शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आपली ओळख नाव, जाती किंवा धर्मावरून न होता कर्मावरून निर्माण केली पाहिजे -आचार्य चाणक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 17:22 IST

लोक नाव विचारून जात, धर्म, पंथ यांची चाचपणी करतात; मात्र मनुष्याने खरी ओळख निर्माण केली पाहिजे ती आपल्या कर्मावरून!

नाव ठेवणे हा मनुष्यस्वभावच आहे, तसा नाव ठेवणे हा एक सोहळादेखील आहे. नाव ठेवण्याचा एक प्रकार आयुष्यभर सुरूच राहतो, तर नाव ठेवण्याचा दुसरा प्रकार आयुष्यभराची ओळख मिळवून देतो. कोऽऽहम, कोऽऽहम म्हणजे मी कोण, मी कोण असे विचारणाऱ्या बाळाला नाव ठेवले, की त्याचे रडणे थांबते. सोहम अशी त्याची ओळख पटते. या नामविधीला अतिशय महत्त्व असते. बाळ जन्माला आल्यापासून त्याचे नाव काय ठेवायचे, यावर घरात मोठी चर्चा सुरू असते. कधी ते राशीवरून ठेवले जाते, तर कधी रूपावरून, कधी आवडीवरून तर कधी पूर्वजांच्या आठवणीवरून. 

नावात काय ठेवले आहे, असे शेक्सपिअर म्हणतो, परंतु नावावरूनच पुढे ओळख बनते आणि नाम कमावले की नामाची दिगंत किर्ती पसरते. म्हणून पाळण्यातल्या बाळाचे नाव ठेवताना फार विचारपूर्वक ठेवायचे असते. अलीकडचे आई बाबा मॉडर्न नावांवर भर देतात, नावांची पुस्तक धुंडाळतात, पोथ्या-पुराणांतून `युनिक' नाव शोधून काढतात, थोडक्यात बरीच खटपट करतात.

पूर्वी तसे नव्हते. मुलांची नावे सरसकट ठेवली जात असे. त्यातही देवादिकांच्या नावावर जास्त भर असे. मुलांना हाक मारताना देवाचे नाव घेतले जावे, हा त्यामागचा हेतू असे. मात्र, अनेकदा बाळंतपणात, रोगराईत मुले जन्मत:च दगावत असत. मग जे मूल जिवंत राहत असे, त्याचे नाव दगडू, धोंडू असे ठेवले जात असे. 

अशाच एका धनिकाचा एक मुलगा होता. त्याचे नाव ठेवले होते ठणठणपाळ. अशा निरर्थक नावाचे ओझे त्याने ऐन तारुण्यातही पेलले. मात्र, बायको आली आणि ती त्याला नाव बदलून घेण्यावर रोज बोल सुनावू लागली. कंटाळलेला ठणठणपाळ घर सोडून निघून गेला. 

गावाची वेस ओलांडली. एका वडाच्या पारावर जाऊन बसला. तिथे एक फकीर आले आणि त्यांनी ठणठणपाळला त्याच्या दु:खाचे कारण विचारले. त्याने आपले दु:ख प्रगट केले. फकिर हसले, म्हणाले, नावाचे काय घेऊन बसलास? माणूस नावाने नाही, तर कामाने ओळखला गेला पाहिजे. तू चांगले काम केलेस तर लोक तुला ठणठणपाळ शेठ म्हणून ओळखतील. बायकोलाही तुझ्या कर्तृत्त्वाचा हेवा वाटेल. फकिरांचे बोलणे त्याला काही रुचले नाही. तो नाव बदल करण्यावर अडून राहिला. फकिराने त्याला सांगितले, `तुला काय वाटते, ज्यांचे नाव चांगले, त्यांचे कामही चांगलेच असते का? तुझ्याच गावात जाऊन जरा शोध घे, म्हणजे वस्तुस्थिती आणि विरोधाभास कळेल.'

फकिरांचे बोलणे ऐकून ठणठणपाळ निघाला. एक मावशी गोवऱ्या वेचत होती. तिचे नाव विचारले, तर ती म्हणाली, लक्ष्मी! एक भिकारी मंदिराबाहेर कटोरा घेऊन येणा-जाणाऱ्याला अडवत होता. त्याला नाव विचारले, तर तो म्हणाला- धनपाल! काही पावले पुढे गेल्यावर एक अंत्ययात्रा जात होती. गर्दीतल्या एकाकडे चौकशी केली, गेलेल्या व्यक्तीचे नाव विचारले, तर ते होते अमरसिंह! ठणठणपाळने कपाळाला हात लावला. फकिराजवळ येऊन म्हणाला, `तुम्ही म्हणालात, ते मला पटले आहे. माझे नाव चांगले नसले, तरी मी काम चांगले कमवेन.'

अशाप्रकारे ठणठणपाळचे पुन्हा बारसे झाले नाही, पण त्याने आपल्या कर्तृत्त्वाने ओळख मिळवली. मात्र, आपल्याकडे बाळाचे चांगले नाव ठेवण्याची संधी असेल, तर ते विचारपूर्वकच ठेवले पाहिजे. निरर्थक नाव ठेवण्यापेक्षा पराक्रमी, सद्गुणी, अवतारी व्यक्तीचे नाव ठेवले, तर ते नाव ज्याला ठेवले जाते, तोही ते नाव आणि नावाला साजेसे कर्तृत्त्व अभिमानाने मिरवू शकेल. 

याच गोष्टीला दुजोरा देत आचार्य चाणक्य सांगतात, नाव मोठे करण्यासाठी खटपट करू नका, काम मोठे करा म्हणजे आपोआप नाम मोठे होईल. तुमचे काम शुद्ध असेल तर त्या कामाचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. त्यामुळे नावात, जातीत, धर्मात अडकू नका तर आपले कर्तृत्व मोठे करा! आणि चांगले नाव ठेवलेच तर ते नाव सार्थकी लावा. याबाबतीत आदर्श ठेवला पाहिजे विठ्ठल पंत कुलकर्णी यांच्या चारही मुलांचा! निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई! या नावांचा पारमार्थिक अर्थ असा, की अध्यात्ममार्गात विषयातून निवृत्ती घेतल्याशिवाय ज्ञान मिळत नाही आणि ज्ञान मिळाल्याशिवाय अध्यात्माचा सोपान म्हणजे मार्ग सुलभ होत नाही. या तिन्ही गोष्टी साध्य झाल्या तरच मुक्तता मिळते. या चौघांनी आपले नाम आणि काम दोन्ही मोठे केले, त्यांचाच आदर्श आपणही बाळगूया!