शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

यमलोकाच्या प्रवेशद्वारावर वैतरणी नावाची नदी आहे, गरुडपुराणात त्याबद्दल म्हटलंय...

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 29, 2021 18:15 IST

मरणोत्तर काय होईल याची काळजी करण्यापेक्षा जिवंतपणी काय चांगले काम करता येईल याचा विचार करा. त्यामुळे आपोआपच मरणोत्तर मार्ग मोकळा होईल.

बालपणापासून आपण स्वर्ग आणि नरक हे दोन्ही शब्द ऐकले आहेत. स्वर्गाबद्दल जेवढे कुतुहल नाही, तेवढे नरकाबद्दल आपल्या मनात कुतुहल असते. कारण, आजवरील ऐकीव माहितीनुसार नरकात उकळते तेल, तलवारी, रक्ताचे नदी, अणकुचीदार शस्त्रे, भयंकर अंधार, तप्त वातावरण, छळ करणारे राक्षस अशा अनेक गोष्टी असतात. आपले पापभिरु मन नरकाच्या कल्पनेनेही भयभित होते. यावर काही जण, स्वर्ग नरक या कविकल्पना आहेत असे म्हणून आपली सुटका करून घेतात. परंतु, पुराणात याबद्दल सविस्तर माहिती सापडते आणि अशा भयावह नरकातून स्वर्गाकडे जाणारा मार्ग कोणता, याबद्दल मार्गदर्शन केलेलेही आढळते. गरुड पुराणात भगवान श्रीकृष्णांनी स्वर्ग नरक भेद आणि तेथील यमनियम यावर गरुडाला मार्गदर्शन केले आहे. 

भगवान श्रीकृष्ण म्हणाले की, वैतरणी नावाची एक महान नदी यमराजाच्या प्रवेशद्वाराशी आहे. ही नदी अत्यंत भीतिदायक आहे. हिचा विस्तार नऊ हजार योजने इतका आहे. पृथुत्वावर सर्वात मोठी हीच एक नदी आहे. या नदीमधून अत्यंत दुर्गंधी बाहेर पडते व हिला पार करणे अत्यंत कठीण कर्म आहे. किडेमुंग्यांनी नेहमी ही भरलेली असते. पापी लोक त्यात सारखे उठत पडत असतात व गोंधळ घालत असतात.

ही महानदी चार प्रकारच्या प्राण्यांनी युक्त असते. दान कर्माचे पुण्य केलेल्या जीवालाच ती ओलांडणे सोपे होते. कृतघ्न, विश्वासघातकी लोक दीर्घकाळपर्यंत तिथेच अडकून राहतात. जीवितपणी दान देताना श्रद्धाभाव असेल, तर ते दान दीर्घ कालापर्यंत राहते. परंतु शरीरसंपत्ती अस्थिर असते. मृत्यू नित्य असतो, म्हणून धर्माचा संचय अवश्य करावा. परंतु वेळोवेळी योग्य हाती त्याचा विनियोग करून, दान करून वैतरणी पार करण्यासाठी पुण्यसंचय करावा. भगवंताची प्रार्थना करावी, की मृत्योत्तर ही महाभयंकर नदी पार करण्यासाठी शक्य तेवढे पुण्य साठवण्याचा प्रयत्न केला आहे. ते पुण्य मृत्यूपश्चात कामी यावे आणि जन्ममरणाच्या फेऱ्यातून आणि तथाकथित नरकातून सुटका होत मोक्षाचा मार्ग मोकळा व्हावा. 

जो मनुष्य दान-धर्म यांपासून दूर राहतो, त्याचे जीवन या भूमंडलावर दरिद्रीच राहते. शरीर नाशवंत आहे. ते कधी कायम टिकत नाही. म्हणून शरीराने केलेले व नित्य टिकणारे कार्य अर्थात दान पुण्य नेहमी करावे. प्राण हा एखाद्या पाहुण्यासारखा आहे, तो कधी निघून जाईल, सांगता येत नाही.

म्हणून मरणोत्तर काय होईल याची काळजी करण्यापेक्षा जिवंतपणी काय चांगले काम करता येईल याचा विचार करा. त्यामुळे आपोआपच मरणोत्तर मार्ग मोकळा होईल.