शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

...तोच आनंदाच्या साम्राज्याचा राज्यधारी असतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 10:47 IST

ही सत्ता त्याच्या आत्मबळावर कमवलेली असते, त्यामुळे इथे विचारांचा गोंधळ नसतो. तो खरा स्वातंत्र्याचा आनंद घेऊ शकतो.

- मोहनबुवा रामदासीछंदोग्य उपनिषदात स्वानंद साम्राज्य उपभोगणाऱ्या माणसाला ‘स्वराट’ म्हणजे स्वत:चा राजा, अशी उपमा दिलेली आहे. देहबुद्धीच्या खोट्या आणि फसव्या ‘मी’ला बाजूला सारून, त्याची शक्ती क्षीण करून आत्मबुद्धीच्या ख-या ‘मी’ला स्वीकारतो, तोच खरा स्वत:च स्वत:चा स्वामी होतो. या त्याच्या स्वामित्वापुढे कोणाचीच सत्ता चालत नाही. ही सत्ता त्याच्या आत्मबळावर कमवलेली असते, त्यामुळे इथे विचारांचा गोंधळ नसतो. तो खरा स्वातंत्र्याचा आनंद घेऊ शकतो. देहबुद्धीच्या तडाख्यातून निसटलेला आणि खोट्या दृष्यबंधनातून मोकळा झाल्याने तो स्वत:च्या साम्राज्यात अखंड स्वानंद उपभोगत असतो. त्याला त्याच्या स्वानंदाचा आनंद घेण्यासाठी कोणत्याही बाह्य साधनांची गरज नसते. मुळातच आनंदाचा पिंड घेऊन जन्माला आलेला हा जीव दु:खाच्या खाणीत कसा लोटला जातो? माणसाला स्वत:च्या गरजा माहिती असतात. त्या भागविताना तो पिढ्यान्पिढ्यांचा विचार करतो आणि खरे तर तो आनंदाच्या साम्राज्याचा राज्यधारी असतो; पण लाचारपणामुळे त्याची अवस्था भिका-याप्रमाणे होते. समाजात त्याच्यासारखा दु:खी तोच असल्याचे पाहावयास मिळते. परमार्थात हा स्वार्थ पाहणारा कधीच सुखी झालेला पाहायला मिळत नाही. नरदेहरूपी हे राज्यवैभव त्याला मिळालेले असूनही तो स्वार्थापायी स्वत:चा घात करून घेतो. स्वतंत्र असणारा जीव मायापाशात गुरफटल्याने परस्वाधीन झाला आहे. क्षणिक सुखाच्या आधीन झालेला जीव दु:ख विसरण्यासाठी व्यसनाधीन होतो आणि स्वत:चे व घरादाराचे भरून निघणार नाही अशा प्रकारचे नुकसान करून घेतो. म्हणून साधकाने स्वत:ची दिशा आणि मार्ग विवेकाने शोधावा! विवेक हीच खरी ईश्वरी शक्ती आत भरलेली आहे. त्या विवेक आणि विचाराने स्वत:चे साम्राज्य स्वत:च आबाधित ठेवावे. आंतरिक आत्मरूपी साम्राज्यातच तो खरा राज्यधारी असतो.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक