शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

अंत:करणातील सामर्थ्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 08:48 IST

अंत:करणातील करुणेचा आणि दयेचा सागर म्हणजे राम! या दृष्टीने श्रीरामाच्या चैतन्याशी जेव्हा खरी एकरूपता साधते, तेव्हाच अंतर्यामी असणारा हा चैतन्यघन राम अंत:करणातील वृत्तीचे जागरण घडवितो.

- मोहनबुवा रामदासीरघुवीर भजनाची मानसी प्रीती लागो।रघुवीर भजनाची अंतरी वृत्ती जागो।श्री समर्थांचा अत्यंत लाडका शब्द म्हणजे रघुवीर. समर्थ रामासाठी रघुवीर शब्द उच्चारतात. जय जय रघुवीर समर्थ ही गर्जना तर चारशे वर्षांपूर्वी आळशावरी गंगा आली, याप्रमाणे महाराष्ट्राला संजीवनीचा महामंत्र देणारी ठरली. मृतप्राय झालेला समाज या एका गर्जनेने जागा होतो. किती ताकद असेल समर्थांच्या सामर्थ्याची, याची कल्पना येते. समर्थांचा रघुवीर म्हणजे श्रीराम समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वसामान्य भक्त हा मूर्ती, प्रतिमा किंवा प्रतीकात्मक कशाचा तरी आधार घेऊनच देवाच्या देवत्वावर श्रद्धा आणि विश्वास ठेवतो. जगाच्या दृष्टीने हे योग्य असते; पण समर्थांसारखे आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांप्रमाणे ते भाव, भक्ती आणि ईश्वराबद्दलच्या प्रेमाचे अधिष्ठान अबाधित ठेवूनच केवळ मूर्ती, प्रतिमांच्या पलीकडे ते विश्वात्मक चैतन्य असतं. त्याच्यावर प्रेम करायला सांगतात. रघुनाथदासा कल्याण व्हावे किंवा आता विश्वात्मके देवे या देवत्वाबद्दलच्या उदात्त कल्पना समर्थांनी तब्बल चारशे वर्षांपूर्वी तत्कालीन समाजासमोर मांडल्या. विश्वात्मक चैतन्य आणि प्रत्येकाच्या अंत:करणात अधिष्ठान रूपाने बसलेला अंतरात्मा हेच खरं चैतन्यात्मक रामाचे स्वरूप आहे. ज्या रघुवीराचे समर्थ चिंतन करायला सांगतात, असा हा सर्वव्यापी सर्वांतर्यामी असणारा रघुवीर म्हणजे श्रीराम आहे. त्या चैतन्याच्या सत्तेवरच हे जग चालले आहे. अंत:करणातील सामर्थ्य म्हणजे राम. अंत:करणातील ऊर्जाशक्ती म्हणजे राम. अंत:करणातील प्रेरणाशक्ती म्हणजे राम. अंत:करणातील प्रेम, वात्सल्य आणि स्फूर्ती म्हणजे राम. अंत:करणातील करुणेचा आणि दयेचा सागर म्हणजे राम! या दृष्टीने श्रीरामाच्या चैतन्याशी जेव्हा खरी एकरूपता साधते, तेव्हाच अंतर्यामी असणारा हा चैतन्यघन राम अंत:करणातील वृत्तीचे जागरण घडवितो. जय जय रघुवीर समर्थ!!