराची लोकसंख्या सव्वा लाख एवढी आहे़ दरवर्षी वाहतूक विभागाच्यावतीने रस्ता सुरक्षा सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो़ या सप्ताहादरम्यान दररोज प्रसिद्धी माध्यमातून अपघात टाळण्याचे आवाहन करण्यात येते. वाहतूक नियमांची ओळख परेड केली जाते.मात्र नागरिकांनी जनजागृतीचा लाभ झालेल्या अपघाताच्या आकडेवारीवरून घेतला नसल्याचे दिसून येते़ यावर्षी जानेवारी ते सप्टेंबर महिन्यांपर्यंत ३२६ अपघाताच्या घटना घडल्या़ यामध्ये १२६ जणांचा मृत्यू झाला़ या अपघातात ७८ जणांना गंभीर दुखापत तर ११३ जण किरकोळ जखमी झाले़ तसेच २४ अपघातात कुणालाही दुखापत झाली नसल्याची नोंद आहे़ भंडारा जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ असल्याने या महामार्गावर अपघाताची संख्या अधिक आहे.रस्ते आणि वाहनांची संख्या पाहता प्रचंड तफावत दिसून येते. दर दिवसाला रस्त्यावर शेकडो नविन वाहने येत असताना वाहतूक नियंत्रण करणारे मनुष्यबळ तोकडेच आहे. शहरासह जिल्हाभरातील वाहतूक नियंत्रण करणारे अधिकारी व शिपायांची आकडेवारी बोटावर मोजण्याइतकी आहे. लाखोंच्यावर वाहने आणि नियंत्रण करणारे मनुष्यबळाची कमतरता असल्याने वाहतूक व्यवस्था सुरळीत हाताळणे कठीण झाले आहे. परिणामी अपघाताच्या घटनामध्ये वाढ होत असल्याचे वास्तव आहे. वाहने चालविण्याचा परवाना आरटीओ विभागातून दर दिवसाला दिला जात आहे. मात्र रस्त्याची मर्यादा आणि दुर्देशेकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. नियोजनाचा अभावदेखील अपघाताच्या घटनांना कारणीभूत ठरत आहेत. सर्वाधिक अपघात हे ट्रक, टिप्परने धडक दिल्याने झाले आहेत, हे उल्लेखनीय.