शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

महानंदा नावाच्या वारांगनेची परीक्षा घेण्यासाठी महादेव सौदागर रूपात अवतरले आणि...

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: February 8, 2021 09:00 IST

भक्त आपला आणि सर्वांचा उद्धार कसा करतात, हे सांगणारी शिवभक्ताची कथा!

काश्मीरमधील नंदीग्रामात महानंदा नावाची वारांगना राहत असे. त्या गावात तिचे राजासारखे ऐश्वर्य होते. ती अत्यंत रूपवान व सुलक्षणी होती. ती नृत्यगायनात प्रवीण होती. लहानपणापासून ती शिवाची भक्ती करीत असे. तिने आपल्या नृत्यागारात शिवलिंग ठेवले होते. ऐन तारुण्यातसुद्धा सोमवार, प्रदोष, महाशिवरात्री ही व्रते ती आचरित असे. रोज लक्ष बेल वाहून शंकराची ती पूजा करीत असे. प्रतिसोमवारी ब्राह्मणांकडून शिवाला अभिषेक करवित असे. श्रावण महिन्यात कोटी लिंगार्चन करण्याचा तिचा नियम होता. अतिथीना जे इच्छित ते ती पुरवीत असे. तिने आपल्याकडील पाळीव कोंबडी आणि माकडाला नृत्य शिकवले होते. ती त्यांना रोज स्नान घालून विभुती लावत असे. तिने त्यांच्या गळ्यात रुद्राक्षांच्या माळा घातल्या होत्या. त्या दोघांना नेहमी ती आपल्या नृत्यागारात बांधून ठेवी. 

महानंदा जरी वारांगना होती, तरी ती आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक होती. म्हणजे एखाद्या पुरुषाला तीन दिवस अगर सात दिवस आपल्या घरी प्रवेश करण्यास तिने अनुमती दिली तर त्या अवधीत ती दुसऱ्या पुरुषाकडे पाहत नसे. 

तिच्या भक्तीची परीक्षा पाहण्यासाठी एके दिवशी शंकर सौदागराच्या वेषाने तिच्याकडे आले. दारात आलेल्या अतिथीचा यथायोग्य सत्कार करून तिने त्यांचे कुशल विचारले. त्या सौदागराच्या हाताला रत्नजडित कांकण होते. त्याकडे महानंदाचे सहज लक्ष गेले. ते जाणून सौदागराने महानंदेला ते कांकण दिले.  ते मिळाल्यावर महानंदेला मोठी धन्यता वाटली. तिच्या आग्रहावरून सौदागराने तीन दिवस तिच्या घरी राहण्याची कबुली दिली. त्यावर त्याने आपल्या जवळची शिवपिंडी महानंदेजवळ दिली आणि `हे माझे प्राणलिंग आहे. हे तू जिवापलीकडे जतन केले पाहिजे. मी निघतेवेळी ते परत घेऊन जाईन', असे सांगितले. त्याप्रमाणे, 'हे लिंग हरवले किंवा भंगले तर मला अग्निकाष्ठ भक्षण करावे लागेल. म्हणून तू शक्यतो दक्षता राख' असेही बजावले. 

महानंदेने ती पिंडी आपल्या नृत्यागारात नेऊन ठेवली आणि सौदागराच्या सेवेत ती तत्पर राहिली. शंकरांच्या आज्ञेवरून अग्निनारायणाने नृत्यागरात प्रवेश केला. तोच चहुकडून लोक `आग लागली, आग विझवा' असे म्हणत ओरडू लागले. ते ऐवूâन महानंदा खडबडून जागी झाली. तिचे हातपाय लटपटू लागले. कसेबसे जाऊन तिने पाळीव कोंबड्याला आणि माकडाला मुक्त केले. थोड्या वेळात नृत्यशाळा जळून भस्म झाली.

इतक्यात सौदागर उठला आणि त्याने `माझे दिव्यलिंग सुरक्षित आहे ना? असा महानंदेला प्रश्न केला. तेव्हा ती थरथर कापू लागली. हात जोडत म्हणाली, 'स्वामी, लिंग भस्म झाले.' 

तेव्हा सौदागर म्हणाला, 'आज माझ्या मुक्कामाचा दुसरा दिवस. लिंग भस्म झाले असे म्हणतेस त्या अर्थी क्षणाचाही विलंब न लावता मला माझे पुढचे काम करावे लागेल' असे म्हणून त्याने अग्निकुंड तयार करून ऊँ नम: शिवाय म्हणत त्यात उडी टाकली. ते दृष्य पाहताच महानंदेनेही अग्निकाष्ठ भक्षण केले. 

तोच अग्नि शांत झाला आणि महानंदेसह शंकर अग्निकुंडातून वर आले. शंकर म्हणाले, `महानंदे, तुझी परीक्षा पहाण्यासाठी मी सौदागर होऊन आलो होतो. तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे. `इच्छित वर माग!' तेव्हा महानंदा हात जोडून म्हणाली, `महादेवा, हे सारे नगर  उद्धरून शिवलोकी न्यावे, यापेक्षा माझे दुसरे काहीच मागणे नाही.' शंकर तथास्तू म्हणाले. 

अशा तऱ्हेने महानंदेने एक वारांगना असूनही केवळ भक्तीच्या बळावर स्वत:चा आणि इतरांचा उद्धार करून घेतला व शिवकृपा प्राप्त केली.