शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
5
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
6
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
7
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
8
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
9
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
10
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
11
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
12
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
13
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
14
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
15
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
16
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
17
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
18
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
19
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
20
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती

शब्द ईश्वराचे रुप, असे वापरावे की ऐकणाऱ्यास स्वर्गीय आनंद लाभेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 08:55 IST

शस्त्राने केलेली जखम एखादवेळी भरुन येईल पण शब्दाची जखम मात्र कधीही भरुन येत नाही. म्हणूनच म्हणतात ना की, शब्द हे शस्त्र आहे, जपून वापरावा..! शब्द हा ईश्वराचे रुप आहे. तो असा वापरा की, ऐकल्यावर लोकांना स्वर्गीय आनंद लाभावा..!

- युवा कीर्तनकार, ह.भ.प. ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी( बीड, महाराष्ट्र. ८७ ९३ ०३ ०३ ०३ ) 

श्रीसमर्थ रामदास स्वामींनी आपल्या वाङ्॒मयातून ऐहिक जीवनासाठी अत्यंत बोधप्रद अशी शिकवण दिली. खरं तर श्रीसमर्थ रामदास स्वामींची ही एक जरी शिकवण आपण अंगीकृत केली तरी लोक आपल्याला नक्कीच सज्जन म्हणतील. एका श्लोकांत श्रीसमर्थ रामदास स्वामी म्हणतात -

बरे सत्य बोला यथा तथ्य चाला ।बहू मानिती लोक येणे तुम्हाला ॥

महात्मा गांधी सत्यालाच देव म्हणत. इथेही श्रीसमर्थ रामदास स्वामी सत्य बोलण्याचाच उपदेश करतात. आता सत्य म्हणजे तरी काय..? सर्वकाळ सर्वांनाच जे हितकारक त्याला सत्य असे म्हणतात. भगवान श्रीकृष्ण श्रीमद् भगवद् गीतेमध्ये यालाच वाङ्॒मय तप असे म्हणतात. माणसाने बोलावे कसे..?तर गीतामाऊली सांगते -

अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितंच यत् ।स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्॒मयं तप उच्यते ॥

आपल्या बोलण्याने दुसर्‍याच्या मनांत उद्वेग तर निर्माण होणार नाही ना..? याचा बोलतांना म्हणजे बोलण्यापूर्वी विचार करायला हवा. आपण जे बोलतो ते प्रिय असावे, हितकारक असावे व सत्य असावे.

नुसतेच वर वर प्रिय असेल त्याला व्यापारी कृतीचे प्रिय म्हणावे लागेल. व्यापारी आपल्या मालाची विक्री व्हावी म्हणून किती गोड बोलतात..? याच गोड बोलण्याने ग्राहक फसतो आणि दुय्यम दर्जाचा माल खरेदी करतो. ही वृत्ती त्या बोलण्यात नसावी. बोलणे हितकारक असावे आणि प्रिय ही असावे. नाही तर कधी कधी असाही प्रत्यय येतो -

मधुतिष्ठति जिव्हाग्रे ह्रदये तु हलाहलम् ।

शस्त्राने केलेली जखम एखादवेळी भरुन येईल पण शब्दाची जखम मात्र कधीही भरुन येत नाही. म्हणूनच म्हणतात ना की, शब्द हे शस्त्र आहे, जपून वापरावा..!

आपल्या सत्य बोलण्याने व सत्य चालण्याने जगांत आपल्याला नक्कीच मान मान्यता मिळेल. आपले शब्द लोक प्रमाणभूत मानतील. एका कवीने अतिशय सुंदर वर्णन केले आहे. साहित्यिक म्हणतो -

शब्दांनीच पेटतात घरे.. देश.. आणि माणसे माणसेसुद्धा...शब्दच विझवतात आग.. शब्दांनी पेटलेल्या माणसांची.....शब्द नसते तर पडल्या नसत्या डोळ्यांतून आगीच्या ठिणग्यावाहिले नसते आसवांचे महापूर..आणि नसते कोणी गेले जवळ...नसते दूर...!

आज प्रगतीच्या क्षेत्रांत आपण एवढे प्रगल्भ झालो पण अजूनही जीवनांतील हा संतांचा विचार आचारसिद्ध होत नाही.निवडणूकीच्या रणधुमाळीत एकमेकांवर केवढी शब्दांची चिखलफेक केली जाते..? जातीजातीत केवढी तेढ निर्माण केली जाते..? आपली स्वतःची खोटी प्रतिष्ठा सिद्ध करण्यासाठी इतरांना किती तुच्छ शब्दांनी ताडण केले जाते..?

शब्द हा ईश्वराचे रुप आहे..! तो असा वापरा की, ऐकल्यावर लोकांना स्वर्गीय आनंद लाभावा..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक