शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

फुटे तरूवर उष्णकाळमासी, 'जीवन' तयासी कोण घाली? (भाग १)

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: October 6, 2020 22:23 IST

आपल्या बागेत एक फुल उमलले, तर त्याचे श्रेय आपण आपल्याकडे घेतो, परंतु जो अखिल विश्वाचा मळा फुलवतोय, त्याला सपशेल विसरतो.

ठळक मुद्देभगवंत निसर्गाच्या रूपाने कित्येक गोष्टी आपल्याला शिकवत असतो. परंतु, आपणच शिकत नाही.

ज्योत्स्ना गाडगीळ

शहरातल्या घरात राहायची मारामार, तिथे बागबगिच्यांची हौस कुठून पुरवणार? पुरवलीच, तरी रोजच्या धावपळीत निगा कोण राखणार, हा मोठा प्रश्नच! मात्र, गेल्या सहा-सात महिन्यात घरात राहून मातीची चांगलीच नाळ जोडली गेली आहे. एक-दोन नाही, चांगली वीस-तीस रोपटी लावली आहेत. रोजची मशागत. निगराणी, खतपाणी यांमुळे एकेका पाना-फुलाशी घट्ट मैत्री झाली आहे. आपण एखाद्या जीवाची निगा राखतोय, वाढवतोय, पालन-पोषण करतोय, या विचाराने कळत-नकळत मनात अहंकार सुखावत होता.

हेही वाचा: देवाकडे काय मागितलं, तर सगळे प्रश्न सुटतील?... सांगताहेत सद्गुरू वामनराव पै

आज सकाळी, अशाच एका बाळसं धरलेल्या रोपट्याच्या अंगाखांद्यावर तीन-चार गुलाबाच्या कळ्या उमलल्या. ते चित्र पाहताना कोण एक आनंद झाला. हा आनंद इतरांना सांगितल्याशिवाय राहवेना. फोटो काढून समाज माध्यमांवर टाकावा, असा विचार डोकावला. शे-दीडशे लाईक पक्के, असा मनानेच मनाला कौल दिला. चहाचा कप बाजूला सारून, मोबाईल कॅमेरा घेत पुढे सरसावले. कॅमेरा अँगल सेट केला. कॅमेऱ्याने आपणहून चार गुलाबांवर फेस अँगल धरला. प्रतिमा स्थिरावण्याची वाट बघत, योग्य क्षणी क्लिक करणार, तोच कॅमेऱ्याने पाचवा चौकोन सेट केला. त्यात इमारतीसमोरच्या कुंपणापलीकडे इतस्तत: वाढलेल्या झाडाझुडपातल्या रानफुलाला, कॅमेऱ्याने गुलाबाच्या फुलांबरोबर सामावून घेतले. त्याक्षणी अहंकार गळून पडला आणि तुकाराम महाराजांचे शब्द आठवले,

फुटे तरूवर उष्ण काळमासी, जीवन तयासी कोण घाली?

आपल्या बागेत एक फुल उमलले, तर त्याचे श्रेय आपण आपल्याकडे घेतो, परंतु जो अखिल विश्वाचा मळा फुलवतोय, त्याला सपशेल विसरतो. याच गोष्टीची तुकाराम महाराज आठवण करून देतात, 'जीवन' तयासी कोण घाली? जीवन म्हणजे पाणी. उन्हाळ्यात निष्पर्ण झालेल्या झाडाला, तुम्ही कधी पाणी द्यायला गेलेलात का हो? नाही ना? तरी ऋतुचक्र फिरताच निष्पर्ण झाडावर पालवी फुटते. झाड मोहरते आणि पाहता पाहता पाना-फुलांनी, फळांनी डवरते. त्याच झाडाच्या सावलीत जाऊन आपण उभे राहतो. ते कोणी वाढवले, कोणी जगवले? त्या ईश्वराची कायम आठवण राहू द्या.

भगवंत निसर्गाच्या रूपाने कित्येक गोष्टी आपल्याला शिकवत असतो. परंतु, आपणच शिकत नाही. कितीतरी गोष्टींचा फुका अहंकार बाळगतो. मात्र, आपण फक्त निमित्तमात्र आहोत,'बोलविता धनि वेगळाचि' याचे भान संत आपल्याला वेळोवेळी करून देतात आणि मी मी, करणाऱ्या मनुष्याला विचारतात, 

का रे नाठविसी कृपाळू देवासी,पोषितो जगासी एकलाची।

(क्रमश:)

हेही वाचा: अर्जुनाने श्रीकृष्णावर दाखवला तसा आपला देवावर खरा विश्वास आहे का?... वाचा, एका छोट्या मुलीची गोष्ट