शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
3
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
4
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
5
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
7
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
8
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
9
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
10
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
11
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
12
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
13
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
14
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
15
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
17
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
18
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
19
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
20
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?

... म्हणून पूर्वीचे लोक पंचांग वाचून मगच बाहेर पडत असत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 11:50 IST

ज्योतिष विद्येचा आवाका अतिशय मोठा आहे. त्यात पंचांग हा एक भाग झाला. पंचांग रोज पाहण्याचे आणि ऐकण्याचे अनेक लाभ आहेत.

प्राचीन काळात वेदांचे अध्ययन केले जात असे. त्यात छंद, व्याकरण, ज्योतिष, निरुक्त, कल्प इ. प्रशिक्षण दिले जात असे. हे सहा वेदांग आहेत. ज्यांना त्यात रस वाटत असे, ते विद्यार्थी या वेदांगांचा सखोल अभ्यास करत असत. यात ज्योतिषाला वेदांगांचे नेत्र मानले गेले आहे. ज्योतिष विद्येचा आवाका अतिशय मोठा आहे. त्यात पंचांग हा एक भाग झाला. पंचांग रोज पाहण्याचे आणि ऐकण्याचे अनेक लाभ आहेत. आताच्या काळात दिनदर्शिकेवर पंचांगातील मुख्य माहिती दिलेली असते. लोक त्यांच्या सोयीने आणि गरजेप्रमाणे ती माहिती वाचतात. परंतु त्यामुळे रोजची तिथी वार नक्षत्र कळत नाहीत. यासाठी पंचांग वाचनाची सवयच उपयोगी ठरते. म्हणून पूर्वीचे लोक घराबाहेर पडण्याआधी पंचांग वाचून मगच बाहेर पडत असत. 

का वाचावे पंचांग ?भारतीय ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान किती पुरातन आहे, याची कल्पना पंचांग वाचनावारून लक्षात येते. दुर्बीण, परग्रह यान, अवकाश शास्त्र अशा संकल्पना विकसितही झाल्या नव्हत्या, अशा काळात आपल्या पूर्वजांनी ग्रह, नक्षत्र, तारे यांची आकाशात काय आणि कशी स्थिती असेल याचे गणित मांडून ठेवले आहे. सूर्य, चंद्र, पृथ्वी, नक्षत्र यांची स्थिती वेदांमध्ये देखील वर्णन करून सांगितली आहे. ग्रह स्थिती, अंतर आणि गती यावरून पृथ्वीवर दिवस रात्र यांचे अचूक कालमानपन केले आहे. यावरून सटीक पंचांग बनवले आहे. बारा महिने म्हणजे एक वर्ष आणि सात दिवस म्हणजे एक सप्ताह ही संकल्पना विक्रम संवत्सरापासून सुरु झाली. महिन्याचा हिशोब सूर्य आणि चन्द्राच्या गतीवर ठरवला जाऊ लागला. 

शास्त्रात म्हटले आहे, की दैनंदिन तिथीचे श्रवण आणि पठण केल्यास लक्ष्मी मातेची कृपा होते. कारण कोणत्या तिथीला कोणते काम करायाला हवे, याचे ज्ञान तिथीनुसार कळते. आपोआप धनलक्ष्मीच्या आगमनाची वेळ आपल्याला लक्षात येते. 

वार आणि त्यासंबंधी माहिती पंचांगात दिलेली असल्यामुळे त्यानुसार दैनंदिन कार्याला गती देता येते. तसेच दिवस वारानुसार दान धर्माचे महत्त्व लक्षात येते. त्यानुसार कृती केल्यामुळे पुण्य प्राप्त होऊन आयु वाढते. 

नक्षत्र पठण केल्यामुळे पाप नष्ट होते. कारण पंचांगात २७ नक्षत्रानुसार त्यांचे महत्त्व आणि त्यांचे लाभ मिळवण्यासाठी दिलेले उपाय याची सविस्तर माहिती दिलेली असते. त्याचे पालन होऊन पाप क्षालन होण्यात मदत होते. 

योग पठण केल्यामुळे आप्त जनांच्या भेटी गाठी होतात आणि शुभ अशुभ योग यांची माहिती असल्यामुळे वियोगाचे प्रसंग टाळता येतात. कोणत्या तिथीला काय करावे याची माहिती तसेच शुभ मुहूर्त त्यात दिलेले असतात.