शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
3
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
4
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
7
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
8
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
9
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
10
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
11
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
12
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
13
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
14
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
15
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
16
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
17
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
18
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
19
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
20
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!

संत कबीर संत जनाबाईंना भेटायला गेले, तेव्हा त्या चक्क भांडत होत्या; पण कशासाठी? वाचा!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: February 13, 2021 12:00 IST

'काम असावा ईश्वर' या उक्तीची प्रचिती देणारी गोष्ट!

काम सगळेच करतात, पण काही जण कामात राम शोधतात तर काही जण कामात राम ओततात. संत कबीरांनी संत जनाबाईंची भेट घेतली, त्यावेळेस त्यांना जनाबाईंच्या विठ्ठल भक्तीची आणि त्यांच्या अधिकाराची प्रचिती आली. परंतु, ती भेट थोडी मजेशीर होती. संत जनाबाई या नावाभोवती शांत, सात्विक भाव असलेली व्यक्ती संत कबीरांना अपेक्षित होती. मात्र, प्रत्यक्ष भेटीतले चित्र काही वेगळेच होते. संत जनाबाई सांसारिक स्त्रियांसारख्या चक्क भांडत होत्या. परंतु हे भांडण देखील परमार्थाची अनुभूती देणारे भांडण होते. 

संतराज कबीर, संत जनाबाईंचे फक्त नाव ऐकून होते. त्यांना भेटावे म्हणून ते एकदा त्यांच्या गावी आले. गावाबाहेर पाणवठ्यावर दोन बायका कचाकचा बांडत होत्या. 'जनाबाई कोठे राहतात', असे त्यांना विचारायची सोय नव्हती. ते तसेच पुुढे आले. दहा बारा वर्षाच्या एका मुलाला त्यांनी तो प्रश्न विचारला, 'जनी व्हय? ती नव्ह का भांडतीय ती!' असे म्हणून पोरगा चालता झाला. त्याच्या बोलण्यावर विश्वास न बसल्यामुळे कबीरांनी तोच प्रश्न पुढे होऊन एका मोठ्या माणसाला विचारला. त्यानेपण तेच उत्तर दिले. शेवटी त्या बाईजवळ ते आले व म्हणाले, 'संत जनाबाई आपणच काय?

भांडणाच्या सुराचे एकदम सुस्वरात रुपांतर होऊन उत्तर आले, 'होय मीच जनी, विठ्ठलाची जनी!' त्यावर कबीर म्हणाले, 'संत असून भांडणाचा पवित्रा?' त्यावर जनाबाईंनी समोरील गोवऱ्यांच्या दोन सारख्या ढीगांकडे बोट दाखवून म्हटले, `हे दोन्ही ढीग सारखेच दिसतात, खरे ना? परंतु हा उजवीकडील ढीग माझा आहे. व ही गंगी ते मान्यच करत नाहीये. सरळ सांगून पटत नाही, आता दाखवतेच तिला माझा इंगा.'

एवढे बोलून त्या बाईला जनाबाई म्हणाली, 'काय ग तुझ्या ढिगाला काही खूण आहे?' त्यावर गंगी वैतागून म्हणाली, गोवऱ्यांना कसली आलीय डोंबलाची खूण? सर्व गोवऱ्या सारख्याच दिसतायत डोळ्यांना.' त्यावर हात कमरेवर ठेवून जनाबाई ठसक्यात म्हणाली, 'गंगे तोंड सांभाळून बोल. कामे तर सगळेच करतात, पण कशी करतात हा प्रश्न आहे. या उजव्या ढिगातील प्रत्येक गोवरी कानाला लावून बघ, त्यातून 'विठ्ठल विठ्ठल' आवाज आला नाही, तर नावाची जनी नाही.'

तिच्या या भाषणाने गंगीच नाही, तर संत कबीरांसकट सर्व मंडळी पुढे आली आणि सर्वांना जनीच्या बोलण्याची प्रचिती आली. जनीच्या चेहऱ्यावर तेव्हा 'संत काही बावळट नसतात', हे सांगणारे मिस्कील भाव आणि कटेवर हात ठेवून उभी असलेल्या रुख्मिणीसारखी देहबोली होती. तिचे ते रूप पाहून संत कबीरांना जनीच्या विठ्ठल भक्तीची प्रचिती आली. या प्रसंगावरून समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकातील श्लोकआठवतो- 

सदा देवकांजी झिजे देह ज्याचा सदा रामनामे वदे नित्य वाचा,स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा,जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा।। श्रीराम।।