शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

दिस येतील अन् जातील...शासनाने सांगितलेला उपाय उत्तम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 04:11 IST

पांडवांचासुद्धा एक वर्षाचा अज्ञातवास गेला. भीम स्वयंपाक्या, अर्जुन ब्रुहन्नडा झाला. तसं तुम्हाला व्हायचं नाही. पांडवाचं वर्ष गेलं. तुमचे महिने जातील.

- बा. भो. शास्त्रीअपाय हा स्वत:च्या चुकीने, प्रारब्धाने किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे सर्वांच्याच वाट्याला येत असतो. त्यावर आपण सर्वच उपाय शोधत असतो. खूप प्रयत्न करूनही यश आलं नाही तर हताश होतो. उपाय सापडत नाही. याचं दु:ख जगातल्या महापुरुषांच्या वाट्याला आलं आहे, ते त्यांना भोगावं लागलं; पण उपाय शोधून त्यांनी त्याचं निवारणही केलं आहे. कोरोनाने आपल्या जीवनावश्यक वस्तूंवर ताबा मिळविला आहे. त्याच वस्तू आपल्याविरोधात उभ्या आहेत. कोरोनाबाधित आपलीच भाजी, आपलीच फळं, जागेचा सात-बारा आपल्या नावावर; पण सत्ता त्याची. तिथं त्याचा स्पर्श ते आपल्याला अस्पृश्य झालं. वस्तूत दोष दिसला की, वैराग्य निर्माण होते. आता आपण थांबा व संयम ठेवावा. ‘दिस येतील, दिस जातील.’ पांडवांचासुद्धा एक वर्षाचा अज्ञातवास गेला. भीम स्वयंपाक्या, अर्जुन ब्रुहन्नडा झाला. तसं तुम्हाला व्हायचं नाही. पांडवाचं वर्ष गेलं. तुमचे महिने जातील. अंदमान येथे सावकरांची अकरा वर्षे गेली. तुम्हाला घरी सुरक्षित काही दिवस थांबायचं आहे. माणसं घरात कोंडली. तो स्वत:ला दुरुस्त करून घेताना दिसतो आहे. आमचा विसावा हेच निसर्गाचं आरोग्य. नद्या स्वच्छ करण्यासाठी करोडो रुपये खर्च करणे हा उपाय चुकीचा होता. आपल्या विश्रांतीतच निसर्गाची श्रीमंती आम्हाला दिसली. तसं आपल्याला समर्थन करता येणार नाही हे खरं; पण मरणाची भीती हे जास्त खरं आहे, अशी विश्रांती नको आहे. आज देव मंदिरात बंद आहेत; पण आपलं हृदय बंद नाही. अनेक गोरगरीब उपाशी मरताना दिसतात. त्यांना थोडीशी मदत करू शकतो. हाच देवाचा धर्म आहे. मंदिराची संपत्ती दान करणं हा मंदिराचा धर्म आहे. संत-महंतांना मिळालेला पैसा गरिबांना वाटणं हा त्यांचा धर्म आहे. उपाय नाही असं कसं शक्य आहे. रायगडावरून खाली जाण्याचे उपाय संपल्यावर हिरकणी अंधारात कडा उतरते. तिला कसा उपाय सापडला. आम्हाला शासनाने घरात राहाणे हा उपाय सांगितला आहे, तो उत्तम आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या