शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'देव देव्हाऱ्यात नाही' अशी एकदा स्थिती झाली, तेव्हा हनुमंताला रामराय कुठे भेटले पहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 08:00 IST

आपले मन पारमार्थिक विषयात नसून व्यावहारिक विषयात गुंतून राहते. त्यातून मन सोडवण्यासाठी रामरायाला शरण जाऊया.

देवाचा शोध आपण सगळेच घेत असतो, पण तो सगळ्यांनाच सापडतो असे नाही. तो सापडतो ते केवळ भक्तांना. त्यातही तो भक्त हनुमानासारखा असेल, तरच तो लगेच भेटतो आणि भक्तांशी संवाद साधतो. असाच एक गमतीदार पण मार्मिक प्रसंग पहा. 

एकदा मारूतीराय आकाशातून जात असता , त्यांचं खाली लक्ष गेलं. त्यांना दिसलं की एका देवळात कीर्तन चालू होतं आणि रामराय मात्र देवळाबाहेर बसले होते. जवळच लोकांच्या चपलांचा ढीग होता. मारूतीराय लगबगीने खाली उतरले. रामरायांना विचारलं, रामराया, आत एवढे सुंदर कीर्तन सुरू असतानाही आपण बाहेर येऊन का बसलात ? तेव्हा रामराया म्हणाले, कीर्तनकार सांगत होते आणि लोक त्यांच्या पाठोपाठ म्हणत होते, 'ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे , त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे.' सगळ्यांचं मन कीर्तन सोडून बाहेर काढलेल्या चपलांवर होतं , म्हणून मी इथे राखण करत बसलोय् !

हा प्रसंग जरी काल्पनिक असला, तरी त्यातून मार्मिक वास्तव दिसून येते. ते वास्तव म्हणजे, आपले मन पारमार्थिक विषयात नसून व्यावहारिक विषयात गुंतून राहते. त्यातून मन सोडवण्यासाठी रामरायाला शरण जाऊन सांगूया... 

कल्याण करी रामराया...!