शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
5
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
6
PM Kisan योजनेच्या २० हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
7
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
8
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
9
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
10
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
11
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
12
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
13
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
14
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
15
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
16
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
17
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
18
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...
19
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
20
दहावीतील गुणांवरून नातेवाईकांनी उडवली होती खिल्ली, आता तरुणाने बँकेचा SMS दाखवला; आकडा पाहून 'बोलती बंद'

फुटे तरूवर उष्णकाळमासी, 'जीवन' तयासी कोण घाली? (भाग १)

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: October 6, 2020 22:23 IST

आपल्या बागेत एक फुल उमलले, तर त्याचे श्रेय आपण आपल्याकडे घेतो, परंतु जो अखिल विश्वाचा मळा फुलवतोय, त्याला सपशेल विसरतो.

ठळक मुद्देभगवंत निसर्गाच्या रूपाने कित्येक गोष्टी आपल्याला शिकवत असतो. परंतु, आपणच शिकत नाही.

ज्योत्स्ना गाडगीळ

शहरातल्या घरात राहायची मारामार, तिथे बागबगिच्यांची हौस कुठून पुरवणार? पुरवलीच, तरी रोजच्या धावपळीत निगा कोण राखणार, हा मोठा प्रश्नच! मात्र, गेल्या सहा-सात महिन्यात घरात राहून मातीची चांगलीच नाळ जोडली गेली आहे. एक-दोन नाही, चांगली वीस-तीस रोपटी लावली आहेत. रोजची मशागत. निगराणी, खतपाणी यांमुळे एकेका पाना-फुलाशी घट्ट मैत्री झाली आहे. आपण एखाद्या जीवाची निगा राखतोय, वाढवतोय, पालन-पोषण करतोय, या विचाराने कळत-नकळत मनात अहंकार सुखावत होता.

हेही वाचा: देवाकडे काय मागितलं, तर सगळे प्रश्न सुटतील?... सांगताहेत सद्गुरू वामनराव पै

आज सकाळी, अशाच एका बाळसं धरलेल्या रोपट्याच्या अंगाखांद्यावर तीन-चार गुलाबाच्या कळ्या उमलल्या. ते चित्र पाहताना कोण एक आनंद झाला. हा आनंद इतरांना सांगितल्याशिवाय राहवेना. फोटो काढून समाज माध्यमांवर टाकावा, असा विचार डोकावला. शे-दीडशे लाईक पक्के, असा मनानेच मनाला कौल दिला. चहाचा कप बाजूला सारून, मोबाईल कॅमेरा घेत पुढे सरसावले. कॅमेरा अँगल सेट केला. कॅमेऱ्याने आपणहून चार गुलाबांवर फेस अँगल धरला. प्रतिमा स्थिरावण्याची वाट बघत, योग्य क्षणी क्लिक करणार, तोच कॅमेऱ्याने पाचवा चौकोन सेट केला. त्यात इमारतीसमोरच्या कुंपणापलीकडे इतस्तत: वाढलेल्या झाडाझुडपातल्या रानफुलाला, कॅमेऱ्याने गुलाबाच्या फुलांबरोबर सामावून घेतले. त्याक्षणी अहंकार गळून पडला आणि तुकाराम महाराजांचे शब्द आठवले,

फुटे तरूवर उष्ण काळमासी, जीवन तयासी कोण घाली?

आपल्या बागेत एक फुल उमलले, तर त्याचे श्रेय आपण आपल्याकडे घेतो, परंतु जो अखिल विश्वाचा मळा फुलवतोय, त्याला सपशेल विसरतो. याच गोष्टीची तुकाराम महाराज आठवण करून देतात, 'जीवन' तयासी कोण घाली? जीवन म्हणजे पाणी. उन्हाळ्यात निष्पर्ण झालेल्या झाडाला, तुम्ही कधी पाणी द्यायला गेलेलात का हो? नाही ना? तरी ऋतुचक्र फिरताच निष्पर्ण झाडावर पालवी फुटते. झाड मोहरते आणि पाहता पाहता पाना-फुलांनी, फळांनी डवरते. त्याच झाडाच्या सावलीत जाऊन आपण उभे राहतो. ते कोणी वाढवले, कोणी जगवले? त्या ईश्वराची कायम आठवण राहू द्या.

भगवंत निसर्गाच्या रूपाने कित्येक गोष्टी आपल्याला शिकवत असतो. परंतु, आपणच शिकत नाही. कितीतरी गोष्टींचा फुका अहंकार बाळगतो. मात्र, आपण फक्त निमित्तमात्र आहोत,'बोलविता धनि वेगळाचि' याचे भान संत आपल्याला वेळोवेळी करून देतात आणि मी मी, करणाऱ्या मनुष्याला विचारतात, 

का रे नाठविसी कृपाळू देवासी,पोषितो जगासी एकलाची।

(क्रमश:)

हेही वाचा: अर्जुनाने श्रीकृष्णावर दाखवला तसा आपला देवावर खरा विश्वास आहे का?... वाचा, एका छोट्या मुलीची गोष्ट