शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
2
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
4
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
5
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
6
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
7
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
8
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
9
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
10
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
11
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
12
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
13
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
14
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
15
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
16
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
17
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
18
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
19
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...

अंत:करणातील सामर्थ्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 08:48 IST

अंत:करणातील करुणेचा आणि दयेचा सागर म्हणजे राम! या दृष्टीने श्रीरामाच्या चैतन्याशी जेव्हा खरी एकरूपता साधते, तेव्हाच अंतर्यामी असणारा हा चैतन्यघन राम अंत:करणातील वृत्तीचे जागरण घडवितो.

- मोहनबुवा रामदासीरघुवीर भजनाची मानसी प्रीती लागो।रघुवीर भजनाची अंतरी वृत्ती जागो।श्री समर्थांचा अत्यंत लाडका शब्द म्हणजे रघुवीर. समर्थ रामासाठी रघुवीर शब्द उच्चारतात. जय जय रघुवीर समर्थ ही गर्जना तर चारशे वर्षांपूर्वी आळशावरी गंगा आली, याप्रमाणे महाराष्ट्राला संजीवनीचा महामंत्र देणारी ठरली. मृतप्राय झालेला समाज या एका गर्जनेने जागा होतो. किती ताकद असेल समर्थांच्या सामर्थ्याची, याची कल्पना येते. समर्थांचा रघुवीर म्हणजे श्रीराम समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वसामान्य भक्त हा मूर्ती, प्रतिमा किंवा प्रतीकात्मक कशाचा तरी आधार घेऊनच देवाच्या देवत्वावर श्रद्धा आणि विश्वास ठेवतो. जगाच्या दृष्टीने हे योग्य असते; पण समर्थांसारखे आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांप्रमाणे ते भाव, भक्ती आणि ईश्वराबद्दलच्या प्रेमाचे अधिष्ठान अबाधित ठेवूनच केवळ मूर्ती, प्रतिमांच्या पलीकडे ते विश्वात्मक चैतन्य असतं. त्याच्यावर प्रेम करायला सांगतात. रघुनाथदासा कल्याण व्हावे किंवा आता विश्वात्मके देवे या देवत्वाबद्दलच्या उदात्त कल्पना समर्थांनी तब्बल चारशे वर्षांपूर्वी तत्कालीन समाजासमोर मांडल्या. विश्वात्मक चैतन्य आणि प्रत्येकाच्या अंत:करणात अधिष्ठान रूपाने बसलेला अंतरात्मा हेच खरं चैतन्यात्मक रामाचे स्वरूप आहे. ज्या रघुवीराचे समर्थ चिंतन करायला सांगतात, असा हा सर्वव्यापी सर्वांतर्यामी असणारा रघुवीर म्हणजे श्रीराम आहे. त्या चैतन्याच्या सत्तेवरच हे जग चालले आहे. अंत:करणातील सामर्थ्य म्हणजे राम. अंत:करणातील ऊर्जाशक्ती म्हणजे राम. अंत:करणातील प्रेरणाशक्ती म्हणजे राम. अंत:करणातील प्रेम, वात्सल्य आणि स्फूर्ती म्हणजे राम. अंत:करणातील करुणेचा आणि दयेचा सागर म्हणजे राम! या दृष्टीने श्रीरामाच्या चैतन्याशी जेव्हा खरी एकरूपता साधते, तेव्हाच अंतर्यामी असणारा हा चैतन्यघन राम अंत:करणातील वृत्तीचे जागरण घडवितो. जय जय रघुवीर समर्थ!!