शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

कर्माची गती कोणालाही चुकविता येत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 12:48 IST

प्रारब्ध अटळ आहे, हे त्रिवार सत्य आहे. असे असले तरी नुसतेच प्रारब्धावर हवाला ठेवून जीवन जगता येणार नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा ही केलीच पाहिजे...!

- युवा कीर्तनकार, ह.भ.प. ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र , ८७ ९३ ०३ ०३ ०३ ) 

या जगांत जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला प्रारब्धाचे भोग हे भोगावेच लागतात, असा शास्त्र सिद्धांत आहे. प्रारब्ध जर अमान्य केले तर काही प्रश्नांची उत्तरे मिळतंच नाहीत.

कधी कधी प्रयत्नांची पराकाष्ठा करुनही ईप्सित साध्य होत नाही. कधी कधी प्रयत्न न करताही एखादी गोष्ट विनासायास मिळते. मला एका लोककवीची एक सुंदर कविता आठवते, कवी म्हणतो - कर्माची गती कोणालाही चुकविता आली नाही.

जीवनी एक तत्व जाणा । चुकेना कर्मगती कोणा ॥म्हणती ज्या पुण्यश्लोक पहिला । नृपवर नल राजा झाला ।तयाची काय झाली दैना । चुकेना कर्मगती कोणा ॥

एवढा पुण्यश्लोक नल राजा पण दैवाचा कोप झाल्यावर ऋतुपर्ण राजाच्या घोड्याचे सारथ्य व खरारा त्याला करावा लागावा काय..?

रघुवीर राम एकवचनी । जानकीसह तो जाई वनी ।घेवोनि संगे लक्ष्मणा । चुकेना कर्मगती कोणा ॥

पित्याच्या वचनपूर्तीसाठी रामाला चौदा वर्षांचा वनवास भोगावा लागला. त्यांची कसलीही चूक नसतांना प्राक्तनाचा हा घाला कशामुळे..? याचे उत्तर काय..? तर फक्त प्रारब्ध असेच द्यावे लागेल दुसरे काय..?

अहो..! पांडव हे भगवान श्रीकृष्णाचे एवढे एकनिष्ठ भक्त होते पण कर्मगतीचा फेरा तर त्यांनाही चुकविता आला नाही. बारा वर्षांचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास तर पांडवांच्याही नशिबाला आलाच ना..?

पांडव धर्मनिष्ठ असुनि । द्रौपदी कृष्णाची भगिनी ।कौरवे किती केली छळना । चुकेना कर्मगती कोणा ॥ऋषीमुनी मोक्ष अधिकारी । तसे ते नृपती चक्रधारी ।करावी कित्येकांची गणना । चुकेना कर्मगती कोणा ॥

तात्पर्य काय..? तर प्रारब्ध अटळ आहे, हे त्रिवार सत्य आहे. असे असले तरी नुसतेच प्रारब्धावर हवाला ठेवून जीवन जगता येणार नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा ही केलीच पाहिजे. अथक प्रयत्न करुनही ईप्सित साध्य होत नसेल तर खचून न जाता 'प्रारब्धाचा' भाग समजून गप्प रहावे. कांही गोष्टी जगांत अशा आहेत की, त्या संचितानेच प्राप्त होतात. प्रारब्ध, क्रियमाण आणि संचित हा ईश्वरी व्यवस्थेतील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. ही व्यवस्था अमान्य करुन खरं तर माणसाला जगताच येत नाही..!

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक