शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये वाद वाढला? शिंदेसेनेच्या शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती
2
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
3
भाजपाचं 'ऑपरेशन लोटस'! काँग्रेस अन् शिंदेसेनेला मातब्बर फोडणार; गोल्डन वुमननं हाती घेतलं कमळ
4
पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या तळावर हल्ला, बॉम्बस्फोट; तीन जण ठार
5
IND vs SA: विराट कोहली पुन्हा कसोटी क्रिकेट खेळणार? रांची एकदिवसीय सामन्यानंतर केलं मोठं विधान!
6
Post Office च्या या स्कीममध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
7
जया बच्चन यांनी लग्नाला म्हटलं 'जुनी परंपरा', नात नव्याच्या बाबतीत व्यक्त केली ही इच्छा
8
लग्नानंतर देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; भीषण अपघातात ५ जण जागीच ठार, सुदैवाने नवरा नवरी वाचले
9
Local Body ELections: उमेदवारीसाठी पैसे मागितल्याच्या आरोपावरून भाजपचे दोन गट भिडले
10
अंबरनाथची संपूर्ण, तर बदलापूरमध्ये ६ प्रभागांची निवडणूक पुढे ढकलली
11
आजपासून संसदेचे अधिवेशन! पान मसाला, सिगारेट, तंबाखु महागणार; सरकार विधेयक सादर करणार
12
Nepal Earthquake: भारताच्या शेजारी देशात ४.४ तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराट!
13
Philippines Protest 2025: फिलिपिन्समध्ये लोक रस्त्यावर; भ्रष्टाचाराविरोधात देशभरात आंदोलन पेटले
14
Bigg Boss Marathi: रितेश देशमुखच असणार 'बिग बॉस मराठी'चा होस्ट, सलमान खान म्हणाला- "भाऊ तुम्ही..."
15
आजचे राशीभविष्य, १ डिसेंबर २०२५: भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास आजचा दिवस अनुकूल
16
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
17
अग्रलेख : शेवटी मरण कार्यकर्त्यांचेच! अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार?
18
फोनमध्ये सिम नसल्यास ॲप्स वापरता येणार नाहीत; दर सहा तासांनी व्हॉट्सॲप्स वेब थेट लॉगआउट होणार!
19
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक २०२५:  रात्री दहापर्यंत पडणार आश्वासनांचा 'पाऊस'!
20
Vande Bharat Depot: पुण्यासह राज्यात तीन ठिकाणी वंदे भारत 'कोचिंग डेपो' वाढविणार
Daily Top 2Weekly Top 5

नासपतीच्या झाडाकडून तीन राजपूत्रांनी शिकले तीन नियम, कोणते? ही कथा वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 08:00 IST

प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येत राहतात. ऋतुमानानुसार जसे बदल घडतात तसेच माणसाच्या आयुष्यातही घडतात. म्हणून उतू नका आणि मातू नका.

एका राजाने आपल्या वयात आलेल्या राजपूत्रांना शिस्त लावावी, म्हणून एक कार्य सोपवायचे ठरवले. त्याने एकदा तिघांना बोलावून घेतले आणि एक काम सोपवले. 

तिघांनी कामाची तयारी दाखवली आणि काय काम आहे असे विचारले. राजा म्हणाला, आपल्या राज्यात नासपतीचे झाड नाही. तुम्ही तिघांनी चार महिन्यांच्या अंतराने आपल्या राज्याच्या आसपास कुठे नासपतीचे झाड आहे का हे पाहून यायचे. 

तिघांनी आव्हान स्वीकारले. पहिला राजकुमार गेला. बराच शोध घेऊन तो राज्यात परतला. चार महिन्यांनी दुसरा राजकुमार गेला, तोही शोध घेऊन परतला आणि चार महिन्यानी तिसरा राजकुमार गेला व त्यानेही नासपतीच्या झाडाची माहिती मिळवली. तिघांचा शोध पूर्ण होईपर्यंत वर्ष पूर्ण झाले. त्यानंतर एक दिवस राजाने दरबार भरवला आणि तिघांना आलेले अनुभव कथन करायला सांगितले.

पहिला राजकुमार म्हणाला, `पिताश्री आपल्या राज्याबाहेर एक नासपतीचे झाड आहे. गावकऱ्यांकडून खात्री केल्यावर मला त्या झाडाची ओळख पटली कारण मी पाहिले, तेव्हा ते अतिशय शुष्क झाले होते आणि ओळखणेही अवघड होते. अशा झाडाचा शोध घ्यायला तुम्ही का पाठवले असेल, हे मला लक्षात आले नाही.'दुसरा राजकुमार म्हणाला, `पिताश्री, माझा अनुभव वेगळा आहे. आपल्या राज्याबाहेर एक नासपतीचे झाड आहे, पण ते शुष्क नसून छान हिरवे गार होते. फक्त त्याला नासपती लगडले नव्हते.'तिसरा राजकुमार म्हणाला, `पिताश्री, मला वाटते या दोघांच्या पहाण्यात काही चूक झाली असावी. कारण मी पाहिलेले झाड नासपतीचे होते. ते शुष्क नव्हते व फळरहितही नव्हते. उलट हिरवेगार आणि फळांनी लगडलेले होते.'

तिघांचे बोलणे ऐकून झाल्यावर राजाने निष्कर्ष काढत म्हटले, `मुलांनो, तुम्ही घेतलेला शोध योग्य होता. परंतु एक गोष्ट तुम्ही विसरला आहात, ती अशी की तुम्ही तिघांनी एकच झाड चार महिन्यांच्या फरकाने पाहिले असल्याने तुम्हाला त्यात ऋतुमानानुसार घडलेले बदल दिसले. यावरून मला तुम्हाला आणि दरबारात उपस्थित असलेल्या सर्वांना तीन नियम सांगायचे आहेत.

१. कोणत्याही परिस्थितीवर चटकन विश्वास ठेवू नका. त्याचा पूर्ण तपास करा आणि शेवटी निकष काढा.२. कोणाचीही परिस्थिती कायम एकसारखी राहत नाही. म्हणून कोणालाही कमी लेखू नका.३. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येत राहतात. ऋतुमानानुसार जसे बदल घडतात तसेच माणसाच्या आयुष्यातही घडतात. म्हणून उतू नका आणि मातू नका.