शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
2
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
3
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
4
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
5
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
6
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
7
"आता काँग्रेस पूर्वीपेक्षा अधिक…"; आपल्याच पक्षासंदर्भात काय बोलले शशी थरूर? भाजपच्या धोरणांकडे 'इशारा'!
8
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
9
Maithili Thakur : "मला माझं यश दिसतंय, पण...", आघाडी घेताच लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया
10
नेटबँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! SBI, HDFC सह सर्व बँकांच्या वेबसाइटचे डोमेन बदलले; काय आहे कारण?
11
बिहार निवडणुकीत बाहुबलींचा दबदबा कायम; 'या' 12 जागांनी वाढवली उत्सुकता, कोण पुढे? पाहा...
12
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारमध्ये भाजपा-जेडीयू युतीला ऐतिहासिक आघाडी; 'राजद'ला मोठा दणका
13
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
14
Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
15
IND vs SA : बुमराहनं 'परफेक्ट सेटअप'सह असा केला सलामीवीरांचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
16
भारीच! हातात हात, तयारीत भक्कम साथ; बॉयफ्रेंडच्या मदतीने 'ती' झाली DSP, 'तो' ही आहे अधिकारी
17
तुमचं मुल १८व्या वर्षीच होईल श्रीमंत! बालदिनी NPS वात्सल्य योजनेद्वारे बाळाचं भविष्य करा सुरक्षित
18
दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'
19
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
20
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
Daily Top 2Weekly Top 5

दारिद्रय, गैरसमज, आजारपण, कलह यावर उपनिषदात दिलेला तोडगा वापरून बघा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 17:14 IST

वैदिक मंत्रावर पूर्ण विश्वास असेल व तसा ईश्वरी संकल्प असेल तर त्याचा जरूर अनुभव येतो.

सद्यस्थितीत घराघरात कली शिरलेला आहे. खऱ्या अर्थाने कलियुग सुरू झाले आहे. कोणीही कोणाला जुमानत नाही, कोणी  कोणाची काळजी करत नाही, मन जपत नाही, नाती जपत नाही. अशामुळे दारिद्रय , गैरसमज, आजारपण, कलह यांमुळे अनेक संसार अस्वस्थ स्थितीतून जात आहेत. अनेकांच्या सुखाची हानी होत आहे. यावर उपाय म्हणून उपनिषदात एक मंत्र आहे. त्याची मनोभावे उपासना करावी आणि प्रत्यय घ्यावा. 

खरे पाहता, ईश्वरी सत्ता प्रमाण मानून भगवंत ज्या स्थितीत ठेवेल त्या स्थितीत संतोष मानणे हाच एक मुख्य तोडगा आहे. परंतु आपले तेवढ्यावर समाधान होत नाही. यासाठी उपनिषदात दिलेल्या तोडग्याची आपण प्रत्यक्ष अनुभूती घ्यावी. तोडग्यावर पूर्ण विश्वास असेल व तसा ईश्वरी संकल्प असेल तर त्याचा जरूर अनुभव येतो. लेखक अ.ल.भागवत यांनी परम सुखाचे रहस्य या पुस्तकात हा तोडगा दिला आहे.

उपनिषदे ही ईश्वरी वाचा असल्यामुळे त्या मंत्रातील अर्थ अनुभवाला येणे यथान्याय आहे. या उपासनेसाठी कसलेच अवडंबर नाही. काहीही खर्च नाही. जागेचे बंधन नाही. सकाळी उठून नित्याप्रमाणे स्नान करावे. आपले आन्हिक संपवावे. नंतर डोळे मिटून घ्यावेत व खालील उपनिषद मंत्र मनातल्या मनात २७ वेळा म्हणावा. 

श्लोक स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवा: स्वस्ति न: पूषा विश्ववेदा:।स्वस्ति नस्ताक्ष्र्यो अरिष्टनेमि: स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु।।ऊँ शांति: शांति: शांति:।

अर्थ : महान कीर्तिमान इन्द्र माझे कल्याण करो, परम धनवान पूषा माझे कल्याण करो, अरिष्टांचा नाश करण्यासाठी चक्ररूप गरुड माझे कल्याण करो. माझ्या त्रिविध तापाची शांती होवा़े 

जसजसा मंत्रजप वाढत जाईल त्या प्रमाणात जीवनाला मांगल्य व स्थैर्य प्राप्त होईल. यंत्रे पूजण्यापेक्षा हा वैदिक मंत्र तुमचे कल्याण करण्यास समर्थ आहे. मंत्रजपकाळी मोठ्या आनंदात राहावे. सर्व चिंता काळजी भगवंतावर सोपवून निर्धास्तपणे जीवन जगावे. 

वैदिक मंत्रांमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. आपले ऋषी मुनी त्या मंत्र सामर्थ्याने वाईट शक्तींवर विजय मिळवत असत. परंतु सद्यस्थितीत आपल्या प्राचीन ग्रंथांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे आणि आपणच आपल्या बहुमूल्य साहित्यावर शंका उपस्थित करत असल्यामुळे सकारात्मक लहरींचे प्रमाण कमी होत चालले आहे. याउलट परदेशातील लोक वेद वांङमय अनुवादित करून त्यांचा अभ्यास करत आहेत व लाभ घेत आहेत. गरज आहे ती आपण आपल्या प्राचीन संस्कृतीकडे डोळसपणे पाहण्याची आणि जाणीवपूर्वक अभ्यासण्याची!