शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

मन शुद्ध झाले की, जे काही कर्म घडेल, ते ही शुद्धच होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 14:40 IST

आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी सारासार विचार करावा. कारण देह हा क्षणभंगूर आहे. आपण विचार करतो पण उद्धाराचा नाही, तर विषयाचा करतो. आपली बुद्धी विषय सुखाशिवाय इतर कशाचा विचार करावयास तयारच नसते..!

- युवा कीर्तनकार, ह.भ.प. ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी( बीड, महाराष्ट्र , ८७ ९३ ०३ ०३ ०३ ) 

वासनेची शुद्धी झाल्यावरच मन शुद्ध होते. एकदा का मन शुद्ध झाले की, मनाने जे काही कर्म घडेल, ते ही शुद्धच होईल. मन शुद्धीसाठी सारासार विचार हा ही एक महत्वाचा टप्पा आहे. मन निर्विचारी तर राहूच शकत नाही. सतत विचार करीत राहणे हा तर मनाचा स्वभाव आहे पण हा विचार करतांना सार काय आणि असार काय..? हिताचे काय आणि अहिताचे काय..? याचा विवेक हवा. विचार करा पण कोणता करा..? तर संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात -

क्षणो क्षणा हाचि करावा विचार । तरावया पार भवसिंधू ।नाशिवंत देह जाणार सकळ । आयुष्य खातो काळ सावधान ॥

आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी सारासार विचार करावा. कारण देह हा क्षणभंगूर आहे. आपण विचार करतो पण उद्धाराचा नाही, तर विषयाचा करतो. आपली बुद्धी विषय सुखाशिवाय इतर कशाचा विचार करावयास तयारच नसते. कारण -

अनंत बुद्धीचे तरंग । क्षणाक्षणा पालटती रंग ।धरुं जाता संग । तव तो होतो बाधक ॥

विषयसंग हाच तर आत्मज्ञानासाठी बाधक आहे. म्हणून विचारवंत लोकांच्या संगतीत (संतसंगतीत) जीवन घालविले तर विवेक प्राप्त होतो.

संत समागमी धरावी आवडी..!

माणसें प्रपंचाचा विचार करतात पण जो झालाच नाही त्याचा काय विचार करावयाचा..? हस्तामलक ग्रंथकार म्हणतात -

प्रपंच एक झाला होता । हें समूळचि मिथ्या वार्ता ।पुढे होईल मागुता । हें कल्पांती घडेना ॥

आपण म्हणाल, प्रपंच असार आहे, तो झालाच नाही तर मग आम्हांला प्रपंच दिसतो व भासतो कसा..? तुकोबा म्हणतात -

रज्जू सर्पाकार । भासियले जगडंबर ॥

दोरीच्या ठिकाणी भासणारा साप नाहिसा होण्यासाठी तो काठीने मारावा लागेल का हो..? अहो..! त्याठिकाणी प्रकाश आणला की - साप किंवा दोरी याचे योग्य ज्ञान होईल..! तेव्हा जीवाला जन्म ही नाही आणि मरण ही नाही. मूळ कूटस्थ..!त्याच्यावर अन्तःकरणाचा आश्रय केलेल्या कूटस्थाचा आभास आला की - त्यास जन्म म्हणतात व ते अन्तःकरण विस्कळीत होऊन आभासाचे भान नष्ट झाले की - त्यास मरण म्हणतात.आपण तर स्वभावतःच मुक्त आहोत याचा विवेक असणे म्हणजेच - मना अंतरी सार विचार राहो..!

ज्ञानेश्वर महाराज म्हणतात -

तरी माया ऐसी व्याप्ती । नसतीच यया आथी ।का वांझेचि संतती । वानणें जैसे ॥

त्यामुळे अशी मिथ्या माया आणि तिच्यापासून झालेल्या मिथ्या संसाराचा विचार न करता सार विचार व असाराचा त्याग करावा असे श्रीसमर्थ रामदास स्वामी आपणांस प्रतिपादन करतात.

॥ जय जय रघुवीर समर्थ  ॥

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक