शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

१२ कुटुंबीयांना घरे सोडण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2016 00:24 IST

वैनगंगा नदी काठ व घरांचे अंतर केवळ एका फुटापेक्षाही कमी आहे. भूस्खलन होऊन मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे.

तहसीलदारांचे निर्देश : पावसाळ्यात कुठे राहायचे, ग्रामस्थांचा सवालतुमसर : वैनगंगा नदी काठ व घरांचे अंतर केवळ एका फुटापेक्षाही कमी आहे. भूस्खलन होऊन मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे. पावसाळा सुरु झाल्याने या घरांना मोठा धोका निर्माण झाला आहे. तुमसर तहसीलदारांनी १२ कुटुंबांना घरे सोडण्याचे निर्देश दिले आहे. दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणाऱ्या कुटुंबांनी कुठे जावे असा प्रश्न उपस्थित होत आहे.वैनगंगा नदी काठावर रेंगेपार येथे १२ घरे अगदी नदी पात्रात समावेश होण्याइतपत भयानक स्थिती येऊन ठेवली आहे. सन २००७ पासून या कुटुंबाने घरे बांधून देण्याची मागणी राज्य शासनाकडे केली होती. परंतु हेतुपुरस्पर त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. नदी काठापर्यंत ही घरे येऊन टेकली आहेत, तरी शासनाने नियोजन केले नाही. शासनाने या कुटूंबाना गावाशेजारी भूखंड दिले, परंतु दारिद्र्यरेषेखालील जिवन जगणाऱ्या कुटुंबाजवळ पैसा नाही. घरे कशी बांधावी असा प्रश्न या कुटुंबांना पडला आहे.१६ जून रोजी तुमसरचे तहसीलदारांनी रेंगेपार येथील नैतराम दमाहे, कंटीराम नागपूरे, हंसराज माहुले, रामभाऊ नागपूरे, गुलाब कावळे, ब्रिजलाल मोरांडे, बाबु मोरांडे, आनंदराव सोनवाने, अशोक उके, अंबर शेंडे, कला शेंडे, इंजीनबाई भुरे यांना पत्राद्वारे घरे सोडण्याचे निर्देश दिले आहे. सन २००७ मध्ये मोठे तीव्र आंदोलन येथे ग्रामस्थांनी केले होते. रास्ता रोको, जलसमाधी घेण्याचा इशारा शासनाला दिला होता, परंतु काहीच हालचाली झाल्या नाहीत. या घरासमोरुन डांबरीकरणाचा रस्ता जातो, बाजूला जि. प. ची शाळा आहे. त्यामुळे त्यांनाही मोठा धोका आहे.रेंगेपार येथे वैनगंगेचे विस्तृत पात्र आहे. दरवर्शी नदी गावाच्या दिशेने झपाट्याने येत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेती नदी पात्रात गिळंकृत झाली आहे. लोकप्रतिनिधीनी आतापर्यंत केवळ आश्वासने दिली. येथे प्रत्यक्ष जीव जाण्याची पाळी आली तरी काहीच कारवाई झाली नाही. तहसिलदारांनी केवळ आपले कर्तव्य पार पाडले. लोकप्रतिनिधी येथे आपले कर्तव्य केव्हा पार पाडतील असा प्रश्न ग्रामस्थानी विचारला आहे. (तालुका प्रतिनिधी)