शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

१०० टक्के व्यसनमुक्त गाव ‘बोंडे’

By admin | Updated: March 1, 2016 00:23 IST

व्यसनमुक्त व आदर्श गावांचा पुरस्कार मिळालेल्या गावात व्यसनाचे प्रमाण वाढले आहेत.

गावात गुटखा व दारूचे दुकाने नाहीत : दर आठवड्याला मानवधर्माची नियमित बैठकयुवराज गोमासे करडी व्यसनमुक्त व आदर्श गावांचा पुरस्कार मिळालेल्या गावात व्यसनाचे प्रमाण वाढले आहेत. व्यसनमुक्तीसाठी अनेक गावात आंदोलने होत आहेत. महिलांनी आवाज बुलंद केला आहे. मोहाडी तालुक्यातील आदिवासी ‘बोंडे’ गाव त्याला अपवाद ठरत असून सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरले आहे. बाबा जुमदेवजी यांच्या प्रेरणेने, स्वयंस्फुर्तीने १०० टक्के गाव व्यसनमुक्त झाले आहे. मोहाडी तालुक्यातील खडकी गट ग्रामपंचायत अंतर्गत असलेले बोंडे हे छोटेशे आदिवासी गाव. गावाचा मुख्य व्यवसाय शेती व मजुरी आहे. लोकसंख्या २१८ कुटूंब संख्या ४८ आहे. गोंड, गोवारी, कलार, कुणबी आदी समाजाचे वास्तव्य आहे. कोका जंगल टेकड्याच्या पायथ्याशी गाव असताना संपूर्ण गावातील रस्ते व नाल्या सिमेंट काँक्रिटने बांधलेल्या आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रंगमंच व हनुमंताचे मंदिर गावात आहेत. संपूर्ण गाव महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या मानवधर्मात सहभागी आहे.दहा वर्षापुर्वी गावाची स्थिती वाईट होती. गावात पक्के रस्ते व नाल्याही नव्हत्या. पिण्याच्या पाण्यासाठी शेतशिवारात भटकावे लागेल. गावातील सर्वांना दारूचे जडले होते. कुटूंब व घरादारांची अवस्था दयनिय झाली होती. भांडणे तर पाचवीलाच पुजलेले असायचे. भूतबाधा, अंधश्रद्धा, जादूटोना, अंगात देवी-देवता येणे आदीमुळे गावाची सुख-शांती भंग पावली होती. दिवस रात्र कमावते व्यक्ती व्यसनात बुडालेले राहत असल्याने महिलांची कुचंबना व्हायची. लहान मुलांना शाळेतही पाठविले जात नव्हते. बाबा जुमदेवजी यांच्या मानवधर्मामुळे हे चित्र दहा वर्षानंतर पालटले. गावातील दुधराम मेश्राम हे या धर्माचे पहिले सेवक झाले. त्यांचे कार्य सुरूवातीला कुणालाही पटत नव्हते. मात्र एकएक कुटूंब मानवधर्माचा सेवक झाला. आध्यात्म प्रमुख प्रचारक लता बुरडे, यशवंत ढबाले यांच्या मार्गदर्शनामुळे दहा वर्षात संपूर्ण गाव १०० टक्के मानवधर्ममय होऊन व्यसनमुक्त झाले. गावात एकही दारूचे, गुटखा व खर्राची दुकाने बंद करण्यात आली. स्वयंस्फुर्तीने गावात दर आठवड्याला प्रत्येकाच्या घरी चर्चा बैठक होऊन एकमेकाचे दु:ख समजून सोडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याने एकतेची ज्योत अखंड तेवत आहे. या गावाला सन २००९-१० मध्ये स्वच्छ ग्राम पुरस्कार मिळाला. कोका वन्यजीव अभयारण्यामार्फत ग्राम परिस्थिती की विकास समितीचे अध्यक्ष रविकुमार मरस्कोल्हे यांच्या पुढाकारात गावातील प्रत्येक कुटूंबाला स्वयंपाकाचे गॅस व दुधाळ जनावरांचे वाटप नुकतेच करण्यात आले. प्रत्येक घरी शौचालय बांधण्याचे काम पुढील महिन्यापासून सुरू केले जाणार असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.