शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

सांबरला त्याच्या शिंगाचा अभिमान होता; शेवटी काय झाले...वाचा ही गोष्ट!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 29, 2021 17:38 IST

संपत्ती, संतती, सौंदर्य आणि कीर्ती या गोष्टी नशीबाने मिळतात. त्यांचा अभिमान केल्यास त्या नाशाला कारणीभूत होतात.

आपल्याला जे काही मिळाले आहे, ते दैवगतीने. मग ते सुख असो नाहीतर दु:खं! जे मिळाले आहे, त्यात आनंद मानावा आणि मिळालेल्या परिस्थितीचा सत्कार्यासाठी वापर करावा. तुकाराम महाराज म्हणतात, ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असू द्यावे समाधान! परंतु एकूणच प्राणीमात्रांत, समाधान तर दूरच, परंतु नको त्या गोष्टींचा अभिमानच जास्त असल्याचे आढळून येते. पण म्हणतात ना, वृथा अभिमान कधीच टिकत नाही. गर्वाचे घर खाली होतेच. मग ते मनुष्याचे असो किंवा अन्य जीवजिवांचे. याच गोष्टीची जाणीव करून देणारी छानशी बोधकथा!

एकदा एक सांबर पाणी प्यायला पाणवठ्यावर गेले. पाणी पिताना त्याला आपले प्रतिबिंब पाण्यात दिसले. त्याने नीट निरखून पाहिले आणि स्वत:शीच आनंदीत होत म्हणाले, 'वा, किती डौलदार शिंगं आहेत नाही! कोणत्याही प्राण्याला एवढी सुंदरता लाभली नसेल. खरेच, ईश्वराने सुंदर शरीराबरोबरच सुंदर शिंगं देऊन आपल्यावर फार मोठी कृपा केली आहे.'

असे म्हणत, ते आनंदानी उड्या मारत निघाले. अचानक त्याचे लक्ष आपल्या पायाकडे गेले. सांबर अतिशय उदास झाले. आपल्या पायाकडे बघत म्हाले, `देवा तू मला सुंदर शरीर दिलेस, सुंदर शिंगे दिलीस आणि पाय मात्र काटकुळे दिलेस. एवढ्या सुंदर शिंगांना साजेसे चांगले जाडजूड पाय दिले असते तर किती बरे झाले असते?'

मनातल्या मनात देवाला दोष देत ते पुढे निघाले. थोडे पुढे जात नाही तोच त्याला एक सिंह दिसला. सिंह सांबरकडे पाहत होता. भुकेलेला सिंह सांबरकडे येऊ लागगताच जिवाच्या आकांताने सांबर पळू लागले. पळता पळता खूप दूर निघून गेले. सिंह अजून खूप मागे होता. सांबर चपळाईने एका दाट झाडीत शिरले. जीव वाचल्याचा त्याला आनंद झाला. 

थोड्या वेळाने सिंह माग काढत सांबरजवळ आला. सांबर पुन्हा पळू लागले. पळता पळता त्याची शिंगे करवंदाच्या जाळीत अडकली. जाळीतून शिंगे निघता निघेना. तोपर्यंत सिंह तिथे पोहोचलासुद्धा! आता जीव वाचवणे शक्य नव्हते. ज्या पायांना सांबर हिणवत होते, त्यांनी एवढ्या लांबवर त्याला नेले, सिंहाच्या तावडीतून वाचवले. पण ज्या डौलदार शिंगांचा अभिमान बाळगला, त्यांनीच शेवटी सांबरचा घात केला. 

म्हणून कोणत्याही गोष्टीचा वृथा अभिमान करू नये. संपत्ती, संतती, सौंदर्य आणि कीर्ती या गोष्टी नशीबाने मिळतात. त्यांचा अभिमान केल्यास त्या नाशाला कारणीभूत होतात.