शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

'देव देव्हाऱ्यात नाही' अशी एकदा स्थिती झाली, तेव्हा हनुमंताला रामराय कुठे भेटले पहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 08:00 IST

आपले मन पारमार्थिक विषयात नसून व्यावहारिक विषयात गुंतून राहते. त्यातून मन सोडवण्यासाठी रामरायाला शरण जाऊया.

देवाचा शोध आपण सगळेच घेत असतो, पण तो सगळ्यांनाच सापडतो असे नाही. तो सापडतो ते केवळ भक्तांना. त्यातही तो भक्त हनुमानासारखा असेल, तरच तो लगेच भेटतो आणि भक्तांशी संवाद साधतो. असाच एक गमतीदार पण मार्मिक प्रसंग पहा. 

एकदा मारूतीराय आकाशातून जात असता , त्यांचं खाली लक्ष गेलं. त्यांना दिसलं की एका देवळात कीर्तन चालू होतं आणि रामराय मात्र देवळाबाहेर बसले होते. जवळच लोकांच्या चपलांचा ढीग होता. मारूतीराय लगबगीने खाली उतरले. रामरायांना विचारलं, रामराया, आत एवढे सुंदर कीर्तन सुरू असतानाही आपण बाहेर येऊन का बसलात ? तेव्हा रामराया म्हणाले, कीर्तनकार सांगत होते आणि लोक त्यांच्या पाठोपाठ म्हणत होते, 'ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे , त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे.' सगळ्यांचं मन कीर्तन सोडून बाहेर काढलेल्या चपलांवर होतं , म्हणून मी इथे राखण करत बसलोय् !

हा प्रसंग जरी काल्पनिक असला, तरी त्यातून मार्मिक वास्तव दिसून येते. ते वास्तव म्हणजे, आपले मन पारमार्थिक विषयात नसून व्यावहारिक विषयात गुंतून राहते. त्यातून मन सोडवण्यासाठी रामरायाला शरण जाऊन सांगूया... 

कल्याण करी रामराया...!