शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

'आमची माती, आमची माणसं'; माती आणि माणसांचे मोल समजावत आहेत संत कबीर!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 28, 2021 20:24 IST

सारे भौतिक जग मातीतून निर्माण होते. माती म्हणजे चैतन्य. ते सुप्त असते. या मातीतच जीवनातील सारा सुगंध, सारी चव भरलेली आहे. मातीवर सूर्यकिरण पडून ती अधिक ताकदवान होते. माती कधीच मरत नाही. ती अमर बनते.

परदेशात गेलेली मुले, मातृभूमीकडे पाठ फिरवतात, अशी आरोळी आपण ठोकतो. पण, त्यांच्या वर्तनाला कुठेतरी आपणही जबाबदार असतो का? हे लक्षात घेतले पाहिजे. जी मुले बालपणी इथल्या मातीत खेळली, बागडली नाहीत, पडली-झडली नाहीत, त्यांची या मातीशी नाळ जुळणार तरी कशी? आपल्या मातीशी इमान राखायचा, तर मुळात मातीची किंमत कळणे गरजेचे आहे.  संत कबीर आपल्या दोह्यातून मातीचे मोल समजावून देत आहेत.

माटी कहे कुम्हार से तू क्या रुंदे मोहिइक दिन ऐसा होयगा मैं रुंदूंगी तोहि - संत कबीर

या दोह्याचे निरुपण करताना लेखक प्रभाकर पिंगळे म्हणतात, संत कबीर हे एक जबरदस्त ताकदीचे संतकवी होऊन गेले.दुर्बलांच्या अंगी काय ताकद असते, हे त्यांनी वरील दोह्यात मस्त सांगितले आहे. माती कुम्हाराला म्हणजे कुंभाराला म्हणते की, अरे तू मला पायाखाली तुडवतोस काय? एक दिवस असा उजाडेल की मीच तुला तुडवेन! मातीची ही महती कुसुमाग्रजांच्या आगगाडी आणि जमीन या कवितेतही गायलेली आढळते. नको गं नको गं, आक्रांदे जमीन! पण आगगाडी मात्र त्वेषाने फुत्कार टाकत म्हणते की, अशीच चेंदत धावेन धावेन...! मातीला अन्याय असह्य होतो. जमीन हादरते. पूल कोसळतो आणि गाडीचा चेंदामेंदा होतो.

रुद्रास आवाहन करतानाही भा. रा. तांबे सांगतात, सामान्य लोकांच्या मनात स्वातंत्र्याचा स्फुल्लिंग पेटला तर तो हत्तीवरून मत्त नृपाला खाली ओढतो. दुष्ट सिंहासने पालथी घालतो.

शिवाजी महाराजांसारखे नेतृत्व लाभले, तर हेटकरी, मेटकरीदेखील तलवारबहाद्दर होतात, एवढेच काय, तर स्वराज्यात गवतालाही भाले फुटतात. म. गांधींच्या देशात तर चमत्कारच घडतो. मदांध ब्रिटीश सत्ता उलथवून टाकण्यासाटी बायकामुलेही रस्त्यावर उतरतात. तीही नि:शस्त्र! वंदे मातरम सारखा मंत्र तळागाळातल्या लोकांना स्फुरण देऊन जातो.

विनोबांनी मातीसंबंधी सांगितले आहे, माती म्हणजे मोठी माता. मातेचे स्तन्य पिऊन आम्ही मोठे होतो. एरवी मातीबद्दल आपण तुच्छता बाळगतो. माझ्या आयुष्याची माती झाली, हा वाकप्रचार आपण नाश होणे या अर्थी वापरतो. पण हे अनुचित आहे. ज्या मातीपासून कुंभार मडकी घडवतो, तोही मातीला अगोदर पायाखाली तुडवतो. पण मातीचे वैशिष्ट्य तो ध्यानात घेतो का? माती कधीच सडत नाही, नासत नाही. सारे भौतिक जग मातीतून निर्माण होते. माती म्हणजे चैतन्य. ते सुप्त असते. या मातीतच जीवनातील सारा सुगंध, सारी चव भरलेली आहे. मातीवर सूर्यकिरण पडून ती अधिक ताकदवान होते. माती कधीच मरत नाही. ती अमर बनते.

आनंदवनात महारोग्यांची प्रेते जाळण्याऐवजी पुरतात आणि त्याजागी झाड लावतात. ताडोबाचे जंगल असेच फोफावले आहे. सारे सृष्टीसौंदर्य मातीतून निर्माण होते. निर्झर खळाळतात तेही मातीतच. 

पुराणात वर्णन केले आहे, की मातीवर म्हणजे पृथ्वीच्या पाठीवर जेव्हा दैत्य माजतात, तेव्हा ती गायीचे रूप घेऊन ब्रह्मदेवाकडे जाते. मग या गायीचे रक्षण करण्यासाठी ईश्वर अवतार धारण करतो. दैत्यांचा संहार करतो.

राम, कृष्ण, शिवाजी महाराज सारे महान अवतार मातीशी इमान राखत होते म्हणून त्यांनी जनसामान्यांच्या तनमनात प्राण फुंकून स्वत्वाची जाणीव त्यांना करून दिली.