शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
3
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
4
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
5
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
6
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
7
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
8
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
9
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
10
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
11
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
12
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
13
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
14
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
15
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
16
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
17
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
18
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
19
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
20
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या

गणपतीला दुर्वा का वाहतात? दुर्वा वाहताना त्याचे टोक कोणत्या दिशेने असावे, जाणून घ्या. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 08:41 IST

एवढा वैभवसंपन्न बाप्पा दुर्वांच्या त्रिदलाने संतुष्ट का होतो, हा प्रश्न आपल्याही मनात उद्भवला असेल. 

हिंदू दैवतांचे वैशिष्ट्य पाहिले, तर सर्व देव निसर्गाशी जोडलेले आहेत. शंकराला बेल, कृष्णाला तुळस, विष्णूला कमळ, तर गणपतीला दुर्वा प्रिय आहेत, असे म्हणतात. याचाच अर्थ परमेश्वर भक्ती भावाने अर्पण केलेल्या फुला फळानेही प्रसन्न होतो, फक्त ते अर्पण करताना आपल्या मनीचा भाव शुद्ध हवा.

आज संकष्टी. घरोघरी बाप्पाचे आवडते मोदक केले जातील व भक्तिभावे दुर्वांकुर वाहिले जाईल. एवढा वैभवसंपन्न बाप्पा दुर्वांच्या त्रिदलाने संतुष्ट का होतो, हा प्रश्न आपल्या मनात उद्भवला असेल. 

त्यामागील पौराणिक कथा : 

ऋषी मुनी आणि देवता यांना अनलासूर नावाचा राक्षस त्रास देत होता. देवतांच्या विनंतीवरून गणरायाने त्याच्याशी युद्ध केले आणि शेवटी त्या असूराला गिळून टाकले. तो असुर अग्नीसारखा तप्त होता. त्याला गिळल्यामुळे गणेशाच्या पोटात जळजळ होऊ लागली. तेव्हा ८८ सहस्त्र मुनींनी प्रत्येकी २१ अशा हिरव्यागार दुर्वांच्या जुड्या गणरायाच्या मस्तकावर ठेवल्या आणि कश्यप ऋषींनी दुर्वांच्या २१ दुर्वांची जुडी गणेशाला खाण्यास दिली. त्यावेली अथक प्रयत्नानंतरही गणेशाच्या पोटातली न थांबलेली जळजळ कमी झाली.त्यावेळी, गणरायाने सांगितले, यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ, व्रते, दान व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल. म्हणून गणपतीला दुर्वा वाहिल्या जातात.

दुर्वा कशा वहाव्यात?

दुर्वा म्हणजे गवत. जे सहजपणे कुठेही उपलब्ध होते. दुर्वांच्या एका जुडीत २१ दुर्वा असतात. या जुडीसाठी प्रत्येक दुर्वा निवडताना त्यात त्रिदल असलेले पाते निवडले जाते. त्याची जुडी सुटू नये म्हणून दोऱ्याने बांधली जाते. अनेक ठिकाणी अशा २१ जुड्यांचा हार बनवून देवाला दुर्वांची कंठी घातली जाते. त्यानिमित्ताने दुर्वांची जुडी बनवताना अथर्वशीर्षाची २१ आवर्तनेदेखील केली जातात. वेळेअभावी ते शक्य नसेल, तर निदान एक जुडी तरी स्वहस्ते बनवून एक आवर्तन म्हणून गणरायाला दुर्वा अर्पण कराव्यात. तेही शक्य नसेल, तर निदान दुर्वाचे एक त्रिदल त्याचा अग्रभाग अर्थात टोकाची बाजू आपल्याकडे घेऊन निमुळती बाजू बाप्पाकडे ठेवून भक्तिभावे अर्पण करावी. 

दुर्वांना धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्ट्या अतिशय महत्त्व आहे. कारण दुर्वांचा गुणधर्म अनेक प्रकारच्या रोगांना 'दूर व्हा' असे सांगतो, अर्थात दूर ठेवतो. त्याबद्दल चर्चा पुन्हा कधी. तूर्तास 'वाहतो ही दुर्वांची जुडी' म्हणत बाप्पा मोरया करूया!!!