शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

मना सज्जना भक्ती पंथेची जावे..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 16:45 IST

बंध मोक्षाचे खरे कारण तर मनंच आहे. मन विषयासक्त झाले असता बंधन प्राप्त होते आणि निर्विषय झाले की मोक्ष मिळतो. संसार बंधनांत अडकलेल्या या मनाला मुक्त करावयाचे असेल तर, भक्तीच्याच मार्गाने जावे लागेल..!

- युवा कीर्तनकार ऋतुपर्ण भरत बुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र ) 

मना सज्जना भक्तिपंथेचि जावे । तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ।जनी निंद्य ते सर्व सोडूनि द्यावे । जनी वंद्य ते सर्वभावे करावे ॥

मन जर भक्तिच्या मार्गाने गेले तरच या देहाला श्रीहरिची प्राप्ती होईल. आपल्याला प्रश्न पडेल की, भक्तीचा आणि मनाचा काय संबंध..? तर योगवासिष्ठकर या प्रश्नाचे यथार्थ उत्तर देतात -

मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयोः ।बंधाय विषयासक्तं मुक्त्यैर्निविषयं मनः ॥

बंध मोक्षाचे खरे कारण तर मनंच आहे. मन विषयासक्त झाले असता बंधन प्राप्त होते आणि निर्विषय झाले की मोक्ष मिळतो.संसार बंधनांत अडकलेल्या या मनाला मुक्त करावयाचे असेल तर, भक्तीच्याच मार्गाने जावे लागेल. मन जर भक्तीपंथाला लागले तर संकल्परहित होऊन जाईल आणि मन एकदा संकल्प संकल्पशून्य झाले की, संसार आपोआप नाहिसा होईल आणि जिथे संसारच संपला तिथे बंधन कसले..?ज्ञानराज माऊली बहारीचं वर्णन करते -

जेथ हे संसार चित्र उमटे । तो मनोरुप पटू फाटे ।जैसे सरोवर आहे । मग प्रतिमा नाही ॥

ज्याप्रमाणे सरोवर आटले की त्यात पडलेले प्रतिबिंब आपोआप नाहिसे होते त्याप्रमाणे एकदा का मन भक्तिमार्गाला प्रवृत्त झाले की, संकल्पविकल्परहित होते आणि मन असे संकल्पविकल्परहित झाले की, संसार आपोआप नाहिसा होतो.श्रीसमर्थ रामदास स्वामी वरील श्लोकांत तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे असे म्हणतात यांत स्वभावे म्हणजे सहज, अनायासे, आपोआप असाच अर्थ आहे. याठिकाणी मनालाच उपदेश करण्याचे कारण असे की, सर्व इंद्रियांवर सत्ता गाजविणारे मनच आहे. कोणतेही सद्कर्म किंवा असद्कर्म इंद्रियांकडून घडण्याच्या आधी ते कर्म ग्राह्य किंवा अग्राह्य हे मनानेच ठरविले जाते आणि मगच ते कर्म इंद्रियांकडून घडते.तुकाराम महाराज म्हणतात -

आधी मन घेई हाती । गणराज गणपती ॥मन इंद्रियांचा राजा । त्याची सर्वभावे पूजा ॥

किंवा

मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धींचे कारण ॥

या सर्व संत प्रमाणांवरुन एकच गोष्ट निश्चित होते की, देहाकडून देवाकडे जाण्यासाठी जर मनाचे साह्य नसेल तर भक्तिमार्गाची वाटचाल अशक्य आहे..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी 87 93 03 03 03 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक