शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

आचरण शुद्ध असेल तरच आध्यात्मिक उन्नती होईल, ते शुद्ध कसे करता येईल हे वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 09:51 IST

दुष्टशक्तीपासून नेहमी लांब राहण्यासाठी किंवा त्यापासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी सतत ईश्वर स्मरण हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. सतत नामस्मरणाने एक प्रकारच्या विधायक शक्ती लहरी निर्माण होऊन दुष्टशक्तींची पकड कमी होत जाते. मनुष्याच्या मनामध्ये चांगले विचार येऊ लागतात.

हिंदूधर्मात आचाराला फार महत्त्व आहे. आचार, विचार व उच्चार हे सर्व एक दुसऱ्यांवर अवलंबून आहेत. माणसाचे विचार जसे असतील त्याप्रमाणे त्याचे वागणे असेल. या विश्वामध्ये सुष्टशक्ती व दुष्टशक्ती दोन्ही वास करून आहेत. दोन्हीचा संघर्ष नेहमीच चालू असतो. सुष्टशक्ती ही विधायक शक्ती आहे तर दुष्टशक्ती ही विनाशक शक्ती आहे.

मनुष्य वाईट कृत्य करण्यास फार लवकर प्रवृत्त होतो. कारण त्यात तात्काळ फायदा दिसत असतो. मनुष्याचा एकदा तोल गेला म्हणजे दुष्टशक्ती त्या मनुष्यावर ताबा घेते. त्याची सारासार विचार करण्याची क्षमता कमी होते. दुष्टशक्तीने ताबा घेतल्यावर त्याला योग्य निर्णय घेता येत नाही. या लोकांच्या जीवनात, व्यवहारात प्रगती होत नाही. त्यांना योग्य वेळी योग्य निर्णय घेत येत नाही. त्यांच्या खाण्यापिण्यात ताळमेळ राहत नाही व निषिध्द खाणे आवडते. त्यामुळे त्यांचा विकार बळावतो.

दुष्टशक्तीपासून नेहमी लांब राहण्यासाठी किंवा त्यापासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी सतत ईश्वर स्मरण हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. सतत नामस्मरणाने एक प्रकारच्या विधायक शक्ती लहरी निर्माण होऊन दुष्टशक्तींची पकड कमी होत जाते. मनुष्याच्या मनामध्ये चांगले विचार येऊ लागतात.

चांगले विचार स्थिरावण्यासाठी चांगल्या आचरणाची आवश्यकता असते. आचरण म्हणजे केवळ चांगले वागणे नव्हे तर मनातले विचार देखील शुद्ध व सात्विक असणे. प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावे. प्रत्येकाला स्वत:चे दोष लक्षात येतात व कळतातही. या दोषातून मुक्त होण्याचा सातत्याने विचार केला गेला पाहिजे व त्याप्रमाणे प्रयत्नाला लागले पाहिजे. 

चांगले आचार आणि विचार हे नेहमीच संस्कारधिष्ठित असतात. चांगल्या आचारापासून दूर नेणारे कार्यक्रम पाहू नयेत. पुस्तकांचे वाचन करताना धार्मिक पुस्तकाचे वाचन करणे केव्हाही चांगले. तसेच आत्मोन्नती किंवा प्रगती पथावर नेणारे विचार वाचावेत, ऐकावेत, चिंतन करावे. देवा-धर्मावर टीका टिप्पणी करणाऱ्याशी हुज्जत न घालता त्या विषयाला पूर्णविराम द्यावा. योग्य मित्र निवडावेत. नेहमी चांगल्या विचारांच्या मित्रांच्या संगतीत राहावे म्हणजे वाईट गोष्टी ऐकण्याचा प्रसंग येणार नाही.

व्यवहारातले वागणे नम्रतेचे असावे. शुद्ध व सात्त्विक आहार असल्यास मनात देखील शुद्ध व सात्त्विक विचार येतात. आपल्या वागण्यात बदल होण्यासाठी संतांचा सहवास महत्त्वाचा व उपयुक्त असतो. तुमच्या शुद्ध आचरणामुळे अथवा दृढ भाव निर्माण झाल्यामुळे तुमच्यावर ज्यावेळेला सद्गुरुंची कृपा होते त्यावेळेला विरुद्ध विचारांच्या व्यक्ती तुमच्यापासून आपोआप दूर होतात व तुमच्या प्रगतीचा मार्ग सोपा होतो.