शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

...तोपर्यंत अनुभवांचा काहीच उपयोग नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 03:24 IST

एकसमान वातावरणात उपलब्ध केलेल्या गोष्टी प्रत्येकजण सारख्याच प्रमाणात आत्मसात करतात असे नाही.

सद्गुरू जग्गी वासुदेवआयुष्यात कोणत्या प्रकारचे अनुभव आले याने काहीच फरक पडत नाही. ते अनुभव तुमच्यात कुठल्या प्रकारचे रूपांतरण घडवून आणतात हे फार महत्त्वाचं आहे. जोपर्यंत तुमच्यात स्व-परिवर्तन घडून येत नाही, तोपर्यंत अनुभवांचा काहीच उपयोग नाही. याचा अर्थ असा नाही की, आपला कायापालट करण्याच्या मागे आपण लागायचं. जर तुम्ही ते आत्मसात केलंत तर परिवर्तन होतंच, यात शंका नाही. प्रत्येकजण समान प्रकारच्या अन्नातून समान पोषण प्राप्त करतात असं नाही. हे वैद्यकीयदृष्ट्यासुद्धा सिद्ध केलं गेलंय. त्याचप्रमाणे, एकसमान वातावरणात उपलब्ध केलेल्या गोष्टी प्रत्येकजण सारख्याच प्रमाणात आत्मसात करतात असे नाही. उदाहरणार्थ, एकाच कुटुंबातील दोन मुले जरी एकसमान वातावरणात एकत्र वाढली असली तरी, दोघं एकमेकांपासून खूप भिन्नरीत्या मोठी होतात. जरी दोघांना सारख्याच गोष्टी दिल्या गेल्या असल्या तरी एक या दिशेला तर एक दुसऱ्या दिशेला. एक आध्यात्मिक प्रक्रिया, जर तिला जागृत करायचं असेल, तर त्यासाठी परित्यागापेक्षा फक्त शहाणपणाने जगणे गरजेचे आहे. कोणत्याही भारतीय भाषांमध्ये ‘परित्याग’ असा शब्द नव्हता. बाहेरून आलेल्या विद्वानांनीच असे म्हटले की, ‘या व्यक्तीने सर्वस्व त्यागले आहे.’ ते तसे नाही, त्याने संपूर्ण विश्वाला आपले मानले आहे; परंतु त्या विद्वानांना असे वाटले की, त्याने सर्वस्वी त्यागले आहे. ही त्यांची समज होती. कारण, काही ना काही गोष्ट आपल्या मालकीची आहे, असा शिक्कामोर्तब केल्याशिवाय ते आयुष्याची कल्पनाच करू शकत नव्हते. ‘या धरतीचा एक भाग माझा आहे.’ ज्याने संपूर्ण ब्रह्मांडालाच आपलंसं केलंय; त्याला आपण या गोष्टी आपल्याभोवती साठवून ठेवाव्यात, असा विचारच त्याच्या मनात उद्भवत नाही. तुम्हाला आंतरिक दृष्टिकोनाची गरज आहे म्हणून आयुष्यातील प्रत्येक अनुभवानिशी आपले आयुष्य समृद्ध करावे की त्याचा वापर जीवनाचा अधिकाधिक प्रतिरोध करण्यासाठी, याची निवड तुम्हीच करायला हवी.