शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

धर्म शास्त्राने उजव्या हाताला प्राधान्य दिले मग डावखुऱ्या लोकांना का नाही? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 17:31 IST

धर्माने किंवा शास्त्राने हातांमध्ये भेदाभेद केला नाही. उलट हात जोडताना, अर्घ्य देताना, दान करताना दोन्ही हात जुळून पुढे येतात तेव्हाच कार्याला गती येते.मग हा भेद कसा निर्माण झाला ते वाचा!

डावखुरेपणा हा काही आजार नाही, तर तो नैसर्गिक सवयीचा भाग आहे. परंतु, विशेषतः धर्म कार्यात एखाद्या डावखुऱ्या व्यक्तीने कामात पुढाकार घेतला, की त्याला अकारण हटकले जाते. ही बाब शास्त्राला धरून आहे की लोकांनी निषिद्ध ठरवली आहे, ते जाणून घेऊया. 

डावखुरेपणाबद्दल शास्त्रात कुठेही आक्षेप घेतलेला नाही. कारण ती अतिशय नैसर्गिक बाब आहे. परंतु, धर्म कार्यात फुलं वाहताना, पूजा करताना, आचमन घेताना किंवा प्रसाद घेताना उजव्या हाताचा उल्लेख आवर्जून केल्याचे आढळून येते. त्याचे स्पष्टीकरण कुठेही दिलेले नसले, तरी त्यामागील साधा तर्क असा काढता येतो, की जगातील लोकसंख्येच्या १० टक्के लोक डावखुरे असतात. शास्त्राची रचना सर्वसाधारणपणे सर्वांना लागू होईल अशा पद्धतीने केलेली असते. त्यानुसार ९० टक्के लोकांचा विचार करता शास्त्रात उजव्या हाताला प्राधान्य दिले असावे, हा प्राथमिक विचार लक्षात येतो. पण म्हणून, डावखुऱ्या लोकांना गटातून बाहेर काढण्याचे काहीच कारण नाही. 

योगशास्त्राने याबाबत अधिक खुलासा केला आहे, की आपले हृदय शरीराच्या डाव्या बाजूला स्थित असते. त्यावर फार भार पडू नये, म्हणून डाव्या हातावर कामाचा भार कमी टाकला जातो. जड, अवघड कामे उजव्या हाताने उरकली जातात. हिंदीत एक प्रचलित म्हण आहे, 'ये तो मेरे बाए हाथ का खेल है'  म्हणजेच हे सहज होणारे काम आहे. यावरूनही लक्षात येते, की डाव्या हातावर आपण सहजगत्या होणाऱ्या कामाची जबाबदारी टाकतो. 

परंतु जे डावखुरे लोक असतात, त्यांचा निसर्गतः डावा हात अधिक कार्यशील असल्यामुळे साहजिकच त्यांच्या हृदयावर थोडा ताण पडतो. एका संशोधनातून असे सिद्ध झाले आहे, की डावखुरे लोक उजव्या हाताने काम करणाऱ्या लोकांच्या तुलनेत सरासरी ७ वर्षे कमी जगतात. मात्र काही डावखुरे लोक दोन्ही हातांचा छान समतोल साधतात. डाव्या आणि उजव्या हाताने व्यवस्थित काम करतात. त्यामुळे त्यांचा मेंदू अधिक कार्यन्वित होतो आणि हे लोक अधिक क्रियाशील आणि सक्षम बनतात. अमिताभ बच्चन, रफेल नदाल, आइनस्टाइन, नेपोलियन आणि हिलरी फोर्ड ही काही डावखुऱ्या लोकांची यादी पाहिली, तर आपणही वरील विधानाशी सहमत व्हाल. यासाठीच डावखुऱ्या मुलांच्या पालकांना आपल्या पाल्याकडून दोन्ही हातांनी जास्तीत जास्त सराव करण्याची सूचना दिली जाते. 

धर्माने किंवा शास्त्राने हातांमध्ये भेदाभेद केला नाही. उलट हात जोडताना, अर्घ्य देताना, दान करताना दोन्ही हात जुळून पुढे येतात तेव्हाच कार्याला गती येते. म्हणून व्यक्तीत डावे उजवे न करता सर्वांना सामावून घ्यावे आणि समारंभाचा आनंद दोन्ही हातांच्या ओंजळीने भरभरून घ्यावा आणि द्यावा.