शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

योग – बहरण्याचे एक अद्वितीय तंत्रज्ञान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 17:39 IST

योग मार्गावर, देव म्हणजे जीवनाचा स्त्रोत म्हणून पाहिले जात नाही, तर जीवन बहरण्याचे एक अद्वितीय तंत्रज्ञान म्हणून पाहिले जाते.

सद्गुरू: फुल हे अध्यात्माच्या परमोच्च अवस्थेचे योगिक प्रतीक आहे कारण योग मार्गावर वाटचाल करत असताना परमेश्वराकडे जीवनाचा निर्माता, स्त्रोत किंवा बीज म्हणून नाही, तर परमोच्च अवस्थेत बहरण्याचे स्थान या दृष्टीने पाहिले जाते. तुम्ही कोठून आलात यात योगाला काहीही स्वारस्य नाही. तुम्हाला कोठे जायचे आहे यातच योगाला स्वारस्य आहे. पण जे घडणार आहे त्याकडे आपण जे आहोत त्यावाचून हाताळू शकत नाही. जे आहे त्यात आपण आपल्यासाठी एक अवकाश निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. अन्यथा आम्हाला काय आहे किंवा काय होते यामध्ये स्वारस्य नाही. पुढे काय घडणार आहे यामध्ये आम्हाला स्वारस्थ्य आहे.

बीजाची जोपासना

आम्ही जीवनाकडे अशा प्रकारे पाहतो ज्याला प्रत्येकजण पिता म्हणून संबोधतो, आम्ही त्याच्याकडे पिता म्हणून पाहत नाही. आम्ही आमचा वंश सोडून देत आहोत हा याचा अर्थ आहे. आम्ही परमेश्वरकडे अशी एक गोष्ट म्हणून पहातो ज्याला तुम्ही गर्भात धारण करू शकता. तुम्ही त्याचे पोषण केले, तर तो तुमच्यापर्यन्त पोहोचेल. जर तुम्ही त्याची जोपासना केली नाही तर ते बीज आहे तसे बीज म्हणूनच राहील.

आम्हाला फक्त फुलाचे सौन्दर्य आणि सुवास, तसेच फळाचे पोषण आणि माधुर्य हवंय म्हणून केवळ यासाठीच आपण बीजात स्वारस्य आहे. ते जर तसे नसते, तर आपल्याला त्या बीजात काहीच स्वारस्य उरले नसते. योगाचे अवघे विज्ञान, ज्याला आपण अध्यात्म म्हणतो ती संपूर्ण प्रक्रिया ही केवळ आपल्या जीवनाची योग्य प्रकारे निगा राखणीची कला आहे – म्हणजे बीजाची जोपासना करणे जेणेकरून त्याचे रूपांतर पूर्णतः बहरलेल्या फुलात होईल.

म्हणूनच योगी जणांनी तुम्हाला डोकं खाली पाय वर करायचा सराव करायला सांगितला! सुखावह स्थिती पेक्षा असुविधाजनक स्थितीत असताना तुम्ही कदाचित सत्य अधिक उत्तम दृष्ट्या पाहू शकाल. योग हे आंतरिक सर्वच पातळीचे रुपांतरणाचे विज्ञान आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की कोणतीही एक विशिष्ट साधना करत असताना – त्यात असणार्‍या मूलभूत गुणांमुळे परिवर्तन घडू शकत असले – तरीही तेच म्हणजे सर्वस्व नाही. तुम्ही ती साधना कशा प्रकारे करता हे अतिशय महत्वाचे आहे.

एखादी पद्धत जर खरोखरच एक प्रभावी पद्धत बनायची असेल, तर सर्वप्रथम, तुम्ही तिचा वापर करून घेण्यासाठी तुमच्या मनाची तयारी करणे अत्यावश्यक आहे. तरच ती एक पद्धत म्हणून कार्य करू शकेल. निश्चित कालावधीसाठी विनाअट, तिच्याप्रती पूर्णतः प्रतीबद्ध होऊन ती आध्यात्मिक प्रक्रिया सुरू करणे हे नेहेमीच चांगले असते – सहा महीने केवळ साधना करत रहा. तुम्हाला कोणतेही फायदे मिळण्याची आवश्यकता नाही. फक्त ती साधना करत रहा. त्यानंतर, तुमच्या आयुष्याचे पडताळून पहा आणि आपण किती शांत, आनंदी आणि समाधानी झाला आहात हे पहा. तुमच्यासोबत हे कशामुळे होत आहे?

आंतरिक प्रकाश

अल ग्रेको नावाचा एक स्पॅनिश चित्रकार होता. वसंत ऋतुमधील एका सुंदर सकाळी तो घराच्या सर्व खिडक्या बंद करून बसला होता . त्याचा मित्र आत आला आणि म्हणाला, “तू सर्व खिडक्या बंद करून का बसला आहेस? चल, आपण बाहेर जाऊ. चल. बाहेर किती सुंदर वातावरण आहे, किमान खिडक्या तरी उघड.” त्याने उत्तर दिले, “मला खिडक्या उघडायच्या नाहीत कारण आतला प्रकाश चमकतो आहे. त्यात बाहेरील प्रकाशाने व्यत्यय आणावा असे मला वाटत नाही.”

तर, बीजाची जोपासना करून त्याचे रूपांतर फुलात होण्यासाठी, आपल्याला दिव्यांचा प्रकाश पाडावा लागतो का? नाही. प्रकाश पडलेलाच असतो. फक्त एवढंच की त्याच्यावर इतका मळ साचलेला आहे, त्याला बाहेर पडण्याची वाट सापडत नाहीये. एकदा हा प्रकाश आतून चमकू लागला, तर उर्वरित सर्वकाही नैसर्गिकपणे घडू लागते. आपण ते अतिशय सहजतेने करू शकतो. ते त्वरित घडण्यासाठी आवश्यक असणारे आत्मिक तंत्रज्ञान आपल्याकडे उपलब्ध आहे, त्यामुळे आपल्याला नैसर्गिक प्रक्रियेमधून जाण्याची सुद्धा आवश्यकता नाही कारण त्यासाठी वेळ लागू शकतो. ज्याप्रमाणे त्यांच्याकडे जेनेटिक इंजिनियरिंग म्हणजे अनुवांशिक अभियांत्रिकी आहे, त्याप्रमाणे आमच्याकडे इनर इंजीनीरिंग म्हणजे आंतरिक अभियांत्रिकी आहे! ज्या नारळाच्या झाडावर नारळ उगवण्यासाठी आठ वर्षे लागतात, त्याच झाडावर एक ते दीड वर्षात नारळ येतात – हे अनुवांशिक अभियांत्रिकी. तेच इनर इंजीनीरिंगचे आहे – ज्यांना अन्यथा हे साध्य करण्यासाठी दहा जन्म घ्यावे लागले असते, ते एकाच जन्मात साध्य करता येईल!