शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मना सज्जना भक्ती पंथेची जावे..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 16:45 IST

बंध मोक्षाचे खरे कारण तर मनंच आहे. मन विषयासक्त झाले असता बंधन प्राप्त होते आणि निर्विषय झाले की मोक्ष मिळतो. संसार बंधनांत अडकलेल्या या मनाला मुक्त करावयाचे असेल तर, भक्तीच्याच मार्गाने जावे लागेल..!

- युवा कीर्तनकार ऋतुपर्ण भरत बुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र ) 

मना सज्जना भक्तिपंथेचि जावे । तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ।जनी निंद्य ते सर्व सोडूनि द्यावे । जनी वंद्य ते सर्वभावे करावे ॥

मन जर भक्तिच्या मार्गाने गेले तरच या देहाला श्रीहरिची प्राप्ती होईल. आपल्याला प्रश्न पडेल की, भक्तीचा आणि मनाचा काय संबंध..? तर योगवासिष्ठकर या प्रश्नाचे यथार्थ उत्तर देतात -

मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयोः ।बंधाय विषयासक्तं मुक्त्यैर्निविषयं मनः ॥

बंध मोक्षाचे खरे कारण तर मनंच आहे. मन विषयासक्त झाले असता बंधन प्राप्त होते आणि निर्विषय झाले की मोक्ष मिळतो.संसार बंधनांत अडकलेल्या या मनाला मुक्त करावयाचे असेल तर, भक्तीच्याच मार्गाने जावे लागेल. मन जर भक्तीपंथाला लागले तर संकल्परहित होऊन जाईल आणि मन एकदा संकल्प संकल्पशून्य झाले की, संसार आपोआप नाहिसा होईल आणि जिथे संसारच संपला तिथे बंधन कसले..?ज्ञानराज माऊली बहारीचं वर्णन करते -

जेथ हे संसार चित्र उमटे । तो मनोरुप पटू फाटे ।जैसे सरोवर आहे । मग प्रतिमा नाही ॥

ज्याप्रमाणे सरोवर आटले की त्यात पडलेले प्रतिबिंब आपोआप नाहिसे होते त्याप्रमाणे एकदा का मन भक्तिमार्गाला प्रवृत्त झाले की, संकल्पविकल्परहित होते आणि मन असे संकल्पविकल्परहित झाले की, संसार आपोआप नाहिसा होतो.श्रीसमर्थ रामदास स्वामी वरील श्लोकांत तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे असे म्हणतात यांत स्वभावे म्हणजे सहज, अनायासे, आपोआप असाच अर्थ आहे. याठिकाणी मनालाच उपदेश करण्याचे कारण असे की, सर्व इंद्रियांवर सत्ता गाजविणारे मनच आहे. कोणतेही सद्कर्म किंवा असद्कर्म इंद्रियांकडून घडण्याच्या आधी ते कर्म ग्राह्य किंवा अग्राह्य हे मनानेच ठरविले जाते आणि मगच ते कर्म इंद्रियांकडून घडते.तुकाराम महाराज म्हणतात -

आधी मन घेई हाती । गणराज गणपती ॥मन इंद्रियांचा राजा । त्याची सर्वभावे पूजा ॥

किंवा

मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धींचे कारण ॥

या सर्व संत प्रमाणांवरुन एकच गोष्ट निश्चित होते की, देहाकडून देवाकडे जाण्यासाठी जर मनाचे साह्य नसेल तर भक्तिमार्गाची वाटचाल अशक्य आहे..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी 87 93 03 03 03 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक