शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

'आमची माती, आमची माणसं'; माती आणि माणसांचे मोल समजावत आहेत संत कबीर!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 28, 2021 20:24 IST

सारे भौतिक जग मातीतून निर्माण होते. माती म्हणजे चैतन्य. ते सुप्त असते. या मातीतच जीवनातील सारा सुगंध, सारी चव भरलेली आहे. मातीवर सूर्यकिरण पडून ती अधिक ताकदवान होते. माती कधीच मरत नाही. ती अमर बनते.

परदेशात गेलेली मुले, मातृभूमीकडे पाठ फिरवतात, अशी आरोळी आपण ठोकतो. पण, त्यांच्या वर्तनाला कुठेतरी आपणही जबाबदार असतो का? हे लक्षात घेतले पाहिजे. जी मुले बालपणी इथल्या मातीत खेळली, बागडली नाहीत, पडली-झडली नाहीत, त्यांची या मातीशी नाळ जुळणार तरी कशी? आपल्या मातीशी इमान राखायचा, तर मुळात मातीची किंमत कळणे गरजेचे आहे.  संत कबीर आपल्या दोह्यातून मातीचे मोल समजावून देत आहेत.

माटी कहे कुम्हार से तू क्या रुंदे मोहिइक दिन ऐसा होयगा मैं रुंदूंगी तोहि - संत कबीर

या दोह्याचे निरुपण करताना लेखक प्रभाकर पिंगळे म्हणतात, संत कबीर हे एक जबरदस्त ताकदीचे संतकवी होऊन गेले.दुर्बलांच्या अंगी काय ताकद असते, हे त्यांनी वरील दोह्यात मस्त सांगितले आहे. माती कुम्हाराला म्हणजे कुंभाराला म्हणते की, अरे तू मला पायाखाली तुडवतोस काय? एक दिवस असा उजाडेल की मीच तुला तुडवेन! मातीची ही महती कुसुमाग्रजांच्या आगगाडी आणि जमीन या कवितेतही गायलेली आढळते. नको गं नको गं, आक्रांदे जमीन! पण आगगाडी मात्र त्वेषाने फुत्कार टाकत म्हणते की, अशीच चेंदत धावेन धावेन...! मातीला अन्याय असह्य होतो. जमीन हादरते. पूल कोसळतो आणि गाडीचा चेंदामेंदा होतो.

रुद्रास आवाहन करतानाही भा. रा. तांबे सांगतात, सामान्य लोकांच्या मनात स्वातंत्र्याचा स्फुल्लिंग पेटला तर तो हत्तीवरून मत्त नृपाला खाली ओढतो. दुष्ट सिंहासने पालथी घालतो.

शिवाजी महाराजांसारखे नेतृत्व लाभले, तर हेटकरी, मेटकरीदेखील तलवारबहाद्दर होतात, एवढेच काय, तर स्वराज्यात गवतालाही भाले फुटतात. म. गांधींच्या देशात तर चमत्कारच घडतो. मदांध ब्रिटीश सत्ता उलथवून टाकण्यासाटी बायकामुलेही रस्त्यावर उतरतात. तीही नि:शस्त्र! वंदे मातरम सारखा मंत्र तळागाळातल्या लोकांना स्फुरण देऊन जातो.

विनोबांनी मातीसंबंधी सांगितले आहे, माती म्हणजे मोठी माता. मातेचे स्तन्य पिऊन आम्ही मोठे होतो. एरवी मातीबद्दल आपण तुच्छता बाळगतो. माझ्या आयुष्याची माती झाली, हा वाकप्रचार आपण नाश होणे या अर्थी वापरतो. पण हे अनुचित आहे. ज्या मातीपासून कुंभार मडकी घडवतो, तोही मातीला अगोदर पायाखाली तुडवतो. पण मातीचे वैशिष्ट्य तो ध्यानात घेतो का? माती कधीच सडत नाही, नासत नाही. सारे भौतिक जग मातीतून निर्माण होते. माती म्हणजे चैतन्य. ते सुप्त असते. या मातीतच जीवनातील सारा सुगंध, सारी चव भरलेली आहे. मातीवर सूर्यकिरण पडून ती अधिक ताकदवान होते. माती कधीच मरत नाही. ती अमर बनते.

आनंदवनात महारोग्यांची प्रेते जाळण्याऐवजी पुरतात आणि त्याजागी झाड लावतात. ताडोबाचे जंगल असेच फोफावले आहे. सारे सृष्टीसौंदर्य मातीतून निर्माण होते. निर्झर खळाळतात तेही मातीतच. 

पुराणात वर्णन केले आहे, की मातीवर म्हणजे पृथ्वीच्या पाठीवर जेव्हा दैत्य माजतात, तेव्हा ती गायीचे रूप घेऊन ब्रह्मदेवाकडे जाते. मग या गायीचे रक्षण करण्यासाठी ईश्वर अवतार धारण करतो. दैत्यांचा संहार करतो.

राम, कृष्ण, शिवाजी महाराज सारे महान अवतार मातीशी इमान राखत होते म्हणून त्यांनी जनसामान्यांच्या तनमनात प्राण फुंकून स्वत्वाची जाणीव त्यांना करून दिली.