शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

'देव देव्हाऱ्यात नाही' अशी एकदा स्थिती झाली, तेव्हा हनुमंताला रामराय कुठे भेटले पहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 08:00 IST

आपले मन पारमार्थिक विषयात नसून व्यावहारिक विषयात गुंतून राहते. त्यातून मन सोडवण्यासाठी रामरायाला शरण जाऊया.

देवाचा शोध आपण सगळेच घेत असतो, पण तो सगळ्यांनाच सापडतो असे नाही. तो सापडतो ते केवळ भक्तांना. त्यातही तो भक्त हनुमानासारखा असेल, तरच तो लगेच भेटतो आणि भक्तांशी संवाद साधतो. असाच एक गमतीदार पण मार्मिक प्रसंग पहा. 

एकदा मारूतीराय आकाशातून जात असता , त्यांचं खाली लक्ष गेलं. त्यांना दिसलं की एका देवळात कीर्तन चालू होतं आणि रामराय मात्र देवळाबाहेर बसले होते. जवळच लोकांच्या चपलांचा ढीग होता. मारूतीराय लगबगीने खाली उतरले. रामरायांना विचारलं, रामराया, आत एवढे सुंदर कीर्तन सुरू असतानाही आपण बाहेर येऊन का बसलात ? तेव्हा रामराया म्हणाले, कीर्तनकार सांगत होते आणि लोक त्यांच्या पाठोपाठ म्हणत होते, 'ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे , त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे.' सगळ्यांचं मन कीर्तन सोडून बाहेर काढलेल्या चपलांवर होतं , म्हणून मी इथे राखण करत बसलोय् !

हा प्रसंग जरी काल्पनिक असला, तरी त्यातून मार्मिक वास्तव दिसून येते. ते वास्तव म्हणजे, आपले मन पारमार्थिक विषयात नसून व्यावहारिक विषयात गुंतून राहते. त्यातून मन सोडवण्यासाठी रामरायाला शरण जाऊन सांगूया... 

कल्याण करी रामराया...!