शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीच्या काळात १० हजार पाॅझिटिव्ह; १५ दिवसांनंतर रुग्णसंख्या झाली कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:57 IST

भंडारा : पहिल्या लाटेच्या तुलनेने दुसऱ्या लाटेत अनेक रेकाॅर्ड ब्रेक झाले. अवघ्या महिनाभरातच हजारो रुग्ण बाधित झाले, तर मृत्यूसंख्याही ...

भंडारा : पहिल्या लाटेच्या तुलनेने दुसऱ्या लाटेत अनेक रेकाॅर्ड ब्रेक झाले. अवघ्या महिनाभरातच हजारो रुग्ण बाधित झाले, तर मृत्यूसंख्याही झपाट्याने वाढली. विशेष म्हणजे संचारबंदीच्या काळात तब्बल १० हजार रुग्ण पाॅझिटिव्ह आढळले. उल्लेखनीय म्हणजे १५ दिवसांनंतर रुग्णसंख्या थोड्या प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येत आहे.

मार्च महिन्यापासून कोरोनाबाधितांचा ग्राफ सातत्याने वाढत असल्याचे दिसून आले. यात एप्रिल महिन्यात रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. १५ एप्रिलपासून संचारबंदी घोषित झाल्यापासून रुग्णसंख्या सातत्याने वाढतच होती. दरम्यान, २८ एप्रिलनंतर रुग्णसंख्येत थोडीफार घट जाणवायला लागली. मात्र, मृत्यूसंख्येत घट दिसून आली नाही; परंतु गत दोन दिवसांत २३ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी नियमांचे पालन होत नसल्याचीही तक्रार समोर येत असताना विनाकारण घराबाहेर पडणे हेच कोरोना संसर्ग पसरण्याचे मुख्य कारण ठरत आहे.

यामुळे घटली संख्या

गत २० दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत होती. मात्र, संचारबंदीच्या शेवटच्या टप्प्यात रुग्णसंख्या कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने टक्केवारीतही वाढ झाली आहे. दरम्यान, दोन दिवसांपासून मृत्यूचा ग्राफही कमी झाल्याचे दिसून येते. संचारबंदीत नियमांचे पालन झाल्यानेच संख्या घटत असल्याचे जाणवते.

ग्रामीण भागात रुग्ण

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्यापेक्षा यावेळेस ग्रामीण भागात रुग्णसंख्या अधिक असल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील ७८४ गावांपैकी ७०० गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केल्याची आकडेवारी आरोग्य विभागाने घेतली आहे. नियमांना तिलांजली दिल्यानेच ग्रामीण भागातही याचा मोठ्या झपाट्याने फैलाव झाल्याचे दिसून आले. यामुळेच ग्रामीण भागातही चिंतेचे वातावरण दिसत आहे.