शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

ॐ नमो सद्‍गुरु वसंतू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 16:31 IST

  वसंत ॠतु येण्यात आहे. वसंत आला की, कवि मन विभोर होऊन गाऊ लागते.

सदगुरु वसंंत  वसंत ॠतु येण्यात आहे. वसंत आला की, कवि मन विभोर होऊन गाऊ लागते.                         आला वसंत ऋतु आला                 वसुंधरेला हसवायाला               सजवित नटवित लावण्याला                आला वसंत ऋतु आला               रसरंगाची करीत उधळण               मधुगंधाची करीत शिंपण                 चैतन्याच्या गुंफित माला                     रसिकराज पातला                   आला वसंत ऋतु आला                     वृक्षलतांचे देह बहरले                  फुलाफुलांतून अमृत भरले        वनावनांतून गाऊ लागल्या पंचमात कोकिला                      आला वसंत ऋतु आला 

मार्गशीर्ष पौष संपला की शिशीराची गोठवणारी थंडी वृक्ष तरुंना पर्णविरहित विरळ करुन जाते. अवघी प्रकृती जणु गारठून स्वतःच स्वतःला कवेत घेवून उब घेऊ पाहते.मग वसंताची चाहूल सुरु होते. आम्रवृक्ष मोहरुन येतो.  निंंब सळसळू लागतो. अश्वस्थ वटाला तजेला येतो. कोकीळेला कंठ फुटतो. सृष्टी जणु चारी बाजुने आल्हादित होते. असा हा ॠतुराज वसंत येतो आणि दोन महिने का होईना, या काळात सृष्टीचे सौंदर्य जीवनात किती आनंददायी व उल्हासित करणारे असते ते कळते. परंतुजीवनातील असे क्षण हे काही दिवसांचे असतात.  वसंत येतो व तसाच जातो.  परंतु एक वसंत आहे जो आला की मग कधीही जात नाही. हा वसंत आहे सदगुरुनाथ. या वसंतबद्दल श्री संत एकनाथ महाराज म्हणतात,       ॐ नमो सद्‍गुरु वसंतू । ऐक्यकाळीं तुझा ऋतू ।         तया ऋतुकाळींचा मारुतू । ज्ञानवनांतू जैं रिघे ॥         तैं अविद्येचीं जुनीं पानें । गळूनि जाती तत्क्षणें ।           नवपल्लवीं विराजमानें । विरक्तपणें आरक्त ॥

भाग्यवान तो मनुष्य ज्याचे जीवनात सदगुरु वसंत येतो.त्याची जन्मोजन्मीची तृष्णा, जन्मोजन्मीची प्रार्थना, जन्मोजन्मीची आर्तता  की सदगुरु वसंताचे त्याचे जीवनात आगमन होते.  असा सदगुरु वसंत ज्याचे जीवनात येतो तेव्हा त्या भाग्यवंत शिष्याचे जीवन आनंद गंधाने कसे मोहरुन जाते हे तोच जाणतो. संत एकनाथ महाराज म्हणतात,                ओंकार स्वरुपा सदगुरुनाथा तुम्हाला नमन आहे. तुम्हीच खर्‍या अर्थाने सदा सर्वकाळचे वसंत ॠतु आहात. जीवा शिवाचे ऐक्याचे काळीच तो शिष्याचे अनुभवास येतो.  तुमच्या वसंतकाळीचा आनंद गंधीत वायु जेव्हां ज्ञान वनातून वाहू लागतो, तेव्हां अज्ञानाची जीर्ण पाने तत्क्षण गळून पडतात व ज्ञानाचे नवपल्लव उदयाला येतात जे विरक्तीचे रंगाने आरक्त होऊन प्रकाशतात.              ज्यांनीही आपले जीवनात हा ज्ञानरुपी वसंत अनुभवला, त्यांचे जीवनात पुन्हा शिशीर नाही आला. वसंत ॠतुनंतर ग्रिष्म येतो. पण या वसंतॠतु पुढे ग्रिष्मही नाही. मागचा शिशीर गेला व पुढचा ग्रिष्म संपला. आपल्या अस्तित्वाला गोठवणारा भयाचा शिशीर गेला तर काम क्रोधाची तप्तता देणारा ग्रिष्मही संपला.  जसा वसंत ॠतु आला की वृक्ष वेलींवर फुले उमलतात,  तशी सदगुरु वसंतामुळे आनंदाची फुले उमलतात व त्याचा गंध इतरांना मिळू लागतो. पळस जसा भगव्या वैराग्य रंगाने तळपतो तसा वैराग्याचे रंगाने भक्तावरची चैतन्याची आभा खुलते. मनरुपी भ्रमर आता सदगुरुचे नावांचे गुंजन करु लागतेा. असा वसंतरुपी सदगुरु जगी सर्वांना लाभो.                       सदगुरु श्री गजानन महाराज  सर्व भक्तजनाचें मनवनी ज्ञानरुपी वसंतरुपाने अखंड राहो.     अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगीराज            परब्रह्म सच्चिदानंद समर्थ सदगुरू                श्री गजानन महाराज की जयसदगुरु श्री संत एकनाथ महाराज चरणी श्रध्दा नमन !

 

- शं.ना.बेंडे पाटील अकोला.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक