शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

बावनथडी प्रकल्पात १२ टक्के जलसाठा

By admin | Updated: April 18, 2016 00:25 IST

एप्रिल हीटमुळे जिवनदायीनी बावनथडी नदी चक्क कोरडी पडली आहे. नाकाडोंगरी व परिसरातील शेत विहिरी कोरड्या पडल्याने ऊस व भाजीपाल्याची शेती संकटात सापडली आहे.

बावनथडी नदीचे झाले वाळवंटात रुपांतर : नाकाडोंगरी परिसरातील पिके नष्ट होण्याच्या मार्गावरमोहन भोयर  तुमसरएप्रिल हीटमुळे जिवनदायीनी बावनथडी नदी चक्क कोरडी पडली आहे. नाकाडोंगरी व परिसरातील शेत विहिरी कोरड्या पडल्याने ऊस व भाजीपाल्याची शेती संकटात सापडली आहे. बावनथडी प्रकल्पातून बावनथडी नदी पात्रात पाणी सोडण्याची येथे गरज आहे. पंरतु नियोजनाच्या अभावी प्रकल्पातील पाणी तीन तलावात यापूर्वी सोडण्यात आले व बावनथडी कालव्यावर वन्यप्राण्यांकरिता पूलाचे बांधकाम सुरु असल्याने पाणी तिथे देण्यात येत आहे.नाकाडोंगरी व परिसरात बावनथडी नदी काठावर गाळाची सुपिक शेती आहे. दरवर्षी या परिसरातील शेतकरी ऊस व भाजीपाल्याची शेती मोठ्या प्रमाणात करतात. या शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनाकरिता विहिरी आहेत, पंरतु जिवनदायीनी बावनथडी नदीपात्र यावर्षी कोरडे पडले आहे. नदीपात्रात पाणी आटल्याने विहिरींना पाणी नाही. त्या कोरड्या पडल्या आहेत. तर काही विहिरींची पाणी पातळी अतिशय खोल गेली आहे. पाणी संकटामुळे ऊस व भाजीपाल्याचे पीक धोक्यात आले आहे.बावनथडी प्रकल्पातून बावनथडी नदीपात्रात पाणी सोडल्यास येथील पीके वाचू शकतात, परंतु तथा हालचाली येथे दिसत नाही. बावनथडी प्रकल्पात सध्या केवळ मृत जलसाठा असल्याची माहिती आहे. यापूर्वी रब्बीच्या पिकाकरिता बावनथडी प्रकल्पातून कारली, आंबागड व बघेडा येथील तलाव भरण्यात आले होते. त्यावेळी बावनथडी प्रकल्पात जलसाठा होता.वाईल्ड लाईफ प्रकल्पाकरिता पाणी बावनथडी प्रकल्प परिसरात घनदाट जंगल असून येथील मुख्य कालव्यावर प्राण्यांना ये-जा करण्याकरिता १२ ते १५ पूल तयार करण्यात येत आहेत. त्यांच्या बांधकामाकरिता सध्या पाण्याचा वापर सुरु आहे.१२ टक्के जलसाठाबावनथडी प्रकल्पात केवळ १२ टक्के जलसाठा आहे. या जलसाठ्याला तांत्रिक भाषेत मृत जलसाठा असे म्हणतात. हे पाणी नदीत प्रवाहीत केल्यास त्याला जोर नसतो. म्हणून प्रकल्पातून पाणी सोडता येत नाही.बावनथडी प्रकल्पातून पाणी नदीत सोडण्याची गरज असून याकरिता लोकप्रतिनिधीवर दबाव वाढत आहे. पीकांच्या बचावाकरिता पाणी सोडावेच लागेल. अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल.- शेखर कोतपल्लीवार, उपसभापती पं.स. तुमसरतीन तलावात यापूर्वी पिकांकरिता पाणी सोडण्यात आले. सध्या वाईल्ड लाईफच्या पुलांकरिता पाण्याचा वापर सुरु आहे. प्रकल्पात केवळ १२ टक्के पाणी शिल्लक आहे. तांत्रिकदृष्ट्या पाणी सोडता येत नाही. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी होते.- राजेश हटवार, सहायक अभियंता बावनथडी प्रकल्प