शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

९ महिन्यांत १२६ जणांचा अपघाती मृत्यू

By admin | Updated: October 24, 2015 02:54 IST

जिल्ह्यात अपघाताच्या संख्येत घट व्हावी, असा उद्देश वाहतूक विभागाचा असला तरी यावर्षी अपघातांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे़ ...

देवानंद नंदेश्वर भंडाराजिल्ह्यात अपघाताच्या संख्येत घट व्हावी, असा उद्देश वाहतूक विभागाचा असला तरी यावर्षी अपघातांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे़ जिल्ह्यात मागील नऊ महिन्यांमध्ये १२६ जणांचा अपघातात मृत्यू झाला़ अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा सतत वाढत असतानाही वाहतूक विभागाने ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत़ भंडारा जिल्ह्याची लोकसंख्या १२ लाखांच्यावर आहे़ यात भंडारा शहराची लोकसंख्या सव्वा लाख एवढी आहे़ दरवर्षी वाहतूक विभागाच्यावतीने रस्ता सुरक्षा सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो़ या सप्ताहादरम्यान दररोज प्रसिद्धी माध्यमातून अपघात टाळण्याचे आवाहन करण्यात येते. वाहतूक नियमांची ओळख परेड केली जाते.मात्र नागरिकांनी जनजागृतीचा लाभ झालेल्या अपघाताच्या आकडेवारीवरून घेतला नसल्याचे दिसून येते़ यावर्षी जानेवारी ते सप्टेंबर महिन्यांपर्यंत ३२६ अपघाताच्या घटना घडल्या़ यामध्ये १२६ जणांचा मृत्यू झाला़ या अपघातात ७८ जणांना गंभीर दुखापत तर ११३ जण किरकोळ जखमी झाले़ तसेच २४ अपघातात कुणालाही दुखापत झाली नसल्याची नोंद आहे़ भंडारा जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ असल्याने या महामार्गावर अपघाताची संख्या अधिक आहे.रस्ते आणि वाहनांची संख्या पाहता प्रचंड तफावत दिसून येते. दर दिवसाला रस्त्यावर शेकडो नविन वाहने येत असताना वाहतूक नियंत्रण करणारे मनुष्यबळ तोकडेच आहे. शहरासह जिल्हाभरातील वाहतूक नियंत्रण करणारे अधिकारी व शिपायांची आकडेवारी बोटावर मोजण्याइतकी आहे. लाखोंच्यावर वाहने आणि नियंत्रण करणारे मनुष्यबळाची कमतरता असल्याने वाहतूक व्यवस्था सुरळीत हाताळणे कठीण झाले आहे. परिणामी अपघाताच्या घटनामध्ये वाढ होत असल्याचे वास्तव आहे. वाहने चालविण्याचा परवाना आरटीओ विभागातून दर दिवसाला दिला जात आहे. मात्र रस्त्याची मर्यादा आणि दुर्देशेकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. नियोजनाचा अभावदेखील अपघाताच्या घटनांना कारणीभूत ठरत आहेत. सर्वाधिक अपघात हे ट्रक, टिप्परने धडक दिल्याने झाले आहेत, हे उल्लेखनीय.