शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

कीर्तनाची गोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:11 IST

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक म्हणजे वारकरी कीर्तन.

- प्रा.डॉ. प्रकाश खांडगे; मुंबई विद्यापीठाच्या शाहीर अमरशेख अध्यासनाचे समन्वयकस्वरचित पद अथवा लौकिक भक्तिगीत वारकरी कीर्तनात गायिले जात नाही. ‘आम्ही नाचों तेणें सुखें। वाहूं टाळी गातो मुखें।’ असे वारकरी कीर्तनाचे समूह संकीर्तनाचे सूत्र असते. ‘टाळा-टाळी लोपला नाद। अंगो-अंगी मुराला छंद।’ अशी टाळ व टाळीची चिरतंद्रा वारकरी कीर्तनात अभिप्रेत असते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक म्हणजे वारकरी कीर्तन.कीर्तन संस्थेचे आद्यप्रवर्तक नारदमुनी समजले जातात. कीर्तनाचा महिमा सांगताना संत तुकारामांनी नारदांची महतीसुद्धा सांगितली आहे.कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव।पंढरीचा राव संगीं असे ।।धृ ।।भक्त जाय सदा हरी कीर्ति गात।त्यासवे अनंत हिंडतसे।।२।।त्रैलोक्य भ्रमण फिरत नारद।त्यासवे गोविंद फिरतसे।।३।।नारद मंजुळ सुस्वरें गीत गाय।मार्गी चालताहें संगें हरि।।४।।तुका म्हणे त्याला गोडी कीर्तनाची।नाही आणिकांची प्रीती ऐसी।।५।।वारकरी कीर्तन हे समूह संकीर्तनाचे प्रतीक आहे, परंपरेनुसार वारकरी कीर्तनकार स्वत: ला ‘बुवा’ म्हणवून घेतात. ‘महाराज’ म्हणत नाहीत. अलीकडे मात्र सर्वत्र ‘महाराज’ म्हणण्याचा प्रघात रूढ झाला आहे. ‘राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी’ या भजनाने प्रथम वारकरी कीर्तनाचा प्रारंभ होतो तो विणेकऱ्यांच्या माध्यमातून. ‘सुंदर ते ध्यान’ हा रूपाचा अभंग आणि ‘रूप पाहता लोचनी’ हा ध्यानाचा अभंग असे अभंग गायिले जातात. ‘विठोबा रखुमाई, जय-जय विठोबा रखुमाई’ असा गजर होतो. कीर्तनकार अभंगांवर निरूपण सुरू करतात तेव्हा उपरण्याने कंबर कसतात. श्रीमद् भगवत गीता, एकनाथी भागवत, संतांचे अभंग, ज्ञानेश्वरी यांचीच प्रमाणे देण्याची मर्यादा कीर्तनकारांनी आखून घेतलेली असते.सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी। भक्ती प्रेमविण इतर गोष्टी न कराव्या।। संत संगे अनंत रंगे नाम बोलावे। ऐसी कीर्तन मर्यादा नाथांच्या घरची।संत एकनाथांनी कीर्तन मर्यादा स्पष्ट केली आहे. ‘मार्ग दावूनि गेले आधी दयानिधी संत ते। तेणेचि पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही’ अशी वारकरी कीर्तनकार आणि वारकऱ्यांची श्रद्धा असते. वारकरी संप्रदाय हा नाथ सांप्रदाय आणि चैतन्य सांप्रदाय या दोन सांप्रदाय धारांमधून प्रवाही राहिलेला सांप्रदाय असून वारकरी कीर्तनाचा विचार करताना संत तुकोबांचा वीणा पुढे निळोबाराय आणि त्यानंतर वासकर महाराजांकडे आला आणि फडाचे कीर्तन सुरू राहिले. विष्णूबुवा जोग महाराजांची परंपरा ही नाथ सांप्रदायाकडून म्हणजे निवृत्ती, ज्ञानदेवांकडून आली. विष्णूबुवा जोग महाराजांच्या परंपरेत बंकटस्वामी, मारुतीबुवा गुरव, लक्ष्मण महाराज इगतपुरीकर, मारुतीबुवा ठोंबरे, मामासाहेब दांडेकर अशी कीर्तनकारांची, प्रवचनकारांची परंपरा पुढे सुरू राहिली. वारकरी कीर्तनात दृष्टांत व दृष्टांतातून अभंग सोडविला जातो. ‘कीर्तनाची गोडी देव निवडी आपण’ अशी वारकºयांची श्रद्धा असते. वारकरी कीर्तन म्हणजे समूह भक्ती. या समूह भक्तीचा सोहळा आता कोरोनाने शक्य नाही.