शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

१०० हेक्टरचा तलाव कोरडा

By admin | Updated: April 5, 2017 00:23 IST

देवरी-गोंदी येथील शंभर हेक्टरमधील तलाव सदोष बांधकामामुळे ३४ वर्षानंतरही कोरडा पडलेला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी : देवरीगोंदी तलाव पुनरूज्जीवनाच्या प्रतीक्षेतपालांदूर : देवरी-गोंदी येथील शंभर हेक्टरमधील तलाव सदोष बांधकामामुळे ३४ वर्षानंतरही कोरडा पडलेला आहे. देवरीगाव जलयुक्त शिवार योजनेत येत असल्याने त्याला न्याय देताना तलावाचे पुनरूज्जीवन होईल, अशी अपेक्षा देवरी-गोंदी ढिवरखेडा येथील ग्रामस्थांना आहे.देवरी-गोंदी हे गाव जंगलव्याप्त परिसरात आहे. या गावाला रोजगार मिळावा या हेतूने जंगलाला लागून असलेल्या शेतीला पाणी मिळेल, यासाठी १९७५ मध्ये १०० हेक्टरमध्ये तलावाची निर्मिती करण्यात आली होती. परंतु तलावाचे गेट व नहर चुकीच्या पद्धतीने बनल्यामुळे पहिल्या पावसाळ्यातच तलाव भरला; मात्र शेतीकरिता सिंचन होऊ शकले नाही. २००५ मध्ये अतिवृष्टीमुळे गेटला तडा गेल्यामुळे तलाव गेट वाहून गेल्यामुळे तलाव कोरडा झाला आजही हा तलाव कोरडा ठण्ण पडला आहे. तलाव मोठा असल्याने व नैसर्गिक साधनसामुग्री असल्याने हजारो एकरातील सिंचन व मासेमार बांधवांना रोजगार देण्याकरीता हा तलाव सोयीचा असल्यामुळे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भरत खंडाईत यांनी खासदार नाना पटोले यांना याचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी लोकलेखा समितीकडे हा विषय लावून धरत देवरीगोंदी तलावाच्या पुनरूज्जीवनाची मागणी केली.आमदार बाळा काशिवार यांनी १० जानेवारीला तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी व लघुपाटबंधारे विभागाचे अभियंता, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, मंडळ अधिकारी, वनअधिकारी, तलाठी, सरपंच यांच्यासोबत तलाव व परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी लाभार्थी व अधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा करीत मुख्य गेट, वेस्टवेन व कालव्याची दुरूस्ती महत्त्वाची असल्याची बाब पुढे आली. मागील दोन वर्षापासून या प्रकरणाला गती आलेली नाही. आ.बाळा काशिवार यांनी पत्रपरिषदेत ८६ लाख रूपयांची मंजुरी मिळाल्याचे सांगितले आहे. पावसाळ्यापुर्वी या तलावाचे पुनरूज्जीवन व्हावे, अशी मागणी देवरी, गोंदी, ढिवरखेडा येथील ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)