शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

सदगुरुंना शरण का जावे ? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 17:21 IST

मनुष्य सुख मिळाले की अनंदीत होतो व दुःख आले की मनात कष्टी होतो.

सदगुरुंना शरण का जावे ? ते यासाठी की, सदगुरुंनी जे जाणले ते गम्य, तो सहज आकलन न होणारा आनंद गुरुकृपेने खर्‍या शिष्याला लाभतो. एकनाथ महाराज म्हणतात, गुरुंचा अशा दृष्टीने लाभलेला उपदेश  शिष्याला व्दंव्दात बांधु  शकत नाही.                  अदृष्टें देहीं वर्ततां देख । बाधूं न शके सुखासुख ।           हें गुरुगम्य अलोलिक । शिष्य श्रध्दिक पावती ॥

अदृष्ट म्हणजे जे नजरेत येत नाही. प्रारब्ध मनुष्याचे दृष्टीत येत नाही म्हणून त्याला संत अदृष्ट म्हणतात. नाथ माऊली म्हणतात, सदगुरु उपदेश करतात की, प्रारब्धाला स्वीकारले तर सुखासुख म्हणजे सुख व असुख म्हणजे दुःख मनुष्याला बांधु शकत नाहीत. जीवनात सुख व दुःख येणारच.  सुख दुःख आहे त्याचे नांवच संसार आहे. कधी सुख येते कधी दुख येते. ते अपरिहार्य आहे. दिवस व रात्र आळीपाळीने यावी तसे सुख दुःख येत राहतात. पण मनुष्य सुख मिळाले की अनंदीत होतो व दुःख आले की मनात कष्टी होतो.परंतु तुम्ही ते स्वीकारा, हे गुरुगम्य, हा गुरु उपदेश तुम्ही जाणला तर त्याचे अलौकिकत्व कळेल. पण हे तेव्हाच कळते जेव्हां शिष्य श्रध्दावान असेल. श्रध्दा असेल तरच गुरुगम्य जे आहे जाणले जाऊ शकते.  गुरुगम्य ज्याने जाणले त्याला सुख दुःख बाधु शकत नाहीत. गुरु जाणतात की, प्रारब्ध तर ब्रह्मज्ञान्यालाही चुकले नाही.        एकनाथ महाराज म्हणतात,         जरी झाले ब्रह्मज्ञान तरी ब्रह्मज्ञान्यालाही प्रारब्ध सुटत नाही. कारण मनुष्यानेच कर्मांना दिलेल्या गतीचा  प्रारब्ध परिणाम आहे. जसे कुलाल म्हणजे कुंभार चाकाला गती देतो व त्या चाकावर मातीचे भांडे हाताने आकार देवून तयार करतो व तयार झाले की उचलून घेतो. परंतु चाकाला जी गती दिली ती भांडे तयार झाले तरी थांबत नाही.  तसेच मोठे झाड जर मुळासकट उन्मळून पडले तरी क्षणात सुकत नाही. कारण झाडात जी अनेक वर्षाची संचित आर्द्रता आहे ती कायम राहते. तेव्हा गुरु उपदेश हाच असतो की, आलेल्या सुख दुःखाचे गतीला पहा, त्या चक्राला अजून गती देऊ नका. म्हणजे चक्र थांबेल. झाड सुकविण्याची घाई करु नका, तुम्ही पहा ते सुकेल. प्रारब्धाचे तसेच आहे. आपण सायकलला पॅडल मारले की, पॅडलने जी गती दिली तेवढी सायकल चालणार. म्हणून प्रारब्धाची असलेली गती थांबेपर्यंत शांत चित्ताने पाहणे जरुरी आहे. साधु संतांवर वा  विवेकवंतावर भोग आले तर ते स्वतःठायी असलेल्या शांतील धरुन वागतात. हा बोध  गुरुगम्य आहे.            श्रध्देवीण सर्वथा । गुरुगम्य न ये हाता          गुरुगम्येंवीण तत्त्वतां । द्वंद्वसमता कदा न घडे ॥शिष्याचे मनात, भक्ताचे मनात श्रध्दा नसेल तर गुरुने दिलेला बोध हाती येत नाही, अर्थात कळत नाही.  जर बोध झाला नाही तर सुख दुःखामध्ये समतेचा,  सुख दुःखाचे स्थितीत स्थिर राहण्याची स्थिती कधीही घडून येणे नाही. म्हणून सदगुरु चरणी लागून गुरुगम्य जाणावे.          अनंतकोटी ब्रह्मांडनायक  महाराजाधिराज योगीराजपरब्रह्म सच्चिदानंद समर्थ सदगुरू श्री गजानन महाराज की जय !

सदगुरु श्री एकनाथ महाराजांना श्रध्दा नमन !

शं.ना.बेंडे पाटील

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक