शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
IND W vs ENG W : इंग्लंडच्या मैदानात टीम इंडियानं रचला इतिहास; इथं पहिल्यांदाच जिंकली T20I मालिका
3
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
4
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
5
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
6
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
7
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
8
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
9
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
10
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
12
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
13
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
14
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
15
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
16
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
17
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
18
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
19
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
20
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?

९ महिन्यांत १२६ जणांचा अपघाती मृत्यू

By admin | Updated: October 24, 2015 02:54 IST

जिल्ह्यात अपघाताच्या संख्येत घट व्हावी, असा उद्देश वाहतूक विभागाचा असला तरी यावर्षी अपघातांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे़ ...

देवानंद नंदेश्वर भंडाराजिल्ह्यात अपघाताच्या संख्येत घट व्हावी, असा उद्देश वाहतूक विभागाचा असला तरी यावर्षी अपघातांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे़ जिल्ह्यात मागील नऊ महिन्यांमध्ये १२६ जणांचा अपघातात मृत्यू झाला़ अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा सतत वाढत असतानाही वाहतूक विभागाने ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत़ भंडारा जिल्ह्याची लोकसंख्या १२ लाखांच्यावर आहे़ यात भंडारा शहराची लोकसंख्या सव्वा लाख एवढी आहे़ दरवर्षी वाहतूक विभागाच्यावतीने रस्ता सुरक्षा सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो़ या सप्ताहादरम्यान दररोज प्रसिद्धी माध्यमातून अपघात टाळण्याचे आवाहन करण्यात येते. वाहतूक नियमांची ओळख परेड केली जाते.मात्र नागरिकांनी जनजागृतीचा लाभ झालेल्या अपघाताच्या आकडेवारीवरून घेतला नसल्याचे दिसून येते़ यावर्षी जानेवारी ते सप्टेंबर महिन्यांपर्यंत ३२६ अपघाताच्या घटना घडल्या़ यामध्ये १२६ जणांचा मृत्यू झाला़ या अपघातात ७८ जणांना गंभीर दुखापत तर ११३ जण किरकोळ जखमी झाले़ तसेच २४ अपघातात कुणालाही दुखापत झाली नसल्याची नोंद आहे़ भंडारा जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ असल्याने या महामार्गावर अपघाताची संख्या अधिक आहे.रस्ते आणि वाहनांची संख्या पाहता प्रचंड तफावत दिसून येते. दर दिवसाला रस्त्यावर शेकडो नविन वाहने येत असताना वाहतूक नियंत्रण करणारे मनुष्यबळ तोकडेच आहे. शहरासह जिल्हाभरातील वाहतूक नियंत्रण करणारे अधिकारी व शिपायांची आकडेवारी बोटावर मोजण्याइतकी आहे. लाखोंच्यावर वाहने आणि नियंत्रण करणारे मनुष्यबळाची कमतरता असल्याने वाहतूक व्यवस्था सुरळीत हाताळणे कठीण झाले आहे. परिणामी अपघाताच्या घटनामध्ये वाढ होत असल्याचे वास्तव आहे. वाहने चालविण्याचा परवाना आरटीओ विभागातून दर दिवसाला दिला जात आहे. मात्र रस्त्याची मर्यादा आणि दुर्देशेकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. नियोजनाचा अभावदेखील अपघाताच्या घटनांना कारणीभूत ठरत आहेत. सर्वाधिक अपघात हे ट्रक, टिप्परने धडक दिल्याने झाले आहेत, हे उल्लेखनीय.