शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकणाऱ्या ध्वजामागचे नेमके रहस्य काय? वाचा जगन्नाथ पुरीची रोचक कथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 15:28 IST

जगन्नाथ पुरी हे चार धाम पैकी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र. तेथील मंदिराच्या निर्मितीइतकीच रोचक आहे मंदिरावर फडकणाऱ्या ध्वजाची कथा!

श्री जगन्नाथ मंदिराच्या वर स्थापित लाल ध्वज नेहमी नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकत असतो. याचे वैज्ञानिक कारण अद्याप कळले नसले, तरी त्यामागे पौराणिक कथा नक्कीच आहे. एवढा भव्य दिव्य ध्वज कोणाचेही लक्ष वेधून घेतो आणि विशेषतः प्रवाहाविरुद्ध असलेली त्याची गती सर्वांसाठी औत्सुक्याचे कारण ठरते. हे असे का घडत असावे, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला पौरणिक कथा माहीत असणे गरजेचे आहे. ती कथा कोणती? चला पाहूया...

ही आख्यायिका हनुमंताशी संबंधित आहे. हनुमंत दहा दिशांचे रक्षण करतात. तिथल्या पावन भूमीशी संबधित अनेक हनुमंत कथा सांगितल्या जातात. त्यातील एक म्हणजे समुद्राजवळील मंदिराच्या आत समुद्राचा आवाज थांबवणे. हा आवाज थांबविण्यासाठी झेंड्याची दिशा बदलली गेली, अशी या कथेची परस्पर जोड आहे. 

एकदा भगवान जगन्नाथांच्या दर्शनासाठी महर्षी नारद पोहोचले. तिथे त्यांना हनुमंत भेटले.  ते म्हणाले की आता भगवान विश्रांती घेत आहेत, तुम्हाला थांबावे लागेल. नारद दाराबाहेर जाऊन थांबले. थोड्या वेळाने, जेव्हा त्यांनी मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे पाहिले तेव्हा भगवान जगन्नाथ श्री लक्ष्मीसमवेत दुःखी बसले होते. त्यांनी परमेश्वराला दुःखाचे कारण विचारले तेव्हा जगन्नाथ म्हणाले, की समुद्राचा आवाज कुठे आराम करू देतो?

नारद बाहेर गेले आणि त्यांनी हनुमंताला भगवंताचे हे दुःख सांगितले. हनुमंत त्या आवाजाचा बंदोबस्त करण्यासाठी समुद्राला म्हणाले की, तू इथून निघून जा नाहीतर तू तुझा आवाज थांबव. तुझ्या आवाजामुळे माझे स्वामी विश्रांती घेऊ शकत नाही. हे ऐकून समुद्र देव प्रकट झाले आणि म्हणाले,' हे महावीर हनुमंता ! हा आवाज थांबविणे माझ्या आवाक्यात नाही. हा आवाज वा वाऱ्याच्या वेगामुळे येत आहे. वाऱ्याचा वेग जितका गतीने पुढे जाईल तितक्या वेगाने आवाजनिर्मिती होईल. वाऱ्याचा वेग वळवणे हे माझ्यापेक्षा तुमच्या हातात आहे. कारण मरुत अर्थात वारा हे तुमचे पिताश्री. तुम्ही त्यांना विनवणी करा . 

मग हनुमंतांनी त्यांचे वडील पवनदेव यांना बोलावले आणि सांगितले की तुम्ही मंदिराच्या दिशेने जाऊ नका. यावर पवन देव म्हणाले की मला हे शक्य नाही परंतु मंदिराच्या आवारात तू अशी वर्तुळनिर्मिती कर, जी वायुरहित असेल.'हे कळल्यावर हनुमंताने स्वतःच्या शरीराचे दोन भाग केले आणि ते वायुपेक्षा अधिक गतीने जगन्नाथ मंदिराच्या सभोवताली वर्तुळाकार फिरले. त्या मंडलामुळे वाऱ्याचा आवाज आत शिरू शकला नाही आणि जगन्नाथ स्वामी आराम करू शकले. 

म्हणून आजतागायत आपण समुद्राद्वारे (मंदिराच्या आतून) कोणताही आवाज मंदिराच्या सिंहद्वारात पहिल्या पायरीवर प्रवेश केल्यावर ऐकू शकत नाही. आपण (मंदिराच्या बाहेरून) एक पायरी ओलांडली तर आपण ते ऐकू शकता. हे संध्याकाळी स्पष्टपणे अनुभवता येते. त्याचप्रमाणे, मंदिराच्या बाहेर स्वर्गीय दरवाजा आहे, जिथे मोक्ष मिळविण्यासाठी मृतदेह जाळले जातात, परंतु जेव्हा आपण मंदिरातून बाहेर पडता तेव्हाच तुम्हाला मृतदेह जाळल्याचा वास येईल.

याच कारणामुळे मंदिर परिसरातील वाऱ्याची दिशा विरुद्ध असल्याने मंदिराच्या कळसावरील ध्वज विरुद्ध दिशेने फडकत राहतो. ते आश्चर्य पाहण्यासाठी अनेक भाविक जगन्नाथाच्या यात्रेत गर्दी करतात.