शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

कर्माची गती कोणालाही चुकविता येत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 12:48 IST

प्रारब्ध अटळ आहे, हे त्रिवार सत्य आहे. असे असले तरी नुसतेच प्रारब्धावर हवाला ठेवून जीवन जगता येणार नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा ही केलीच पाहिजे...!

- युवा कीर्तनकार, ह.भ.प. ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र , ८७ ९३ ०३ ०३ ०३ ) 

या जगांत जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला प्रारब्धाचे भोग हे भोगावेच लागतात, असा शास्त्र सिद्धांत आहे. प्रारब्ध जर अमान्य केले तर काही प्रश्नांची उत्तरे मिळतंच नाहीत.

कधी कधी प्रयत्नांची पराकाष्ठा करुनही ईप्सित साध्य होत नाही. कधी कधी प्रयत्न न करताही एखादी गोष्ट विनासायास मिळते. मला एका लोककवीची एक सुंदर कविता आठवते, कवी म्हणतो - कर्माची गती कोणालाही चुकविता आली नाही.

जीवनी एक तत्व जाणा । चुकेना कर्मगती कोणा ॥म्हणती ज्या पुण्यश्लोक पहिला । नृपवर नल राजा झाला ।तयाची काय झाली दैना । चुकेना कर्मगती कोणा ॥

एवढा पुण्यश्लोक नल राजा पण दैवाचा कोप झाल्यावर ऋतुपर्ण राजाच्या घोड्याचे सारथ्य व खरारा त्याला करावा लागावा काय..?

रघुवीर राम एकवचनी । जानकीसह तो जाई वनी ।घेवोनि संगे लक्ष्मणा । चुकेना कर्मगती कोणा ॥

पित्याच्या वचनपूर्तीसाठी रामाला चौदा वर्षांचा वनवास भोगावा लागला. त्यांची कसलीही चूक नसतांना प्राक्तनाचा हा घाला कशामुळे..? याचे उत्तर काय..? तर फक्त प्रारब्ध असेच द्यावे लागेल दुसरे काय..?

अहो..! पांडव हे भगवान श्रीकृष्णाचे एवढे एकनिष्ठ भक्त होते पण कर्मगतीचा फेरा तर त्यांनाही चुकविता आला नाही. बारा वर्षांचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास तर पांडवांच्याही नशिबाला आलाच ना..?

पांडव धर्मनिष्ठ असुनि । द्रौपदी कृष्णाची भगिनी ।कौरवे किती केली छळना । चुकेना कर्मगती कोणा ॥ऋषीमुनी मोक्ष अधिकारी । तसे ते नृपती चक्रधारी ।करावी कित्येकांची गणना । चुकेना कर्मगती कोणा ॥

तात्पर्य काय..? तर प्रारब्ध अटळ आहे, हे त्रिवार सत्य आहे. असे असले तरी नुसतेच प्रारब्धावर हवाला ठेवून जीवन जगता येणार नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा ही केलीच पाहिजे. अथक प्रयत्न करुनही ईप्सित साध्य होत नसेल तर खचून न जाता 'प्रारब्धाचा' भाग समजून गप्प रहावे. कांही गोष्टी जगांत अशा आहेत की, त्या संचितानेच प्राप्त होतात. प्रारब्ध, क्रियमाण आणि संचित हा ईश्वरी व्यवस्थेतील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. ही व्यवस्था अमान्य करुन खरं तर माणसाला जगताच येत नाही..!

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक