शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

Makarsankranti 2021: संक्रांतीला तीळगूळ देणे आणि पतंग उडवणे, यामागील शास्त्रीय आणि धार्मिक कारणे वाचा.

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 9, 2021 12:54 IST

Makarsankranti 2021: निसर्ग ऋतुनुसार फळ व वनस्पती देतो. ज्या ऋतूत ज्या प्रकारचे रोग होण्याची संभावना असते, त्या ऋतूत त्या रोगानुसार औषध वनस्पती, फळे वगैरे निसर्ग निर्माण करतो.

संक्रांतीचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या उत्सवाला मकर संक्रात म्हणतात. सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो. तो सहजतेने उत्तरेकडे सरकत जात असतो. म्हणून त्या काळाला उत्तरायण म्हणतात. या उत्सवाचे सांस्कृतिकदृष्ट्या आगळे महत्त्व आहे. 

हेही वाचा : Makarsankranti 2021 : पूर्वी मकरसंक्रांतीला गुप्तदान केले जात असे, कसे ते पहा!

निसर्ग ऋतुनुसार फळ व वनस्पती देतो. ज्या ऋतूत ज्या प्रकारचे रोग होण्याची संभावना असते, त्या ऋतूत त्या रोगानुसार औषध वनस्पती, फळे वगैरे निसर्ग निर्माण करतो. हिवाळ्यातील कडक थंडीत शरीराचा अवयव अन अवयव आखडून गेलेला असता़े  रक्ताभिसरण मंद होण्याची शक्यता असते. रक्तवाहिन्यांवर थंडीचा परिणाम झालेला असतो. शरीर रुक्ष झालेले असते. अशावेळी त्याला स्निग्धतेची गरज असते आणि तीळात हा स्निग्धतेचा गुण आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने तीळ या ऋतुतील आदर्श खाद्याची गरज पूर्ण करतात. शेतातून ताजे तीळ घरात आलेले असतात. त्यावेळी शुष्क बनणाऱ्या शरीरासाठी याहून अधिक दुसरे योग्य औषध कोणते असू शकते?

तसेच मकरसंक्रांतीला पतंग उडवण्याचीही प्रथा आहे. त्याच्या पाठीमागेही विशिष्ट अर्थ आहे. सामान्यरित्या पतंग उडवण्यासाठी मोकळ्या मैदानात, एखाद्या इमारतीच्या छपरावर किंवा आगाशीत जावे लागते. त्यामुळे थंडीच्या दिवसात सूर्यस्नान घडते.

 

यामागील आध्यात्मिक अर्थ उलगडून सांगताना पांडुरंगशास्त्री आठवले म्हणतात, `तात्विक दृष्टीने पाहता, आपल्या जीवनाचा पतंगही या विश्वामागे असलेली अदृश्य शक्ती एखाद्या अज्ञात आगाशीत उभी राहून उडवीत असते. संक्रांतीच्या दिवशी जसे आकाशात लाल, पिवळे, हिरवे रंगाचे पतंग उडताना दिसतात, तसे या विश्वाच्या विशाल आकाशात सत्ताधीश, श्रीमंत, विद्वान वगैरे अनेक प्रकारचे पतंग उडत असतात. पतंगाची हस्ती (अस्तित्व) व मस्ती तोपर्यंत राहते, जोपर्यंत त्याची दोरी सूत्रधाराच्या हाती असते. सूत्रधाराच्या हातून सुटलेला पतंग वृक्षाच्या डहाळीवर, वीजेच्या तारेवर किंवा संडासाच्या टाकीवर फाटलेला व विदृप दशेत पडलेला दिसतो. भगवंताच्या हातून सुटलेला मानव पतंगही थोड्याच दिवसात रंग उतरलेला, फिक्का व अस्वस्थ झालेला पाहायला मिळतो.'

या पर्वाच्या निमित्ताने सूर्याचा प्रकाश, तीळाचा स्नेह, गुळाचा गोडवा, पतंगाचा त्याच्या सूत्रधारावर विश्वास आपल्या जीवनात साकार झाला, तरच आपल्या जीवनात योग्य संक्रमण झाले, असे म्हणता येईल.

हेही वाचा : Makarsankranti 2021: उत्तरायणात मृत्यू यावा, अशी हिंदू करतात प्रार्थना; भीष्माचार्यांनीदेखील उत्तरायणात सोडले होते प्राण!

टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांती