शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

Swami Samartha: उद्विग्न मन:स्थितीत स्वामींना कळकळीने 'ही' प्रार्थना करा; त्वरित मन:शांती लाभेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 11:37 IST

Swami Samartha: चांगले दिवस दाखवण्याआधी स्वामी परीक्षा घेतात; त्या संकट काळात न डगमगता 'ही' प्रार्थना करावी; स्वामी नक्कीच बळ देतील... 

सगळे दिवस सारखे नसतात, सुख दुःखाचा ससेमिरा सुरूच राहतो. आनंदाचे दिवस निघून जातात पण दुःखाच्या क्षणी देवाची आठवण होते. सुख मलाच का दिलेस हे आपण देवाला विचारत नाही, मात्र माझ्याच वाट्याला दुःख का दिलेस असा देवाला जाब विचारतो. देव मदत करत नाही म्हणून त्यालाच बोल लावतो. त्याऐवजी आहे ती स्थिती स्वीकारून संकटाला सामोरे जाण्याची ताकद देवाकडे मागायची. स्वामी सांगतात, 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे!' एवढा मोठा दिलासा असतानाडगमगण्याची गरज नाही. त्याऐवजी पुढील प्रार्थना आपल्या रोजच्या उपासनेत समाविष्ट करा. केवळ शब्द नाही तर त्यामागील भाव समजून उमजून म्हणा, त्यामुळे मन स्थिर, शांत होईल. विचार थांबतील आणि पूर्णपणे समर्पण भाव जागृत होईल. अशा स्थितीत स्वामींना विनंती करा -

सद्गुरू नाथा हात जोडितों अंत नको पाहूउकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवणा दावू ।।

निशीदिनी श्रमसी मम् हितार्थ तू किती तुज शीण देऊहृदयी वससी परी नच दिससी कैसे तुज पाहू ॥

उत्तीर्ण नव्हे तुज उपकारा जरी तनु तुज वाहूबोधुनि दाविसी इहपर नश्वर मणी उठला बाऊ ॥

कोण कुठील मी कवण कार्य मम जणी कैसा राहूकरी मज ऐसा निर्भय निश्चल सम सकला पाहू ॥

अजाण हतबल भ्रमित मनीची तळमळ कशी साहूनिरसुनी माया दावी अनुभव प्रचीती नको पाहू ॥

स्वामी कृपा प्राप्त होण्यासाठी आपण आपली योग्यता वाढवली पाहिजे. गरिबाला मदत करणे, मोठ्यांचा मान राखणे, सेवा करणे, लहानग्यांना समजून घेणे, रागावर नियंत्रण ठेवणे, सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे, मुख्य म्हणजे माणुसकी जपणे. या गोष्टी जे लोक करतात ते स्वामींच्या कृपेस पात्र होतात. 'जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला' हे गुपित कायम लक्षात ठेवा. कोणी कसेही वागले तरी आपण प्रामाणिकपणे वागत असू तर आपल्या कृतीवर स्वामी लक्ष ठेवून आहेत, आपले कार्य त्यांना समर्पित करून देवकार्य करणे हेच अपेक्षित आहे. जो ही सूत्री सांभाळतो, भगवंत त्याचे रक्षण करतो. 

त्यामुळे संकटकाळात उदास न होता, मनोभावे स्वामींना या प्रार्थनेतून आर्त साद घाला, स्वामी निश्चित मदत करतील!

श्री स्वामी समर्थ!