शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

दत्तजयंती आणि मार्गशीर्ष महिन्याच्या निमित्ताने गुरुचरित्रातील ४१ व्या अध्यायातील काशीयात्रा, घरबसल्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 17:21 IST

गुरुचरित्रामध्ये ४१ व्या अध्यायात, अवधूत रूपातील तपस्व्याने त्वष्टाब्रम्हापुत्र ब्रह्मचारी या भक्ताला काशीयात्रा कशी करावी याचे मार्गदर्शन केले आहे. सुरुवात कुठून कशी करावी, कुठल्या तीर्थात स्नान करावे, देवांचे दर्शन कशा क्रमाने घ्यावे हे तपशीलवार सांगितले आहे.

मकरंद करंदीकर 

जगातील सर्व धर्मांमध्ये तीर्थयात्रेला खूप महत्व आहे. पूर्वी ते एकमेव पर्यटन होते. जगातील सर्वात जुन्या हिंदू धर्मामध्ये काशीयात्रेला खूप महत्व होते. अत्यंत कष्टाचा आणि जिकिरीचा प्रवास असायचा. चोर, श्वापदे, आजारपण, रोगाची साथ अशी अनेक संकटे येत असत. यात्रेला गेलेली कांही मंडळी परत येतच नसत. काशीयात्रा ही खूप पवित्र मानली जात असे. तेथून परत आल्यावर यात्रा करणाऱ्यांच्या सर्वजण पाया पडत असत.  

हेही वाचा : श्रीगुरुचरित्र वाचनापूर्वी जाणून घ्या श्रीगुरुचरित्राची महती, महत्त्व आणि पारायणासंबंधी सविस्तर माहिती.

आता दत्तजयंतीच्या निमित्ताने लाखो भक्त गुरुचरित्राचे पारायण करतात. या गुरुचरित्रामध्ये ४१ व्या अध्यायात, अवधूत रूपातील तपस्व्याने त्वष्टाब्रम्हापुत्र ब्रह्मचारी या भक्ताला काशीयात्रा कशी करावी याचे मार्गदर्शन केले आहे. सुरुवात कुठून कशी करावी, कुठल्या तीर्थात स्नान करावे, देवांचे दर्शन कशा क्रमाने घ्यावे हे तपशीलवार सांगितले आहे. एका स्थानावरून निघून विविध दर्शनांनंतर पुन्हा मूळ ठिकाणी येऊन नंतर दुसऱ्या दिशेला जायचे. पंचक्रोशी यात्रा, मासिक यात्रा, दैनिक यात्रा असे सर्व तपशीलवार सांगितले आहे. त्यामध्ये शेकडो पवित्र स्थानांचा उल्लेख आहे. 

भारतात हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या विदेशी आक्रमक लुटारूंनी यातील अनेक मंदिरे उध्वस्त केली, तोडली, गाडून टाकली. नंतर रस्ता रुंदीकरण, पुनर्निमाण अशा नावाखालीही अनेक मंदिरे नाहीशी झाली. आजच्या घडीला फार थोडी मंदिरे बाकी आहेत. गुरुचरित्रातील उल्लेख आणि क्रम यानुसार मी त्या काळातील सर्व देवस्थानांची, देवांची यादी केली आहे. यात्रेची पद्धत, प्रकार यामुळे एकेका स्थानाचा अनेकदा किंवा लागोपाठ उल्लेख आहे. कांही वेळा एकाच देवाचा वेगवेगळ्या प्रकारे उल्लेख आहे. कांही ठिकाणांचा खुलासा अध्यायाच्या खाली दिलेल्या टीपांमध्ये आढळतो. हा सर्व तपशील ध्यानात घेऊन, शक्य तितकी अचूक यादी करण्याचा हा प्रयत्न आहे. ज्या तीर्थात, सरोवरात  स्नान करायला सांगितले आहे त्या तीर्थांचा उल्लेख मी केलेला नाही. केवळ जेथे पूजा, वंदन, प्रार्थना, अभिषेक करण्यास सांगितले आहे त्यांचा उल्लेख केला आहे. 

आज आपण तेथे जाऊ शकत नाही. गेलो तर अनेक स्थानेच अस्तित्वात नाहीत. त्यामुळे माझी अशी श्रद्धा आहे की आपण या देवदेवतांना घरी बसूनही वंदन करू शकतो. यात्रेच्या शेवटी अवधूतरूपी सिद्धयोग्यांनी ब्रह्मचारी भक्ताला  स्वतःच्या नावाने एका लिंगाची स्थापना करण्यास सांगितले आहे. आपण इतके मोठे तपस्वी नाही. तरीही एक भक्त म्हणून शेवटी आपल्या नावाने एका ईश्वराचे स्मरण करणे हे मला खूप आनंददायी वाटले. केवळ या सर्व नावांच्या स्मरणाने या मार्गशीर्ष महिन्यात, दत्तजयंतीच्या निमित्ताने एक काशीस्मरण यात्रा घडेल असे ज्यांना वाटते त्यांच्यासाठी ! 

।। श्री गुरुदेव दत्त ।।

हेही वाचा: श्रीगुरुचरित्र वाचनाचे वेळी आवर्जून पाळावेत असे, २० नियम व पथ्ये!