शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
4
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
5
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
6
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
7
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
8
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
9
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
10
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
11
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
12
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
13
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
14
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
15
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
16
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
17
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
18
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
19
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
20
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
Daily Top 2Weekly Top 5

सांबरला त्याच्या शिंगाचा अभिमान होता; शेवटी काय झाले...वाचा ही गोष्ट!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 29, 2021 17:38 IST

संपत्ती, संतती, सौंदर्य आणि कीर्ती या गोष्टी नशीबाने मिळतात. त्यांचा अभिमान केल्यास त्या नाशाला कारणीभूत होतात.

आपल्याला जे काही मिळाले आहे, ते दैवगतीने. मग ते सुख असो नाहीतर दु:खं! जे मिळाले आहे, त्यात आनंद मानावा आणि मिळालेल्या परिस्थितीचा सत्कार्यासाठी वापर करावा. तुकाराम महाराज म्हणतात, ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असू द्यावे समाधान! परंतु एकूणच प्राणीमात्रांत, समाधान तर दूरच, परंतु नको त्या गोष्टींचा अभिमानच जास्त असल्याचे आढळून येते. पण म्हणतात ना, वृथा अभिमान कधीच टिकत नाही. गर्वाचे घर खाली होतेच. मग ते मनुष्याचे असो किंवा अन्य जीवजिवांचे. याच गोष्टीची जाणीव करून देणारी छानशी बोधकथा!

एकदा एक सांबर पाणी प्यायला पाणवठ्यावर गेले. पाणी पिताना त्याला आपले प्रतिबिंब पाण्यात दिसले. त्याने नीट निरखून पाहिले आणि स्वत:शीच आनंदीत होत म्हणाले, 'वा, किती डौलदार शिंगं आहेत नाही! कोणत्याही प्राण्याला एवढी सुंदरता लाभली नसेल. खरेच, ईश्वराने सुंदर शरीराबरोबरच सुंदर शिंगं देऊन आपल्यावर फार मोठी कृपा केली आहे.'

असे म्हणत, ते आनंदानी उड्या मारत निघाले. अचानक त्याचे लक्ष आपल्या पायाकडे गेले. सांबर अतिशय उदास झाले. आपल्या पायाकडे बघत म्हाले, `देवा तू मला सुंदर शरीर दिलेस, सुंदर शिंगे दिलीस आणि पाय मात्र काटकुळे दिलेस. एवढ्या सुंदर शिंगांना साजेसे चांगले जाडजूड पाय दिले असते तर किती बरे झाले असते?'

मनातल्या मनात देवाला दोष देत ते पुढे निघाले. थोडे पुढे जात नाही तोच त्याला एक सिंह दिसला. सिंह सांबरकडे पाहत होता. भुकेलेला सिंह सांबरकडे येऊ लागगताच जिवाच्या आकांताने सांबर पळू लागले. पळता पळता खूप दूर निघून गेले. सिंह अजून खूप मागे होता. सांबर चपळाईने एका दाट झाडीत शिरले. जीव वाचल्याचा त्याला आनंद झाला. 

थोड्या वेळाने सिंह माग काढत सांबरजवळ आला. सांबर पुन्हा पळू लागले. पळता पळता त्याची शिंगे करवंदाच्या जाळीत अडकली. जाळीतून शिंगे निघता निघेना. तोपर्यंत सिंह तिथे पोहोचलासुद्धा! आता जीव वाचवणे शक्य नव्हते. ज्या पायांना सांबर हिणवत होते, त्यांनी एवढ्या लांबवर त्याला नेले, सिंहाच्या तावडीतून वाचवले. पण ज्या डौलदार शिंगांचा अभिमान बाळगला, त्यांनीच शेवटी सांबरचा घात केला. 

म्हणून कोणत्याही गोष्टीचा वृथा अभिमान करू नये. संपत्ती, संतती, सौंदर्य आणि कीर्ती या गोष्टी नशीबाने मिळतात. त्यांचा अभिमान केल्यास त्या नाशाला कारणीभूत होतात.