शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

शत्रूपासून सावध राहताना या चार गोष्टी लक्षात ठेवा!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: February 3, 2021 17:18 IST

दर वेळी नवीन चूक करा, पण आधी घडलेल्या चुकांची पुनरावृत्ती अजिबात नको!

कोणावरही विश्वास ठेवावा अशी परिस्थिती राहिलेली नाही. लोक तर म्हणतात, आपल्या सावलीवरही विश्वास ठेवू नका, कारण अंधारात तीसुद्धा आपली साथ सोडते, मग आपले म्हणवणाऱ्या लोकांची काय कथा! मात्र, वेळप्रसंगी आपण छोट्या पण महत्वाच्या गोष्टी विसरतो आणि घडलेल्या चुका वारंवार करतो. या चुका घडू नयेत म्हणून एका छोट्याशा चिमणीने राजाला अद्दल शिकवली. 

एका माळ्याने लावलेल्या बागेत एक चिमणी येऊन रोज नासधूस करत होती. त्याने खूप प्रयत्न केले, परंतु तो चिमणीवर नियंत्रण आणू शकला नाही. त्याने कंटाळून राजासमोर आपली व्यथा मांडली. प्रजेचे हित लक्षात घेता, राजाने माळ्याचे दु:खं दूर करण्यासाठी आपले सैनिक पाठवले. सैनिक बागेवर लक्ष ठेवू लागले. परंतु चिमणी त्यांच्या डोळ्यादेखत बागेचे नुकसान करत असलेले पाहून सैनिकांनी तलवारी उपसल्या. परंतु, त्यांच्या वारातून निसटत इवलीशी चिमणी निघून गेली. असे सलग चार पाच दिवस झाल्यावर चिमणी आपल्या तावडीत येत नसल्याचे सैनिकांनी राजाला सांगितले. शेवटी राजा बागेत पोहोचला. भल्या मोठ्या शत्रूंना खडे चारणारा योद्धा अशी ओळख असलेला राजा तलवार घेऊन एका बगिचात काय करतोय, हे बघायला गावकऱ्यांची गर्दी जमली. 

चिमणी रोजच्या वेळेत आली. या झाडावरून त्या झाडावर भिरभिरू लागली. राजाने तिला एक दोनदा तलवारीचा धाक दाखवला, पण ती बधली नाही. उलट जास्तच त्रास देऊ लागली. राजा रागारागाने तिच्या दिशेने धावला आणि साधारण तासभराच्या झटापटीनंतर चिमणी राजाच्या तावडीत सापडली. चिमणी घाबरली. माळी आनंदून गेला. सैनिकांचाही जीव भांड्यात पडला. राजा त्या चिमणीला मारणार, इतक्यात चिमणीने राजाकडे हात जोडत विनवणी केली. माफी मागितली आणि म्हणाली, `हे राजा, आज माझा मृत्यू निश्चित आहे याची मला कल्पना आहे. परंतु मृत्यूआधी मला तुम्हाला चार गोष्टी सांगाव्याशा वाटत आहेत. त्या कृपया ऐकून घ्या. कारण त्यात तुमचाच फायदा आहे.'

चिमणीने आधीच एवढा हैदोस घालून झाला होता, की ती आणखी क्षणभरही राजाला नजरेसमोर नको होती. तरीदेखील मृत्यूआधी प्रत्येकाला बोलण्याची संधी दिली जाते. या न्यायाने चिमणीला मुठीत धरून राजा तिला म्हणाला, `जे सांगायचे आहे ते पटकन सांग!'

राजाचा राग पाहून भेदरलेली चिमणी सांगू लागली, `राजा, पहिली गोष्ट म्हणजे आपल्या शत्रूला कधीच हातातून निसटू देऊ नकोस. दुसरी गोष्ट असंभव गोष्टींवर विश्वास ठेवू नकोस. तिसरी गोष्ट भूतकाळाबद्दल कधीच मनात खंत बाळगू नकोस आणि चौथी गोष्ट म्हणजे...''ऐकतोय, पटकन सांग...चौथी गोष्ट कोणती?' राजा ओरडतच म्हणाला.

चिमणी म्हणाली, `राजा तू माझी मान एवढी आवटळून धरली आहेस की मला शब्दही फुटत नाहीयेत. तुझी पकड थोडीशी सैल कर, चौथी गोष्टही सांगते.'चौथी गोष्ट ऐकण्याच्या नादात राजाने मूठ सैल केली, तशी चिमणी भुर्रकन उडून झाडावर गेली आणि म्हणाली, 'कधीच कोणावर विश्वास ठेवू नकोस.'इवलुशी चिमणी डोळ्यादेखत उडून गेली पण आयुष्याचा मोठा पाठ शिकवून गेली. राजाने आपली तलवान म्यान केली आणि चिमणीला गुरुस्थानी मानून वंदन केले. चिमणीने पुन्हा कधी बागेची नासधूस करणार नाही असा शब्द दिला व राजाने माळ्याला नुकसान भरपाई देऊन त्याचा बगिचा पुनश्च फुलवला. 

आपल्या आयुष्यात घडलेल्या घटना आपल्याला चिमणीप्रमाणे शिकवण देत असतात, परंतु आपणच प्रसंगाकडे डोळेझाक करतो आणि चुकांची पुनरावृत्ती करत राहतो. म्हणून पुढच्या वेळेस चिमणीने सांगितलेल्या चार गोष्टी लक्षात ठेवा आणि दर वेळी नवीन चूक करा, पण आधी घडलेल्या चुकांची पुनरावृत्ती अजिबात नको!