शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

पूर्वीचे लोक 'परान्न' का टाळत असत, त्यामागे 'हे' कारण होते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 11:00 IST

आपण स्वत:चे नीट परिक्षण केले, तर अन्न सेवनानंतर आपल्या मनोवृत्तीत घडणारे बदल आपल्याला सहज लक्षात येतील.

'अन्न हे पूर्णब्रह्म' मानतो. परंतु सद्यस्थितीत आपण अन्नग्रहण करताना कुठलेच नियम पाळत नाही. अरबट-चरबट खात राहतो.  त्या खाण्याचे परिणाम आपल्या शरीरावरच नाही, तर मनावरदेखील होतात. अन्नग्रहण हा एक संस्कार आहे. तो योग्य रितीने पाळला गेला पाहीजे, असा पूर्वीच्या लोकांचा कटाक्ष असे. 

साधकावस्थेमध्ये आणि सिद्धावस्थेमध्येसुद्धा आहाराकडे सुक्ष्म स्तरावर लक्ष ठेवावे लागते. एक सिद्धान्त असा आहे, की प्रत्येक माणसाभोवती त्याच्या वृत्तीचे वलय असते. अर्थातच तो माणूस ज्या ज्या वस्तूंना स्पर्श करतो, त्याच्यावर त्याच्या वृत्तीचा ठसा उमटतो, हाच संस्कार होय. सुंस्कारित व्यक्तीकडून शिजवले गेलेले  अन्न साधकाला तारक असते. तसेच खाण्याचा पदार्थही दोषविरहित  असावा लागतो. करण, त्याचेही परिणाम साधकावर होतात. 

परमपूज्य योगी अरविंदबाबूंचे आज्ञापालन करीत असताना एकदा एक लहानशी चूक माताजींच्या हातून घडली. एका जुन्या ओळखीच्या घरचे त्यांनी जेवणाचे निमंत्रण स्वीकारले. बोलावणारी व्यक्ती सुसंस्कारित होती. जेवणाचा बेतही स्वच्छ, स्तुत्य होता. सुंदर वैचारिक पातळीवर भोजन झाले. 

माताजी आश्रमात परतल्या, परंतु काय झाले कुणास ठाऊक? प्रत्येकाचा गळा दाबून ठार मारावे, अशी ऊर्मी माताजींच्या मनात समुद्रलहरींप्रमाणे उसळ्या मारू लागली. पहिल्यांदा या गोष्टीकडे दुर्लक्ष गेले, परंतु ती ऊर्मी, पकड घट्ट करीत आहे हे लक्षात येताच माताजी भांबवल्या. योगी अरविंदबाबूंच्या खोलीत जाऊन त्यांनी हा सर्व प्रकार सांगितला. योगी अरविंदबाबूंना सर्व प्रकार समजला. ते म्हणाले, 'तू जिथे अन्न खाल्लेस ती माणसे चांगली होती, परंतु जेवण बनवणारा आचारी पूर्वी खाटिक होता. त्याच्या वृत्तीप्रमाणे जेवण बनवताना मनात हिंस्र विचार होते. म्हणून ते अन्न खाताना त्याच्या मनोलहरी अन्नात उतरल्या आणि तुझ्या मनोलहरींशी जुळल्या. म्हणून तुझ्याही मनात तसेच विचार आले.'

हा अनुभव वाचल्यावर आपल्याला कदाचित अतिशयोक्ती वाटू शकेल. परंतु, आपण स्वत:चे नीट परिक्षण केले, तर अन्न सेवनानंतर आपल्या मनोवृत्तीत घडणारे बदल आपल्याला सहज लक्षात येतील. म्हणून पूर्वीच्या काळी लोक परान्न टाळत असत. केवळ घरी केलेले भोजन ग्रहण करत असत. 

परंतु, सद्यस्थिती अशी आहे, की आपण घरात कमी आणि बाहेर जास्त खाता़े अशा वेळी अन्नावर झालेले संस्कार कसे टाळायचे, त्यावर मनाच्या श्लोकांमध्ये समर्थ रामदास स्वामी पर्याय सुचवतात, हरी नाम घेत शांतचित्ताने अन्नसेवन करा, जेणेकरून ते दोषविरहित असेल. 

जनी भोजनी नाम वाचे वदावे,अती आदरे गद्यघोषे म्हणावे,हरीचिंतने अन्न सेवीत जावे,तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे।। श्रीराम।।