शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तलाव दुरुस्तीला १० लाख मंजूर

By admin | Updated: May 21, 2017 00:22 IST

आठ महिन्यापासून वरठी येथील तलावाच्या दुरुस्ती करिता टाळाटाळ होत होती.

चरण वाघमारे यांच्या प्रयत्नांना यश : जिल्हा परिषदेच्या आकस्मिक निधीतून निधीवरठी : आठ महिन्यापासून वरठी येथील तलावाच्या दुरुस्ती करिता टाळाटाळ होत होती. तलावाची पाळ दुरुस्त न झाल्यास यावर्षी शेतकऱ्यांना मोठा नुकसान होणार म्हणून या भागातील शेतकऱ्यांनी तलाव दुरुस्तीचा प्रश्न लावून धरला होता. आमदार चरण वाघमारे यांनी या प्रकरणात पुढाकार घेऊन जिल्हा परिषद भंडारा यांना आकस्मिक निधीतून तलाव दुरुस्तीचा प्रस्ताव मंजूर करण्याची सूचना दिली. अखेर तलाव दुरुस्तीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून लवकरच काम सुरु होणार आहे.आठ महिन्यापूर्वी वरठी येथील तलावाची पाळ फुटल्यामुळे पाणी वाहून गेले. यात शेकडो एकर शेतातील धानपिक नष्ट झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात आली नाही. आठ महिन्यापासून तलावाच्या दुरुस्तीसाठी मागणी होत असतानाहीअधिकारी दुर्क्षक्ष करीत होते. सदर तलाव जिल्हा परिषद भंडारा च्या लघु पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद भंडारा तलावाची दुरुस्ती करणे अपेक्षित होते. पण आठ महिन्यापासून काम पूर्ण करण्याकरिता निधी नसल्याची ओरड सुरु होती.पावसाळा जवळ असून काम सुरु न झाल्याने त्रस्त शेतकऱ्यांनी अखेर तलाव दुरुस्तीसाठी पुढाकार घेऊन सदर बाब आमदार चरण वाघमारे यांच्या लक्षात आणून दिली. याबाबत आमदार वाघमारे यांनी सदर बाब जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या लक्षात आणून देऊन प्रकरणाचे गांभीर्य सांगितले. तलाव दुरुस्त न झाल्यास शेकडो एकर शेतीपिक घेण्यासाठी वंचित राहिली असतील. याबाबद ग्रामपंचायत वरठी येथे उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले व लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पद्माकर पराते यांनी शेतकऱ्यांची चर्चा केली होती. यावेळी सरपंच संजय मिरासेल जिल्हा परिषद सदस्य धर्मशिला उके, मोहगावचे सरपंच राजेश लेंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप उके, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र बोरकर, थारनोद डाकरे, शेतकरी वामन थोटे, राजू भाजीपाले, रामू चकोले, झिंगर मरघडे, शिवा गायधने, सुरेंद्र भाजीपाले व दामोधर गायधने यांच्यासह ४२ शेतकरी उपस्थित होते.तलावाच्या दुरुस्तीकरिता जिल्हा परिषदेच्या आकस्मिक निधीतून दहा लक्ष रुपये मंज़ूर झाले असल्याची माहिती आमदार चरण वाघमारे यांनी दिली आहे. सदर काम लवकरात लवकर सुरु करणे आवाहन असून याबाबत संपूर्ण लक्ष असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.