शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

'करावे तसे भरावे' का म्हणतात; वाचा ही हृदयस्पर्शी बोधकथा!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: February 22, 2021 10:56 IST

शक्य तेवढे सत्कर्म करत राहिले पाहिजे. त्याचे चांगले फळ मिळाले नाही, तरी एकवेळ चालेल, परंतु वाईट कर्माचे फळ मिळाल्यावाचून राहत नाही.

ज्योत्स्ना गाडगीळ 

आपण जे काही वागतो, त्या कर्माची परतफेड पुढच्या जन्मी वगैरे नाही, तर याच जन्मात करायची आहे. आपले सगळे भोग भोगून होईपर्यंत आपली या जन्मातून सुटका नाही, त्यालाच 'प्रारब्ध' म्हणतात. प्रारब्धाचे गाठोडे हलके करायचे असेल, तर चांगले कर्म करत राहा, म्हणजे फळही चांगलेच मिळेल. अन्यथा केलेल्या कर्माचे फळ भोगायला तयार राहा. जसे या शिकाऱ्याला भोगावे लागेल....

एक शिकारी होता. तो उत्तम शिकारी करत असे. शिकारी हा काही त्याचा व्यवसाय नव्हता, तो केवळ विरंगुळा होता़ मनात आले, की रोजचे काम संपवून तो शिकारीला जात असे. शिकार करून करून तो एवढा तरबेज झाला होता, की शिकार दिसली नाही, तरी नुसत्या आवाजाने तो शब्दवेधी बाण मारून शिकार करत असे. 

त्याने आपल्या मुलालाही शिकारीत पारंगत करायचे ठरवले. शिकारीला जाताना तो मुलालाही सोबत नेऊ लागला. मुलाला आपल्या वडिलांचा फार हेवा वाटे. आपल्यालाही मोठे होऊन अशी शिकार करता यावी, असे त्याला वाटू लागले. मुलगा घरी जाऊन आईला वडिलांच्या शौर्याचे किस्से सांगत असे. 

एक दिवस शिकारी एकटाच शिकारीला निघाला. नेहमीप्रमाणे त्याचे धनुष्य आणि बाण शिकारीसाठी सज्ज होते. शिकारीच्या शोधात असताना काही अंतरावर त्याला अतिशय सुंदर हरणाचे पाडस नजरेस पडले. दुसरे कोणी त्या पाडसाला पाहिले असते, तर त्याला मारण्याचा विचार दूरच, परंतु ते दृष्टीआड होऊ नये असे कोणालाही वाटले असते. एवढे ते गोंडस आणि साजिरे होते. परंतु शिकाऱ्याच्या डोक्यात केवळ शिकारीचे विचार असल्याने त्याच्या डोळ्यासमोर केवळ शिकार होती. पाडस तिथून पळ काढणार, तेवढ्यात शिकाऱ्याने बाण सोडला आणि बाणाने पाडस घायाळ झाले. 

अचूक निशाणा साधला या आनंदात शिकाऱ्याला स्वत:चेच कौतुक वाटले. पाडसाचा शोध घेत त्याची आई तिथे आली. तिने शिकाऱ्याकडे पाहिले. आपला जीव वाचवायचा सोडून ती पाडसाचा जीव वाचेल का, या प्रसत्नात त्याला गोंजारत होती. त्याच्या जखमेवर मायेची फुंकर घालत होती. तिला पाहून शिकारी अधिकच खुष झाला. आयती शिकार चालत आलेली पाहून त्याने आणखी एक बाण सोडला आणि हरिणीची शिकार केली. आपला पराक्रम दाखवण्यासाठी तो त्या दोघांना घेऊन घरी जाणार होता, तोच त्याच्या कानावर आणखी कसलीशी हालचाल पडली. आज नशीब बलवत्तर दिसत आहे, अशा विचाराने त्याने लक्ष्यवेधी बाण सोडला आणि तो बाण झाडाझुडपातून शिकाऱ्याकडे आनंदाने धाव घेणाऱ्या मुलाच्या वर्मी बसला. मुलगा जागीच गतप्राण झाला. मुलाची किंकाळी ऐकू येताच शिकारी त्या दिशेने धावला. मुलापाठोपाठ त्याची आई नवNयाचे कौतुक बघायला आली होती, ती आपल्या मुलाला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहताच हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मुलाच्या पायाशी जाऊन पडली. शिकारी तिथे पोहोचला, तोवर बायको आणि मुलगा यांचे प्राण गेलेले होते. त्या दोघांना पाहता, त्याला कोवळे पाडस आणि त्याच्या आईचे भावविभोर डोळे आठवले आणि आपल्या हातून घडलेल्या पापाची शिक्षा मिळताच त्याने मोठमोठ्याने टाहो फोडला. परंतु, त्या रडण्याला काहीच अर्थ नव्हता...!

म्हणून शक्य तेवढे सत्कर्म करत राहिले पाहिजे. त्याचे चांगले फळ मिळाले नाही, तरी एकवेळ चालेल, परंतु वाईट कर्माचे फळ मिळाल्यावाचून राहत नाही. यासाठीच मराठीत म्हण आहे, 'करावे तसे भरावे!'