शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
2
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
3
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
4
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?
5
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
6
Groww IPO Listing: केवळ ५% होता GMP, पण कंपनीची धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 'या' शेअरनं दिला २३% पेक्षा जास्त फायदा
7
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाची अपडेट, संशयितांना कार विकणारा डीलर ताब्यात!
8
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक दहशतवादी डॉक्टर अटकेत; देशभरात छापेमारी सुरू...
9
निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित! एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर १ लाखाहून अधिक पेन्शन मिळवा
10
Delhi Blast : २६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा होता प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा
11
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
12
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
13
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
14
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
15
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
16
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
17
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
18
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
19
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
20
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?

विठोबाच्या विटेवर एक दिवस उभा राहिलेल्या भक्ताचा अनुभव वाचा त्याच्याच मुखातून...!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: July 18, 2022 18:34 IST

देवाची योजना आपल्या योजनेपेक्षा नक्कीच 'सरस' असते; ही गोष्ट वाचून तुम्हालाही ते पटेल!

डेरेदार वृक्षावर आवळा का? आणि नाजूक वेलीवर भोपळा का? असे प्रश्न विचारून देवाच्या योजनेवर शंका घेणे सोडून द्या! या उदाहरणाशी संबंधित गोष्ट तुम्हाला माहीत असेलच, पण आणखी एक गोष्ट जी थेट भगवंताने आपल्या भक्ताला सांगितली, ती थेट तुमच्यापर्यंत! आता ही गोष्ट समजा नाहीतर देवाचा निरोप समजा, पण कथा शेवट्पर्यंत नक्की वाचा!

एकदा विठोबाला त्याचा भक्त म्हणाला, देवा युगे अठ्ठावीस तू इथे उभा आहेस. दमला असशील. तुझी हरकत नसेल तर मी तुझ्या जागी उभा राहतो, तू थोड्या वेळ विश्रांती घे नाहीतर कुठे फिरून ये. एक दिवस तुझे कामकाज मी सांभाळतो! 

देवाला हायसे वाटले. आजवर असा प्रस्ताव कोणीच मांडला नव्हता. विठोबा खुश झाला. त्याला आपली जागा दिली. पोशाख दिला आणि ताकीद दिली. दिवसभर जे घडेल ते निमूटपणे बघायचं, ढवळाढवळ करायची नाही. आपण मूर्ती आहोत हे भान विसरायचे नाही. भक्ताने मान डोलवली. तो विठोबाच्या विटेवर उभा राहिला. दिवसभर लोक दर्शनाला येत होते. आपली गाऱ्हाणी सांगत होते. समोर प्रसाद येत होता पण काहीच खाता येणार नव्हते. 

दिवस मावळतीला झुकला. एक शेठजी आले. त्यांनी आपली बरकत होऊ दे असे मागणे मागितले आणि नमस्कार करून निघून गेले. जाता जाता त्यांचे पाकीट खिशातून मंदिरात पडले. भक्ताला ते दिसले पण थांबवता येईना. थोड्या वेळाने एक गरीब माणूस आला. देवाला म्हणाला, माझी मुलं बायको उपाशी आहेत, त्यांच्या पोटापाण्याची सोय होऊ शकेल असं काहीतरी कर देवा... असे म्हणत तो नमस्कार करू लागला, तर त्याला शेटजींचे पाकीट मिळाले. त्यात पैसे होते. देवानेच आपली सोय केली अशा विचारात त्याने इथे तिथे बघितले आणि पाकीट सदऱ्यात लपवून तो नमस्कार करत निघून गेला. काही वेळाने एक नावाडी आला, म्हणाला 'देवा मोठ्या प्रवासाला निघतोय. कृपा ठेवा. प्रवास सुखरूप होऊ द्या.'  

नावाडी देवाची करुणा भाकत असताना शेठजी पाकीट शोधत मंदिरात आले आणि त्या नावाड्याने पाकीट चोरले अशा संशयावरून त्याला मारझोड करत पाकिटाची चौकशी करू लागले. भक्ताला नावाड्याचे हाल पाहवेना. त्याने मूर्तीच्या मागच्या बाजूने पळ काढला आणि शेठजींना थांबवून गरीब माणसाचा पत्ता दिला. शेठजींनी नाविकाला सोडले आणि ते गरीब माणसाचा शोध घेत त्याच्या घरी गेले. 

तेवढ्यात विठोबा आले. भक्त म्हणाला देवा, मी तुमचे काम केले. सगळी हकीकत सांगितली. विठोबाने कपाळाला हात लावला आणि म्हणाले, 'तू माझं सगळं काम बिघडवून टाकलंस! मी तुला फक्त निमूटपणे उभा राहा म्हणालो होतो. पण तू भलाई करायला गेलास आणि सगळ्यांची गैरसोय केलीस!'

भक्त काकुळतीला आला व म्हणाला, माझे काय चुकले देवा? त्यावर विठोबा म्हणाले, 'शेठजींना कसलीही कमी नाही. त्यांचे पाकीट पडले त्यातून मी गरीब माणसाची सोय लावून दिली होती. शेठजींना ज्या नावाड्यावर संशय आला त्याचा प्रवासात अपघात होणार होता. शेठजींमुळे तो तुरुंगात गेला असता. त्याचा मृत्यू टळला असता आणि गरीब पोटभर जेवला असता. एवढेसे पैसे गेल्याने शेटजींचे काहीच नुकसान होणार नव्हते. पण तू सगळी गडबड केलीस आणि आता त्याची शिक्षा त्यांना भोगावी लागणार!' 

भक्ताने देवाचे पाय धरले आणि म्हणाला, 'देवा तुमच्या कामात ढवळाढवळ करून मी मोठी चूक केली. आम्ही ज्या योजना करतो त्यापेक्षा तुम्ही केलेल्या योजना सर्वांचा विचार करून केलेल्या असतात हे लक्षात आलं!' 

म्हणून गीतेचे सार देताना श्रीकृष्ण म्हणतात, 

जो हुआ वह अच्छा हुआ है, जो होगा वह अच्छा होगा!