शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
4
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
5
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
6
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
7
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
8
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
9
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
10
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
11
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
12
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
13
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
14
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
15
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
16
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
17
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
18
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
19
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
20
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

मन शुद्ध झाले की, जे काही कर्म घडेल, ते ही शुद्धच होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 14:40 IST

आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी सारासार विचार करावा. कारण देह हा क्षणभंगूर आहे. आपण विचार करतो पण उद्धाराचा नाही, तर विषयाचा करतो. आपली बुद्धी विषय सुखाशिवाय इतर कशाचा विचार करावयास तयारच नसते..!

- युवा कीर्तनकार, ह.भ.प. ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी( बीड, महाराष्ट्र , ८७ ९३ ०३ ०३ ०३ ) 

वासनेची शुद्धी झाल्यावरच मन शुद्ध होते. एकदा का मन शुद्ध झाले की, मनाने जे काही कर्म घडेल, ते ही शुद्धच होईल. मन शुद्धीसाठी सारासार विचार हा ही एक महत्वाचा टप्पा आहे. मन निर्विचारी तर राहूच शकत नाही. सतत विचार करीत राहणे हा तर मनाचा स्वभाव आहे पण हा विचार करतांना सार काय आणि असार काय..? हिताचे काय आणि अहिताचे काय..? याचा विवेक हवा. विचार करा पण कोणता करा..? तर संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात -

क्षणो क्षणा हाचि करावा विचार । तरावया पार भवसिंधू ।नाशिवंत देह जाणार सकळ । आयुष्य खातो काळ सावधान ॥

आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी सारासार विचार करावा. कारण देह हा क्षणभंगूर आहे. आपण विचार करतो पण उद्धाराचा नाही, तर विषयाचा करतो. आपली बुद्धी विषय सुखाशिवाय इतर कशाचा विचार करावयास तयारच नसते. कारण -

अनंत बुद्धीचे तरंग । क्षणाक्षणा पालटती रंग ।धरुं जाता संग । तव तो होतो बाधक ॥

विषयसंग हाच तर आत्मज्ञानासाठी बाधक आहे. म्हणून विचारवंत लोकांच्या संगतीत (संतसंगतीत) जीवन घालविले तर विवेक प्राप्त होतो.

संत समागमी धरावी आवडी..!

माणसें प्रपंचाचा विचार करतात पण जो झालाच नाही त्याचा काय विचार करावयाचा..? हस्तामलक ग्रंथकार म्हणतात -

प्रपंच एक झाला होता । हें समूळचि मिथ्या वार्ता ।पुढे होईल मागुता । हें कल्पांती घडेना ॥

आपण म्हणाल, प्रपंच असार आहे, तो झालाच नाही तर मग आम्हांला प्रपंच दिसतो व भासतो कसा..? तुकोबा म्हणतात -

रज्जू सर्पाकार । भासियले जगडंबर ॥

दोरीच्या ठिकाणी भासणारा साप नाहिसा होण्यासाठी तो काठीने मारावा लागेल का हो..? अहो..! त्याठिकाणी प्रकाश आणला की - साप किंवा दोरी याचे योग्य ज्ञान होईल..! तेव्हा जीवाला जन्म ही नाही आणि मरण ही नाही. मूळ कूटस्थ..!त्याच्यावर अन्तःकरणाचा आश्रय केलेल्या कूटस्थाचा आभास आला की - त्यास जन्म म्हणतात व ते अन्तःकरण विस्कळीत होऊन आभासाचे भान नष्ट झाले की - त्यास मरण म्हणतात.आपण तर स्वभावतःच मुक्त आहोत याचा विवेक असणे म्हणजेच - मना अंतरी सार विचार राहो..!

ज्ञानेश्वर महाराज म्हणतात -

तरी माया ऐसी व्याप्ती । नसतीच यया आथी ।का वांझेचि संतती । वानणें जैसे ॥

त्यामुळे अशी मिथ्या माया आणि तिच्यापासून झालेल्या मिथ्या संसाराचा विचार न करता सार विचार व असाराचा त्याग करावा असे श्रीसमर्थ रामदास स्वामी आपणांस प्रतिपादन करतात.

॥ जय जय रघुवीर समर्थ  ॥

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक