शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

सांबरला त्याच्या शिंगाचा अभिमान होता; शेवटी काय झाले...वाचा ही गोष्ट!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 29, 2021 17:38 IST

संपत्ती, संतती, सौंदर्य आणि कीर्ती या गोष्टी नशीबाने मिळतात. त्यांचा अभिमान केल्यास त्या नाशाला कारणीभूत होतात.

आपल्याला जे काही मिळाले आहे, ते दैवगतीने. मग ते सुख असो नाहीतर दु:खं! जे मिळाले आहे, त्यात आनंद मानावा आणि मिळालेल्या परिस्थितीचा सत्कार्यासाठी वापर करावा. तुकाराम महाराज म्हणतात, ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असू द्यावे समाधान! परंतु एकूणच प्राणीमात्रांत, समाधान तर दूरच, परंतु नको त्या गोष्टींचा अभिमानच जास्त असल्याचे आढळून येते. पण म्हणतात ना, वृथा अभिमान कधीच टिकत नाही. गर्वाचे घर खाली होतेच. मग ते मनुष्याचे असो किंवा अन्य जीवजिवांचे. याच गोष्टीची जाणीव करून देणारी छानशी बोधकथा!

एकदा एक सांबर पाणी प्यायला पाणवठ्यावर गेले. पाणी पिताना त्याला आपले प्रतिबिंब पाण्यात दिसले. त्याने नीट निरखून पाहिले आणि स्वत:शीच आनंदीत होत म्हणाले, 'वा, किती डौलदार शिंगं आहेत नाही! कोणत्याही प्राण्याला एवढी सुंदरता लाभली नसेल. खरेच, ईश्वराने सुंदर शरीराबरोबरच सुंदर शिंगं देऊन आपल्यावर फार मोठी कृपा केली आहे.'

असे म्हणत, ते आनंदानी उड्या मारत निघाले. अचानक त्याचे लक्ष आपल्या पायाकडे गेले. सांबर अतिशय उदास झाले. आपल्या पायाकडे बघत म्हाले, `देवा तू मला सुंदर शरीर दिलेस, सुंदर शिंगे दिलीस आणि पाय मात्र काटकुळे दिलेस. एवढ्या सुंदर शिंगांना साजेसे चांगले जाडजूड पाय दिले असते तर किती बरे झाले असते?'

मनातल्या मनात देवाला दोष देत ते पुढे निघाले. थोडे पुढे जात नाही तोच त्याला एक सिंह दिसला. सिंह सांबरकडे पाहत होता. भुकेलेला सिंह सांबरकडे येऊ लागगताच जिवाच्या आकांताने सांबर पळू लागले. पळता पळता खूप दूर निघून गेले. सिंह अजून खूप मागे होता. सांबर चपळाईने एका दाट झाडीत शिरले. जीव वाचल्याचा त्याला आनंद झाला. 

थोड्या वेळाने सिंह माग काढत सांबरजवळ आला. सांबर पुन्हा पळू लागले. पळता पळता त्याची शिंगे करवंदाच्या जाळीत अडकली. जाळीतून शिंगे निघता निघेना. तोपर्यंत सिंह तिथे पोहोचलासुद्धा! आता जीव वाचवणे शक्य नव्हते. ज्या पायांना सांबर हिणवत होते, त्यांनी एवढ्या लांबवर त्याला नेले, सिंहाच्या तावडीतून वाचवले. पण ज्या डौलदार शिंगांचा अभिमान बाळगला, त्यांनीच शेवटी सांबरचा घात केला. 

म्हणून कोणत्याही गोष्टीचा वृथा अभिमान करू नये. संपत्ती, संतती, सौंदर्य आणि कीर्ती या गोष्टी नशीबाने मिळतात. त्यांचा अभिमान केल्यास त्या नाशाला कारणीभूत होतात.