शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

आपुलिया हिता जो असे जागता...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 18:47 IST

असा जो विश्वास आहे तो सार्थ करण्यासाठी माणसाने काळजीपूर्वक वागावे।

  आपले कल्याण आपल्या हाती  आहे. मानवी जीवनामध्ये हे सर्व काही पुन्हा मिळवता येईल. परंतु मानवी जीवन पुन्हा मिळवू  शकत नाही म्हणून सर्वार्थाने सर्वात मौल्यवान जर कोणती गोष्ट असेल तर ते आपले मानवी जीवन आहे.   आपल्या जीवनाला जर सुरक्षित व व्यवस्थित टिकवून ठेवायचे असेल तर काही गोष्टीची मर्यादा, काही गोष्टी चे नियम शिस्त बंधन पाळणे गरजेचे आहे.  आज सर्व जगाला कोरोना या महाभयंकर रोगाने ग्रासले आहे.याचे कारणच मुळी माणसाचे बदलली मनस्थिती व खान पान परिस्थिती बदलली आहे. ती सुधारण्यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीने पूर्वापार चालत आलेल्या  यम, नियम, योग, प्रत्याहार समाधी या सगळ्या  अष्टांग योग गोष्टीचा अंगीकार केलेला आहे. असे आपणास पहावयास मिळतो. आज स्थिती अशी निर्माण झाली आहे की, जो कोणी याचा अंगीकार करणार नाही तो नेस्तनाबूत होणार.  म्हणूनच आज  आपले स्वहित कशामध्ये आहे ते जाणण्याची गरज निर्माण झाली आहे. नाहीतर माणसाचे जीवन संपुष्टात येण्याची वेळ येऊन ठेपलेली  आहे.संत तुकाराम या अनुषंगाने म्हणतातआपुलिया होता जो असे जागता ।धन्य माता पिता जयाचिया।आपले हिट क्षमध्ये आहे हे ज्यांना कळले त्यांचे आईबाप धन्य आहेत. त्यांची मुलं जबाबदार आहेत समजदार आहेत. नाहीतर सर्व कुळाचाही नाश होऊ शकतो. अशी परिस्थिती आज एक कोरोना विषाणू ने माणसावर आणली आहे.माणसाने आपल्याला, आपल्या जीवनाला सुरक्षित करण्यासाठी आपण संतांचा विचार अंगीकारावा. जेणेकरून आपले जीवन हे अधिक मौल्यवान होईल. नाहीतर सर्वकाही संपून जाईल. संत तुकाराम महाराज म्हणतात जग हे दिल्या घेतल्याचे आहे- जन हे दिल्या घेतल्याचे। अंत काळाचे कुणी नाही ।। म्हणून अनंत काळाचे मित्र कोणीही नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे. आपली आपण करा सोडवन संसार बंधन सोडा वेगीं।असे ज्ञानोबा माऊली सांगतात. आपल्याला आपल्या जीवनामध्ये हा संतांचा विचारा संसाराला आधिक सुखी करण्यासाठी समाधानी करण्यासाठी शांततेने जगण्यासाठी अधिक उपयुक्त  आहे. म्हणून सर्वांनी हे जग सुंदर करण्यासाठी आपल्या वागण्याची, बोलण्याची, रहाण्याची, खाण्याची, पिण्याची तऱ्हा, पद्धती बदलणे आवश्यक आहे. नाहीतर मग यम, नियम,आहार, प्रत्याहार,  समाधी  या मुनी पतंजली यांच्या अष्टांग योगाचे अतिशय महत्त्वाचे स्थान आहे .संतांच्या मते अवघाची संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्ही लोक ।।असा जो विश्वास आहे तो सार्थ करण्यासाठी माणसाने काळजीपूर्वक वागावे।आपली काळजी जे लोक जीव धोक्यात घालून घेत आहेत. त्यांची काळजी कमी करण्यासाठी आपण घरीच राहून देशहितासाठी नियम पाळणे आवश्यक आहे.  -डॉ. हरिदास आखरे, शेगाव

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक