शहरं
Join us  
Trending Stories
1
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
2
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
3
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
4
Team India Sponsor Deal : टीम इंडियाला पहिला स्पॉन्सर कधी मिळाला? कसा वाढत गेला कमाईचा आकडा?
5
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...
6
विपिन रात्रभर डिस्कोला जायचा अन्...; निक्की मर्डर केसमध्ये 'मिस्ट्री गर्ल'ची एन्ट्री
7
Dream11चं 'पॅक-अप'; आता टीम इंडियाचा नवा स्पॉन्सर कोण? 'या' बड्या कंपन्यांची नावे चर्चेत
8
Nikki Murder Case : फक्त हुंडा नाही तर रील, पार्लरवरुनही झालेली भांडणं; निक्की हत्याप्रकरणात धक्कादायक खुलासा
9
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
10
गणेश चतुर्थी २०२५: युट्यूब, फेसबुक Live, रेकॉर्डेड गणपती पूजन पुण्य देते का? पूजा सफल होते?
11
PM मोदी उद्या करणार उद्घाटन; Maruti च्या पहिल्या EV कारची शंभरहून अधिक देशात निर्यात
12
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
13
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
14
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
15
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
16
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
17
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल
18
आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली
19
Nikki Murder Case : "दोन्ही जावई मुलींच्या पार्लरमधून पैसे चोरायचे, काहीच काम करत नव्हते"; ढसाढसा रडले वडील
20
Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?

९ महिन्यांत १२६ जणांचा अपघाती मृत्यू

By admin | Updated: October 24, 2015 02:54 IST

जिल्ह्यात अपघाताच्या संख्येत घट व्हावी, असा उद्देश वाहतूक विभागाचा असला तरी यावर्षी अपघातांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे़ ...

देवानंद नंदेश्वर भंडाराजिल्ह्यात अपघाताच्या संख्येत घट व्हावी, असा उद्देश वाहतूक विभागाचा असला तरी यावर्षी अपघातांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे़ जिल्ह्यात मागील नऊ महिन्यांमध्ये १२६ जणांचा अपघातात मृत्यू झाला़ अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा सतत वाढत असतानाही वाहतूक विभागाने ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत़ भंडारा जिल्ह्याची लोकसंख्या १२ लाखांच्यावर आहे़ यात भंडारा शहराची लोकसंख्या सव्वा लाख एवढी आहे़ दरवर्षी वाहतूक विभागाच्यावतीने रस्ता सुरक्षा सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो़ या सप्ताहादरम्यान दररोज प्रसिद्धी माध्यमातून अपघात टाळण्याचे आवाहन करण्यात येते. वाहतूक नियमांची ओळख परेड केली जाते.मात्र नागरिकांनी जनजागृतीचा लाभ झालेल्या अपघाताच्या आकडेवारीवरून घेतला नसल्याचे दिसून येते़ यावर्षी जानेवारी ते सप्टेंबर महिन्यांपर्यंत ३२६ अपघाताच्या घटना घडल्या़ यामध्ये १२६ जणांचा मृत्यू झाला़ या अपघातात ७८ जणांना गंभीर दुखापत तर ११३ जण किरकोळ जखमी झाले़ तसेच २४ अपघातात कुणालाही दुखापत झाली नसल्याची नोंद आहे़ भंडारा जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ असल्याने या महामार्गावर अपघाताची संख्या अधिक आहे.रस्ते आणि वाहनांची संख्या पाहता प्रचंड तफावत दिसून येते. दर दिवसाला रस्त्यावर शेकडो नविन वाहने येत असताना वाहतूक नियंत्रण करणारे मनुष्यबळ तोकडेच आहे. शहरासह जिल्हाभरातील वाहतूक नियंत्रण करणारे अधिकारी व शिपायांची आकडेवारी बोटावर मोजण्याइतकी आहे. लाखोंच्यावर वाहने आणि नियंत्रण करणारे मनुष्यबळाची कमतरता असल्याने वाहतूक व्यवस्था सुरळीत हाताळणे कठीण झाले आहे. परिणामी अपघाताच्या घटनामध्ये वाढ होत असल्याचे वास्तव आहे. वाहने चालविण्याचा परवाना आरटीओ विभागातून दर दिवसाला दिला जात आहे. मात्र रस्त्याची मर्यादा आणि दुर्देशेकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. नियोजनाचा अभावदेखील अपघाताच्या घटनांना कारणीभूत ठरत आहेत. सर्वाधिक अपघात हे ट्रक, टिप्परने धडक दिल्याने झाले आहेत, हे उल्लेखनीय.