शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
5
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
6
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
7
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
8
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
9
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
10
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
11
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
12
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
13
IPL Auction 2026 LIVE: केकेआरचा मोठा डाव, कॅमरून ग्रीनपाठोपाठ पतिरानावर लावली विक्रमी बोली
14
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
15
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉसह सरफराज खानला कुणीच दिला नाही भाव; सलग दुसऱ्यांदा 'अनसोल्ड'चा ठपका
16
खळबळजनक! लेकीच्या कस्टडीसाठी पतीने रचला भयंकर प्लॅन; टीव्ही अभिनेत्री पत्नीला केलं किडनॅप
17
नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना दिल्लीत आणले; थायलंडला पळून गेले होते
18
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मार्च २०२६ पूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, सरकारनं दिली महत्त्वाची माहिती
19
सेकंदात तयार होणारी मॅगी कॅप्सूल खरी की खोटी? ४० मिलियन लोकांनी बघितलेल्या व्हिडीओचं सत्य काय?
20
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम!
Daily Top 2Weekly Top 5

दृष्टीवर भक्तीची काच बसवा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 16:18 IST

आपण डोळ्यावर कुठल्या रंगाची काच बसविली आहे, त्यावरच आपली दृष्टी अवलंबून आहे. आपण आध्यात्माच्या शुभ्र, स्वच्छ रंगाची काच डोळ्यावर बसवा म्हणजे जे दिसेल ते पवित्र, शुभ व मंगलच दिसेल..!

- युवा कीर्तनकार, ह.भ.प. ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र )

परमेश्वराने माणसाला जी इंद्रिये दिली ती नुसतीच विषय भोगासाठी नसून त्या इंद्रियांनी सर्वेश्वराला ओळखता आले पाहिजे. आज वासना तृप्तीसाठी माणूस वाट्टेल ते करा करावयाला प्रवृत्त होत आहे. माणूस निसर्गाची तर शिकार करीत आहेच पण सर्वांत दुर्दैव म्हणजे माणूस माणसाची पण शिकार करीत आहे.

पाप हे सर्वप्रथम डोळ्यातून मनांत प्रवेश करते म्हणूनच डोळ्यांनी जे काही बघाल ते चांगलेच बघा. दृष्टीत शुद्धभाव ठेवा. आपल्याकडे एक वाक्प्रचार आहे -

जशी दृष्टी तशी सृष्टी..!

एकदा म्हणे द्रोणाचार्यांनी धर्मराजाला सांगितले की, या जगातून एखादा वाईट माणूस मला आणून दे.. धर्मराज खूप खूप हिंडले पण वाईट माणूस सापडलाच नाही. शेवटी ते रिकाम्या हातानेच द्रोणाचार्यांकडे परत आले.

आता द्रोणाचार्य दूर्योधनाला म्हणाले, दूर्योधना.. मला या जगातला एखादा चांगला माणूस आणून दे. दूर्योधनदेखील खूप खूप हिंडला पण त्यालाही चांगला माणूस मिळाला नाही. तो देखील रिकाम्या हातानेच परत आला. आता हा तर फक्त आणि फक्त दृष्टीतलाच भेद आहे. 

ज्या डोळ्यांना ईश्वराचेच रुप बघण्याची सवय आहे त्यांना जगातल्या सर्व रुपात तोच दिसला. अध्यात्म हा दृष्टीतील भाव पार बदलून टाकते. दृष्टीतील भाव बदलला तर वाईटातही चांगलेच दिसते.

एकदा स्वामी रामकृष्ण परमहंस आपल्या काही शिष्यांसमवेत रस्त्याने जात होते. त्या रस्त्यावर अनेक लावण्यसंपन्न गणिका (वेश्या) उभ्या होत्या. एका घराच्या माडीवर एक लावण्यवती सोळा शृंगार करुन उभी होती. जणूकाही सौंदर्याची मूर्तीमंत आकृतीच..! भगवान रामकृष्णांची आणि तिची दृष्टादृष्ट झाली. त्यांनी तिला पाहिले आणि तिचे लावण्य पाहताक्षणी स्वामी रामकृष्णांची समाधी लागली. बरोबर जे शिष्यगण होते त्यांना वाटले की, स्वामींचे वैराग्य संपले, यांच्या दृष्टीत पाप शिरले. हे ढोंगी, लबाड आहेत. हे कसले साधू..?  

स्वामी रामकृष्ण मात्र त्या लावण्यवतीकडे बघत बघत परमोच्च अवस्थेला पोचले. काही क्षणानंतर सावध झाल्यावर रामकृष्णांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, आहाहा..! हे परमेश्वरा..! तू जर ही एवढी सुंदर स्त्री घडविली असशील तर तिला निर्माण करणारा तू किती सुंदर असशील..? आता स्वामी रामकृष्णांच्या दृष्टीतील हा निर्मळ, पवित्र भाव बघा..! म्हणून आपण डोळ्यावर कुठल्या रंगाची काच बसविली आहे त्यावरच आपली दृष्टी अवलंबून आहे. आपण आध्यात्माच्या शुभ्र, स्वच्छ रंगाची काच डोळ्यावर बसवा म्हणजे जे दिसेल ते पवित्र, शुभ व मंगलच दिसेल..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी 87 93 03 03 03 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक