शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

शब्द ईश्वराचे रुप, असे वापरावे की ऐकणाऱ्यास स्वर्गीय आनंद लाभेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 08:55 IST

शस्त्राने केलेली जखम एखादवेळी भरुन येईल पण शब्दाची जखम मात्र कधीही भरुन येत नाही. म्हणूनच म्हणतात ना की, शब्द हे शस्त्र आहे, जपून वापरावा..! शब्द हा ईश्वराचे रुप आहे. तो असा वापरा की, ऐकल्यावर लोकांना स्वर्गीय आनंद लाभावा..!

- युवा कीर्तनकार, ह.भ.प. ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी( बीड, महाराष्ट्र. ८७ ९३ ०३ ०३ ०३ ) 

श्रीसमर्थ रामदास स्वामींनी आपल्या वाङ्॒मयातून ऐहिक जीवनासाठी अत्यंत बोधप्रद अशी शिकवण दिली. खरं तर श्रीसमर्थ रामदास स्वामींची ही एक जरी शिकवण आपण अंगीकृत केली तरी लोक आपल्याला नक्कीच सज्जन म्हणतील. एका श्लोकांत श्रीसमर्थ रामदास स्वामी म्हणतात -

बरे सत्य बोला यथा तथ्य चाला ।बहू मानिती लोक येणे तुम्हाला ॥

महात्मा गांधी सत्यालाच देव म्हणत. इथेही श्रीसमर्थ रामदास स्वामी सत्य बोलण्याचाच उपदेश करतात. आता सत्य म्हणजे तरी काय..? सर्वकाळ सर्वांनाच जे हितकारक त्याला सत्य असे म्हणतात. भगवान श्रीकृष्ण श्रीमद् भगवद् गीतेमध्ये यालाच वाङ्॒मय तप असे म्हणतात. माणसाने बोलावे कसे..?तर गीतामाऊली सांगते -

अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितंच यत् ।स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्॒मयं तप उच्यते ॥

आपल्या बोलण्याने दुसर्‍याच्या मनांत उद्वेग तर निर्माण होणार नाही ना..? याचा बोलतांना म्हणजे बोलण्यापूर्वी विचार करायला हवा. आपण जे बोलतो ते प्रिय असावे, हितकारक असावे व सत्य असावे.

नुसतेच वर वर प्रिय असेल त्याला व्यापारी कृतीचे प्रिय म्हणावे लागेल. व्यापारी आपल्या मालाची विक्री व्हावी म्हणून किती गोड बोलतात..? याच गोड बोलण्याने ग्राहक फसतो आणि दुय्यम दर्जाचा माल खरेदी करतो. ही वृत्ती त्या बोलण्यात नसावी. बोलणे हितकारक असावे आणि प्रिय ही असावे. नाही तर कधी कधी असाही प्रत्यय येतो -

मधुतिष्ठति जिव्हाग्रे ह्रदये तु हलाहलम् ।

शस्त्राने केलेली जखम एखादवेळी भरुन येईल पण शब्दाची जखम मात्र कधीही भरुन येत नाही. म्हणूनच म्हणतात ना की, शब्द हे शस्त्र आहे, जपून वापरावा..!

आपल्या सत्य बोलण्याने व सत्य चालण्याने जगांत आपल्याला नक्कीच मान मान्यता मिळेल. आपले शब्द लोक प्रमाणभूत मानतील. एका कवीने अतिशय सुंदर वर्णन केले आहे. साहित्यिक म्हणतो -

शब्दांनीच पेटतात घरे.. देश.. आणि माणसे माणसेसुद्धा...शब्दच विझवतात आग.. शब्दांनी पेटलेल्या माणसांची.....शब्द नसते तर पडल्या नसत्या डोळ्यांतून आगीच्या ठिणग्यावाहिले नसते आसवांचे महापूर..आणि नसते कोणी गेले जवळ...नसते दूर...!

आज प्रगतीच्या क्षेत्रांत आपण एवढे प्रगल्भ झालो पण अजूनही जीवनांतील हा संतांचा विचार आचारसिद्ध होत नाही.निवडणूकीच्या रणधुमाळीत एकमेकांवर केवढी शब्दांची चिखलफेक केली जाते..? जातीजातीत केवढी तेढ निर्माण केली जाते..? आपली स्वतःची खोटी प्रतिष्ठा सिद्ध करण्यासाठी इतरांना किती तुच्छ शब्दांनी ताडण केले जाते..?

शब्द हा ईश्वराचे रुप आहे..! तो असा वापरा की, ऐकल्यावर लोकांना स्वर्गीय आनंद लाभावा..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक