शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

यमलोकाच्या प्रवेशद्वारावर वैतरणी नावाची नदी आहे, गरुडपुराणात त्याबद्दल म्हटलंय...

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 29, 2021 18:15 IST

मरणोत्तर काय होईल याची काळजी करण्यापेक्षा जिवंतपणी काय चांगले काम करता येईल याचा विचार करा. त्यामुळे आपोआपच मरणोत्तर मार्ग मोकळा होईल.

बालपणापासून आपण स्वर्ग आणि नरक हे दोन्ही शब्द ऐकले आहेत. स्वर्गाबद्दल जेवढे कुतुहल नाही, तेवढे नरकाबद्दल आपल्या मनात कुतुहल असते. कारण, आजवरील ऐकीव माहितीनुसार नरकात उकळते तेल, तलवारी, रक्ताचे नदी, अणकुचीदार शस्त्रे, भयंकर अंधार, तप्त वातावरण, छळ करणारे राक्षस अशा अनेक गोष्टी असतात. आपले पापभिरु मन नरकाच्या कल्पनेनेही भयभित होते. यावर काही जण, स्वर्ग नरक या कविकल्पना आहेत असे म्हणून आपली सुटका करून घेतात. परंतु, पुराणात याबद्दल सविस्तर माहिती सापडते आणि अशा भयावह नरकातून स्वर्गाकडे जाणारा मार्ग कोणता, याबद्दल मार्गदर्शन केलेलेही आढळते. गरुड पुराणात भगवान श्रीकृष्णांनी स्वर्ग नरक भेद आणि तेथील यमनियम यावर गरुडाला मार्गदर्शन केले आहे. 

भगवान श्रीकृष्ण म्हणाले की, वैतरणी नावाची एक महान नदी यमराजाच्या प्रवेशद्वाराशी आहे. ही नदी अत्यंत भीतिदायक आहे. हिचा विस्तार नऊ हजार योजने इतका आहे. पृथुत्वावर सर्वात मोठी हीच एक नदी आहे. या नदीमधून अत्यंत दुर्गंधी बाहेर पडते व हिला पार करणे अत्यंत कठीण कर्म आहे. किडेमुंग्यांनी नेहमी ही भरलेली असते. पापी लोक त्यात सारखे उठत पडत असतात व गोंधळ घालत असतात.

ही महानदी चार प्रकारच्या प्राण्यांनी युक्त असते. दान कर्माचे पुण्य केलेल्या जीवालाच ती ओलांडणे सोपे होते. कृतघ्न, विश्वासघातकी लोक दीर्घकाळपर्यंत तिथेच अडकून राहतात. जीवितपणी दान देताना श्रद्धाभाव असेल, तर ते दान दीर्घ कालापर्यंत राहते. परंतु शरीरसंपत्ती अस्थिर असते. मृत्यू नित्य असतो, म्हणून धर्माचा संचय अवश्य करावा. परंतु वेळोवेळी योग्य हाती त्याचा विनियोग करून, दान करून वैतरणी पार करण्यासाठी पुण्यसंचय करावा. भगवंताची प्रार्थना करावी, की मृत्योत्तर ही महाभयंकर नदी पार करण्यासाठी शक्य तेवढे पुण्य साठवण्याचा प्रयत्न केला आहे. ते पुण्य मृत्यूपश्चात कामी यावे आणि जन्ममरणाच्या फेऱ्यातून आणि तथाकथित नरकातून सुटका होत मोक्षाचा मार्ग मोकळा व्हावा. 

जो मनुष्य दान-धर्म यांपासून दूर राहतो, त्याचे जीवन या भूमंडलावर दरिद्रीच राहते. शरीर नाशवंत आहे. ते कधी कायम टिकत नाही. म्हणून शरीराने केलेले व नित्य टिकणारे कार्य अर्थात दान पुण्य नेहमी करावे. प्राण हा एखाद्या पाहुण्यासारखा आहे, तो कधी निघून जाईल, सांगता येत नाही.

म्हणून मरणोत्तर काय होईल याची काळजी करण्यापेक्षा जिवंतपणी काय चांगले काम करता येईल याचा विचार करा. त्यामुळे आपोआपच मरणोत्तर मार्ग मोकळा होईल.