शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

कर्माची गती कोणालाही चुकविता येत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 12:48 IST

प्रारब्ध अटळ आहे, हे त्रिवार सत्य आहे. असे असले तरी नुसतेच प्रारब्धावर हवाला ठेवून जीवन जगता येणार नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा ही केलीच पाहिजे...!

- युवा कीर्तनकार, ह.भ.प. ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र , ८७ ९३ ०३ ०३ ०३ ) 

या जगांत जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला प्रारब्धाचे भोग हे भोगावेच लागतात, असा शास्त्र सिद्धांत आहे. प्रारब्ध जर अमान्य केले तर काही प्रश्नांची उत्तरे मिळतंच नाहीत.

कधी कधी प्रयत्नांची पराकाष्ठा करुनही ईप्सित साध्य होत नाही. कधी कधी प्रयत्न न करताही एखादी गोष्ट विनासायास मिळते. मला एका लोककवीची एक सुंदर कविता आठवते, कवी म्हणतो - कर्माची गती कोणालाही चुकविता आली नाही.

जीवनी एक तत्व जाणा । चुकेना कर्मगती कोणा ॥म्हणती ज्या पुण्यश्लोक पहिला । नृपवर नल राजा झाला ।तयाची काय झाली दैना । चुकेना कर्मगती कोणा ॥

एवढा पुण्यश्लोक नल राजा पण दैवाचा कोप झाल्यावर ऋतुपर्ण राजाच्या घोड्याचे सारथ्य व खरारा त्याला करावा लागावा काय..?

रघुवीर राम एकवचनी । जानकीसह तो जाई वनी ।घेवोनि संगे लक्ष्मणा । चुकेना कर्मगती कोणा ॥

पित्याच्या वचनपूर्तीसाठी रामाला चौदा वर्षांचा वनवास भोगावा लागला. त्यांची कसलीही चूक नसतांना प्राक्तनाचा हा घाला कशामुळे..? याचे उत्तर काय..? तर फक्त प्रारब्ध असेच द्यावे लागेल दुसरे काय..?

अहो..! पांडव हे भगवान श्रीकृष्णाचे एवढे एकनिष्ठ भक्त होते पण कर्मगतीचा फेरा तर त्यांनाही चुकविता आला नाही. बारा वर्षांचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास तर पांडवांच्याही नशिबाला आलाच ना..?

पांडव धर्मनिष्ठ असुनि । द्रौपदी कृष्णाची भगिनी ।कौरवे किती केली छळना । चुकेना कर्मगती कोणा ॥ऋषीमुनी मोक्ष अधिकारी । तसे ते नृपती चक्रधारी ।करावी कित्येकांची गणना । चुकेना कर्मगती कोणा ॥

तात्पर्य काय..? तर प्रारब्ध अटळ आहे, हे त्रिवार सत्य आहे. असे असले तरी नुसतेच प्रारब्धावर हवाला ठेवून जीवन जगता येणार नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा ही केलीच पाहिजे. अथक प्रयत्न करुनही ईप्सित साध्य होत नसेल तर खचून न जाता 'प्रारब्धाचा' भाग समजून गप्प रहावे. कांही गोष्टी जगांत अशा आहेत की, त्या संचितानेच प्राप्त होतात. प्रारब्ध, क्रियमाण आणि संचित हा ईश्वरी व्यवस्थेतील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. ही व्यवस्था अमान्य करुन खरं तर माणसाला जगताच येत नाही..!

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक