शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

मन शुद्ध झाले की, जे काही कर्म घडेल, ते ही शुद्धच होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 14:40 IST

आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी सारासार विचार करावा. कारण देह हा क्षणभंगूर आहे. आपण विचार करतो पण उद्धाराचा नाही, तर विषयाचा करतो. आपली बुद्धी विषय सुखाशिवाय इतर कशाचा विचार करावयास तयारच नसते..!

- युवा कीर्तनकार, ह.भ.प. ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी( बीड, महाराष्ट्र , ८७ ९३ ०३ ०३ ०३ ) 

वासनेची शुद्धी झाल्यावरच मन शुद्ध होते. एकदा का मन शुद्ध झाले की, मनाने जे काही कर्म घडेल, ते ही शुद्धच होईल. मन शुद्धीसाठी सारासार विचार हा ही एक महत्वाचा टप्पा आहे. मन निर्विचारी तर राहूच शकत नाही. सतत विचार करीत राहणे हा तर मनाचा स्वभाव आहे पण हा विचार करतांना सार काय आणि असार काय..? हिताचे काय आणि अहिताचे काय..? याचा विवेक हवा. विचार करा पण कोणता करा..? तर संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात -

क्षणो क्षणा हाचि करावा विचार । तरावया पार भवसिंधू ।नाशिवंत देह जाणार सकळ । आयुष्य खातो काळ सावधान ॥

आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी सारासार विचार करावा. कारण देह हा क्षणभंगूर आहे. आपण विचार करतो पण उद्धाराचा नाही, तर विषयाचा करतो. आपली बुद्धी विषय सुखाशिवाय इतर कशाचा विचार करावयास तयारच नसते. कारण -

अनंत बुद्धीचे तरंग । क्षणाक्षणा पालटती रंग ।धरुं जाता संग । तव तो होतो बाधक ॥

विषयसंग हाच तर आत्मज्ञानासाठी बाधक आहे. म्हणून विचारवंत लोकांच्या संगतीत (संतसंगतीत) जीवन घालविले तर विवेक प्राप्त होतो.

संत समागमी धरावी आवडी..!

माणसें प्रपंचाचा विचार करतात पण जो झालाच नाही त्याचा काय विचार करावयाचा..? हस्तामलक ग्रंथकार म्हणतात -

प्रपंच एक झाला होता । हें समूळचि मिथ्या वार्ता ।पुढे होईल मागुता । हें कल्पांती घडेना ॥

आपण म्हणाल, प्रपंच असार आहे, तो झालाच नाही तर मग आम्हांला प्रपंच दिसतो व भासतो कसा..? तुकोबा म्हणतात -

रज्जू सर्पाकार । भासियले जगडंबर ॥

दोरीच्या ठिकाणी भासणारा साप नाहिसा होण्यासाठी तो काठीने मारावा लागेल का हो..? अहो..! त्याठिकाणी प्रकाश आणला की - साप किंवा दोरी याचे योग्य ज्ञान होईल..! तेव्हा जीवाला जन्म ही नाही आणि मरण ही नाही. मूळ कूटस्थ..!त्याच्यावर अन्तःकरणाचा आश्रय केलेल्या कूटस्थाचा आभास आला की - त्यास जन्म म्हणतात व ते अन्तःकरण विस्कळीत होऊन आभासाचे भान नष्ट झाले की - त्यास मरण म्हणतात.आपण तर स्वभावतःच मुक्त आहोत याचा विवेक असणे म्हणजेच - मना अंतरी सार विचार राहो..!

ज्ञानेश्वर महाराज म्हणतात -

तरी माया ऐसी व्याप्ती । नसतीच यया आथी ।का वांझेचि संतती । वानणें जैसे ॥

त्यामुळे अशी मिथ्या माया आणि तिच्यापासून झालेल्या मिथ्या संसाराचा विचार न करता सार विचार व असाराचा त्याग करावा असे श्रीसमर्थ रामदास स्वामी आपणांस प्रतिपादन करतात.

॥ जय जय रघुवीर समर्थ  ॥

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक