शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

ॐ नमो सद्‍गुरु वसंतू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 16:31 IST

  वसंत ॠतु येण्यात आहे. वसंत आला की, कवि मन विभोर होऊन गाऊ लागते.

सदगुरु वसंंत  वसंत ॠतु येण्यात आहे. वसंत आला की, कवि मन विभोर होऊन गाऊ लागते.                         आला वसंत ऋतु आला                 वसुंधरेला हसवायाला               सजवित नटवित लावण्याला                आला वसंत ऋतु आला               रसरंगाची करीत उधळण               मधुगंधाची करीत शिंपण                 चैतन्याच्या गुंफित माला                     रसिकराज पातला                   आला वसंत ऋतु आला                     वृक्षलतांचे देह बहरले                  फुलाफुलांतून अमृत भरले        वनावनांतून गाऊ लागल्या पंचमात कोकिला                      आला वसंत ऋतु आला 

मार्गशीर्ष पौष संपला की शिशीराची गोठवणारी थंडी वृक्ष तरुंना पर्णविरहित विरळ करुन जाते. अवघी प्रकृती जणु गारठून स्वतःच स्वतःला कवेत घेवून उब घेऊ पाहते.मग वसंताची चाहूल सुरु होते. आम्रवृक्ष मोहरुन येतो.  निंंब सळसळू लागतो. अश्वस्थ वटाला तजेला येतो. कोकीळेला कंठ फुटतो. सृष्टी जणु चारी बाजुने आल्हादित होते. असा हा ॠतुराज वसंत येतो आणि दोन महिने का होईना, या काळात सृष्टीचे सौंदर्य जीवनात किती आनंददायी व उल्हासित करणारे असते ते कळते. परंतुजीवनातील असे क्षण हे काही दिवसांचे असतात.  वसंत येतो व तसाच जातो.  परंतु एक वसंत आहे जो आला की मग कधीही जात नाही. हा वसंत आहे सदगुरुनाथ. या वसंतबद्दल श्री संत एकनाथ महाराज म्हणतात,       ॐ नमो सद्‍गुरु वसंतू । ऐक्यकाळीं तुझा ऋतू ।         तया ऋतुकाळींचा मारुतू । ज्ञानवनांतू जैं रिघे ॥         तैं अविद्येचीं जुनीं पानें । गळूनि जाती तत्क्षणें ।           नवपल्लवीं विराजमानें । विरक्तपणें आरक्त ॥

भाग्यवान तो मनुष्य ज्याचे जीवनात सदगुरु वसंत येतो.त्याची जन्मोजन्मीची तृष्णा, जन्मोजन्मीची प्रार्थना, जन्मोजन्मीची आर्तता  की सदगुरु वसंताचे त्याचे जीवनात आगमन होते.  असा सदगुरु वसंत ज्याचे जीवनात येतो तेव्हा त्या भाग्यवंत शिष्याचे जीवन आनंद गंधाने कसे मोहरुन जाते हे तोच जाणतो. संत एकनाथ महाराज म्हणतात,                ओंकार स्वरुपा सदगुरुनाथा तुम्हाला नमन आहे. तुम्हीच खर्‍या अर्थाने सदा सर्वकाळचे वसंत ॠतु आहात. जीवा शिवाचे ऐक्याचे काळीच तो शिष्याचे अनुभवास येतो.  तुमच्या वसंतकाळीचा आनंद गंधीत वायु जेव्हां ज्ञान वनातून वाहू लागतो, तेव्हां अज्ञानाची जीर्ण पाने तत्क्षण गळून पडतात व ज्ञानाचे नवपल्लव उदयाला येतात जे विरक्तीचे रंगाने आरक्त होऊन प्रकाशतात.              ज्यांनीही आपले जीवनात हा ज्ञानरुपी वसंत अनुभवला, त्यांचे जीवनात पुन्हा शिशीर नाही आला. वसंत ॠतुनंतर ग्रिष्म येतो. पण या वसंतॠतु पुढे ग्रिष्मही नाही. मागचा शिशीर गेला व पुढचा ग्रिष्म संपला. आपल्या अस्तित्वाला गोठवणारा भयाचा शिशीर गेला तर काम क्रोधाची तप्तता देणारा ग्रिष्मही संपला.  जसा वसंत ॠतु आला की वृक्ष वेलींवर फुले उमलतात,  तशी सदगुरु वसंतामुळे आनंदाची फुले उमलतात व त्याचा गंध इतरांना मिळू लागतो. पळस जसा भगव्या वैराग्य रंगाने तळपतो तसा वैराग्याचे रंगाने भक्तावरची चैतन्याची आभा खुलते. मनरुपी भ्रमर आता सदगुरुचे नावांचे गुंजन करु लागतेा. असा वसंतरुपी सदगुरु जगी सर्वांना लाभो.                       सदगुरु श्री गजानन महाराज  सर्व भक्तजनाचें मनवनी ज्ञानरुपी वसंतरुपाने अखंड राहो.     अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगीराज            परब्रह्म सच्चिदानंद समर्थ सदगुरू                श्री गजानन महाराज की जयसदगुरु श्री संत एकनाथ महाराज चरणी श्रध्दा नमन !

 

- शं.ना.बेंडे पाटील अकोला.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक