शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

...तोपर्यंत अनुभवांचा काहीच उपयोग नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 03:24 IST

एकसमान वातावरणात उपलब्ध केलेल्या गोष्टी प्रत्येकजण सारख्याच प्रमाणात आत्मसात करतात असे नाही.

सद्गुरू जग्गी वासुदेवआयुष्यात कोणत्या प्रकारचे अनुभव आले याने काहीच फरक पडत नाही. ते अनुभव तुमच्यात कुठल्या प्रकारचे रूपांतरण घडवून आणतात हे फार महत्त्वाचं आहे. जोपर्यंत तुमच्यात स्व-परिवर्तन घडून येत नाही, तोपर्यंत अनुभवांचा काहीच उपयोग नाही. याचा अर्थ असा नाही की, आपला कायापालट करण्याच्या मागे आपण लागायचं. जर तुम्ही ते आत्मसात केलंत तर परिवर्तन होतंच, यात शंका नाही. प्रत्येकजण समान प्रकारच्या अन्नातून समान पोषण प्राप्त करतात असं नाही. हे वैद्यकीयदृष्ट्यासुद्धा सिद्ध केलं गेलंय. त्याचप्रमाणे, एकसमान वातावरणात उपलब्ध केलेल्या गोष्टी प्रत्येकजण सारख्याच प्रमाणात आत्मसात करतात असे नाही. उदाहरणार्थ, एकाच कुटुंबातील दोन मुले जरी एकसमान वातावरणात एकत्र वाढली असली तरी, दोघं एकमेकांपासून खूप भिन्नरीत्या मोठी होतात. जरी दोघांना सारख्याच गोष्टी दिल्या गेल्या असल्या तरी एक या दिशेला तर एक दुसऱ्या दिशेला. एक आध्यात्मिक प्रक्रिया, जर तिला जागृत करायचं असेल, तर त्यासाठी परित्यागापेक्षा फक्त शहाणपणाने जगणे गरजेचे आहे. कोणत्याही भारतीय भाषांमध्ये ‘परित्याग’ असा शब्द नव्हता. बाहेरून आलेल्या विद्वानांनीच असे म्हटले की, ‘या व्यक्तीने सर्वस्व त्यागले आहे.’ ते तसे नाही, त्याने संपूर्ण विश्वाला आपले मानले आहे; परंतु त्या विद्वानांना असे वाटले की, त्याने सर्वस्वी त्यागले आहे. ही त्यांची समज होती. कारण, काही ना काही गोष्ट आपल्या मालकीची आहे, असा शिक्कामोर्तब केल्याशिवाय ते आयुष्याची कल्पनाच करू शकत नव्हते. ‘या धरतीचा एक भाग माझा आहे.’ ज्याने संपूर्ण ब्रह्मांडालाच आपलंसं केलंय; त्याला आपण या गोष्टी आपल्याभोवती साठवून ठेवाव्यात, असा विचारच त्याच्या मनात उद्भवत नाही. तुम्हाला आंतरिक दृष्टिकोनाची गरज आहे म्हणून आयुष्यातील प्रत्येक अनुभवानिशी आपले आयुष्य समृद्ध करावे की त्याचा वापर जीवनाचा अधिकाधिक प्रतिरोध करण्यासाठी, याची निवड तुम्हीच करायला हवी.