शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

'करावे तसे भरावे' का म्हणतात; वाचा ही हृदयस्पर्शी बोधकथा!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: February 22, 2021 10:56 IST

शक्य तेवढे सत्कर्म करत राहिले पाहिजे. त्याचे चांगले फळ मिळाले नाही, तरी एकवेळ चालेल, परंतु वाईट कर्माचे फळ मिळाल्यावाचून राहत नाही.

ज्योत्स्ना गाडगीळ 

आपण जे काही वागतो, त्या कर्माची परतफेड पुढच्या जन्मी वगैरे नाही, तर याच जन्मात करायची आहे. आपले सगळे भोग भोगून होईपर्यंत आपली या जन्मातून सुटका नाही, त्यालाच 'प्रारब्ध' म्हणतात. प्रारब्धाचे गाठोडे हलके करायचे असेल, तर चांगले कर्म करत राहा, म्हणजे फळही चांगलेच मिळेल. अन्यथा केलेल्या कर्माचे फळ भोगायला तयार राहा. जसे या शिकाऱ्याला भोगावे लागेल....

एक शिकारी होता. तो उत्तम शिकारी करत असे. शिकारी हा काही त्याचा व्यवसाय नव्हता, तो केवळ विरंगुळा होता़ मनात आले, की रोजचे काम संपवून तो शिकारीला जात असे. शिकार करून करून तो एवढा तरबेज झाला होता, की शिकार दिसली नाही, तरी नुसत्या आवाजाने तो शब्दवेधी बाण मारून शिकार करत असे. 

त्याने आपल्या मुलालाही शिकारीत पारंगत करायचे ठरवले. शिकारीला जाताना तो मुलालाही सोबत नेऊ लागला. मुलाला आपल्या वडिलांचा फार हेवा वाटे. आपल्यालाही मोठे होऊन अशी शिकार करता यावी, असे त्याला वाटू लागले. मुलगा घरी जाऊन आईला वडिलांच्या शौर्याचे किस्से सांगत असे. 

एक दिवस शिकारी एकटाच शिकारीला निघाला. नेहमीप्रमाणे त्याचे धनुष्य आणि बाण शिकारीसाठी सज्ज होते. शिकारीच्या शोधात असताना काही अंतरावर त्याला अतिशय सुंदर हरणाचे पाडस नजरेस पडले. दुसरे कोणी त्या पाडसाला पाहिले असते, तर त्याला मारण्याचा विचार दूरच, परंतु ते दृष्टीआड होऊ नये असे कोणालाही वाटले असते. एवढे ते गोंडस आणि साजिरे होते. परंतु शिकाऱ्याच्या डोक्यात केवळ शिकारीचे विचार असल्याने त्याच्या डोळ्यासमोर केवळ शिकार होती. पाडस तिथून पळ काढणार, तेवढ्यात शिकाऱ्याने बाण सोडला आणि बाणाने पाडस घायाळ झाले. 

अचूक निशाणा साधला या आनंदात शिकाऱ्याला स्वत:चेच कौतुक वाटले. पाडसाचा शोध घेत त्याची आई तिथे आली. तिने शिकाऱ्याकडे पाहिले. आपला जीव वाचवायचा सोडून ती पाडसाचा जीव वाचेल का, या प्रसत्नात त्याला गोंजारत होती. त्याच्या जखमेवर मायेची फुंकर घालत होती. तिला पाहून शिकारी अधिकच खुष झाला. आयती शिकार चालत आलेली पाहून त्याने आणखी एक बाण सोडला आणि हरिणीची शिकार केली. आपला पराक्रम दाखवण्यासाठी तो त्या दोघांना घेऊन घरी जाणार होता, तोच त्याच्या कानावर आणखी कसलीशी हालचाल पडली. आज नशीब बलवत्तर दिसत आहे, अशा विचाराने त्याने लक्ष्यवेधी बाण सोडला आणि तो बाण झाडाझुडपातून शिकाऱ्याकडे आनंदाने धाव घेणाऱ्या मुलाच्या वर्मी बसला. मुलगा जागीच गतप्राण झाला. मुलाची किंकाळी ऐकू येताच शिकारी त्या दिशेने धावला. मुलापाठोपाठ त्याची आई नवNयाचे कौतुक बघायला आली होती, ती आपल्या मुलाला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहताच हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मुलाच्या पायाशी जाऊन पडली. शिकारी तिथे पोहोचला, तोवर बायको आणि मुलगा यांचे प्राण गेलेले होते. त्या दोघांना पाहता, त्याला कोवळे पाडस आणि त्याच्या आईचे भावविभोर डोळे आठवले आणि आपल्या हातून घडलेल्या पापाची शिक्षा मिळताच त्याने मोठमोठ्याने टाहो फोडला. परंतु, त्या रडण्याला काहीच अर्थ नव्हता...!

म्हणून शक्य तेवढे सत्कर्म करत राहिले पाहिजे. त्याचे चांगले फळ मिळाले नाही, तरी एकवेळ चालेल, परंतु वाईट कर्माचे फळ मिळाल्यावाचून राहत नाही. यासाठीच मराठीत म्हण आहे, 'करावे तसे भरावे!'