शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

नासपतीच्या झाडाकडून तीन राजपूत्रांनी शिकले तीन नियम, कोणते? ही कथा वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 08:00 IST

प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येत राहतात. ऋतुमानानुसार जसे बदल घडतात तसेच माणसाच्या आयुष्यातही घडतात. म्हणून उतू नका आणि मातू नका.

एका राजाने आपल्या वयात आलेल्या राजपूत्रांना शिस्त लावावी, म्हणून एक कार्य सोपवायचे ठरवले. त्याने एकदा तिघांना बोलावून घेतले आणि एक काम सोपवले. 

तिघांनी कामाची तयारी दाखवली आणि काय काम आहे असे विचारले. राजा म्हणाला, आपल्या राज्यात नासपतीचे झाड नाही. तुम्ही तिघांनी चार महिन्यांच्या अंतराने आपल्या राज्याच्या आसपास कुठे नासपतीचे झाड आहे का हे पाहून यायचे. 

तिघांनी आव्हान स्वीकारले. पहिला राजकुमार गेला. बराच शोध घेऊन तो राज्यात परतला. चार महिन्यांनी दुसरा राजकुमार गेला, तोही शोध घेऊन परतला आणि चार महिन्यानी तिसरा राजकुमार गेला व त्यानेही नासपतीच्या झाडाची माहिती मिळवली. तिघांचा शोध पूर्ण होईपर्यंत वर्ष पूर्ण झाले. त्यानंतर एक दिवस राजाने दरबार भरवला आणि तिघांना आलेले अनुभव कथन करायला सांगितले.

पहिला राजकुमार म्हणाला, `पिताश्री आपल्या राज्याबाहेर एक नासपतीचे झाड आहे. गावकऱ्यांकडून खात्री केल्यावर मला त्या झाडाची ओळख पटली कारण मी पाहिले, तेव्हा ते अतिशय शुष्क झाले होते आणि ओळखणेही अवघड होते. अशा झाडाचा शोध घ्यायला तुम्ही का पाठवले असेल, हे मला लक्षात आले नाही.'दुसरा राजकुमार म्हणाला, `पिताश्री, माझा अनुभव वेगळा आहे. आपल्या राज्याबाहेर एक नासपतीचे झाड आहे, पण ते शुष्क नसून छान हिरवे गार होते. फक्त त्याला नासपती लगडले नव्हते.'तिसरा राजकुमार म्हणाला, `पिताश्री, मला वाटते या दोघांच्या पहाण्यात काही चूक झाली असावी. कारण मी पाहिलेले झाड नासपतीचे होते. ते शुष्क नव्हते व फळरहितही नव्हते. उलट हिरवेगार आणि फळांनी लगडलेले होते.'

तिघांचे बोलणे ऐकून झाल्यावर राजाने निष्कर्ष काढत म्हटले, `मुलांनो, तुम्ही घेतलेला शोध योग्य होता. परंतु एक गोष्ट तुम्ही विसरला आहात, ती अशी की तुम्ही तिघांनी एकच झाड चार महिन्यांच्या फरकाने पाहिले असल्याने तुम्हाला त्यात ऋतुमानानुसार घडलेले बदल दिसले. यावरून मला तुम्हाला आणि दरबारात उपस्थित असलेल्या सर्वांना तीन नियम सांगायचे आहेत.

१. कोणत्याही परिस्थितीवर चटकन विश्वास ठेवू नका. त्याचा पूर्ण तपास करा आणि शेवटी निकष काढा.२. कोणाचीही परिस्थिती कायम एकसारखी राहत नाही. म्हणून कोणालाही कमी लेखू नका.३. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येत राहतात. ऋतुमानानुसार जसे बदल घडतात तसेच माणसाच्या आयुष्यातही घडतात. म्हणून उतू नका आणि मातू नका.