शहरं
Join us  
Trending Stories
1
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या राकेश किशोरवर अवमानाची कारवाई सुरू; सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?
2
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
3
पीएम मोदींच्या महत्त्वाकांशी योजनेला ख्वाडा? जन-धन योजनेबाबत चिंताजनक बातमी, तुमचं खातं बंद होणार का?
4
EV चार्जिंगशी निगडीत कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; सोनू सूदशी निगडीत आहे कंपनी, ₹१२५ वर आला भाव
5
VIDEO: मुंबईचा रँचो! लोकलमध्ये प्रसुती वेदना, तरुणाने डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करुन केली प्रसुती
6
मुंबईत महिलेवर हल्ला केला आणि कोकणात जाऊन लपला, ४८ वर्षांनी झाली अटक, असा सापडला आरोपी
7
"पप्पांना मारलंय... "; लेकानेच केला खुनी आईचा पर्दाफाश; भाच्याच्या प्रेमात घेतला नवऱ्याचा जीव
8
Video - "मला माफ करा..."; तिकीट नाकारल्यानंतर ढसाढसा रडला नेता, व्यक्त केलं दु:ख
9
महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंसोबत जे झालं, तसंच नितीश कुमारांसोबत होईल? बिहारमध्ये चर्चांना उधाण, पण...
10
सासरेबुवा घरी घेऊन आले २ सूना; लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच झाल्या गायब अन्... समोर आलं धक्कादायक सत्य
11
Video : सलीम खान राज ठाकरेंच्या भेटीला, गॅलरीमध्ये रंगल्या गप्पा, भेटीचं कारण काय?
12
दर महिना ७० हजार सॅलरी पण हाती शिल्लकच राहत नाही; टेक प्रोफेशनल युवकानं शेअर केला अनुभव
13
Platinum Investment: सोने-चांदीच्या किंमती आवाक्याबाहेर, प्लॅटिनममध्ये गुंतवणूक करणे चांगला पर्याय आहे का?
14
Video: हायकोर्टच्या व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान वकीलाचा महिलेला Kiss; व्हिडिओ व्हायरल...
15
Virat Kohli Property: विराट कोहलीने ८० कोटीच्या बंगल्याची भावाला दिली 'पॉवर ऑफ अटॉर्नी'? काय आहे हा दस्तऐवज?
16
VIRAL : बाब्बो! ९३व्या वर्षी बाबा झाला हा व्यक्ती; बायको ५६ वर्षांनी लहान! लगेच दुसऱ्या बाळाचाही विचार केला सुरू
17
Virat Kohli: "ज्यावेळी तुम्ही हार मानता..." किंग कोहलीची पोस्ट चर्चेत; जाणून घ्या सविस्तर
18
थकलेले चेहरे, कंटाळवाणा मूड.. विराट-रोहितसह सारेच हैराण! ऑस्ट्रेलियात पोहचण्याआधी काय घडलं?
19
जगातील नकाशात कुठे आहे रहस्यमय 'टोरेंजा' देश?; महिलेचा पासपोर्ट पाहून खळबळ, व्हिडिओ व्हायरल
20
TVS ने लॉन्च केली पहिली दमदार अ‍ॅडव्हेंचर टूरिंग बाईक; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत...

नासपतीच्या झाडाकडून तीन राजपूत्रांनी शिकले तीन नियम, कोणते? ही कथा वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 08:00 IST

प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येत राहतात. ऋतुमानानुसार जसे बदल घडतात तसेच माणसाच्या आयुष्यातही घडतात. म्हणून उतू नका आणि मातू नका.

एका राजाने आपल्या वयात आलेल्या राजपूत्रांना शिस्त लावावी, म्हणून एक कार्य सोपवायचे ठरवले. त्याने एकदा तिघांना बोलावून घेतले आणि एक काम सोपवले. 

तिघांनी कामाची तयारी दाखवली आणि काय काम आहे असे विचारले. राजा म्हणाला, आपल्या राज्यात नासपतीचे झाड नाही. तुम्ही तिघांनी चार महिन्यांच्या अंतराने आपल्या राज्याच्या आसपास कुठे नासपतीचे झाड आहे का हे पाहून यायचे. 

तिघांनी आव्हान स्वीकारले. पहिला राजकुमार गेला. बराच शोध घेऊन तो राज्यात परतला. चार महिन्यांनी दुसरा राजकुमार गेला, तोही शोध घेऊन परतला आणि चार महिन्यानी तिसरा राजकुमार गेला व त्यानेही नासपतीच्या झाडाची माहिती मिळवली. तिघांचा शोध पूर्ण होईपर्यंत वर्ष पूर्ण झाले. त्यानंतर एक दिवस राजाने दरबार भरवला आणि तिघांना आलेले अनुभव कथन करायला सांगितले.

पहिला राजकुमार म्हणाला, `पिताश्री आपल्या राज्याबाहेर एक नासपतीचे झाड आहे. गावकऱ्यांकडून खात्री केल्यावर मला त्या झाडाची ओळख पटली कारण मी पाहिले, तेव्हा ते अतिशय शुष्क झाले होते आणि ओळखणेही अवघड होते. अशा झाडाचा शोध घ्यायला तुम्ही का पाठवले असेल, हे मला लक्षात आले नाही.'दुसरा राजकुमार म्हणाला, `पिताश्री, माझा अनुभव वेगळा आहे. आपल्या राज्याबाहेर एक नासपतीचे झाड आहे, पण ते शुष्क नसून छान हिरवे गार होते. फक्त त्याला नासपती लगडले नव्हते.'तिसरा राजकुमार म्हणाला, `पिताश्री, मला वाटते या दोघांच्या पहाण्यात काही चूक झाली असावी. कारण मी पाहिलेले झाड नासपतीचे होते. ते शुष्क नव्हते व फळरहितही नव्हते. उलट हिरवेगार आणि फळांनी लगडलेले होते.'

तिघांचे बोलणे ऐकून झाल्यावर राजाने निष्कर्ष काढत म्हटले, `मुलांनो, तुम्ही घेतलेला शोध योग्य होता. परंतु एक गोष्ट तुम्ही विसरला आहात, ती अशी की तुम्ही तिघांनी एकच झाड चार महिन्यांच्या फरकाने पाहिले असल्याने तुम्हाला त्यात ऋतुमानानुसार घडलेले बदल दिसले. यावरून मला तुम्हाला आणि दरबारात उपस्थित असलेल्या सर्वांना तीन नियम सांगायचे आहेत.

१. कोणत्याही परिस्थितीवर चटकन विश्वास ठेवू नका. त्याचा पूर्ण तपास करा आणि शेवटी निकष काढा.२. कोणाचीही परिस्थिती कायम एकसारखी राहत नाही. म्हणून कोणालाही कमी लेखू नका.३. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येत राहतात. ऋतुमानानुसार जसे बदल घडतात तसेच माणसाच्या आयुष्यातही घडतात. म्हणून उतू नका आणि मातू नका.