शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

जीवनाचा ‘आस’ स्थिर हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 04:16 IST

काळासोबत चालायला शिकलं पाहिजे असे म्हणतात आणि ते खरंही आहे. काही ज्ञानशाखा कालौघात लुप्त झाल्या. पुढच्या पिढीला ते ज्ञान आज ठाऊक नाही.

- बा. भो. शास्त्रीप्रत्येक युगाचा एक धर्म व अधर्मही असतो. धर्म सिद्धांत अढळ असतात. आचारसंहितेत विचाराला अनुसरून कालपरत्वे परिवर्तन होत असतं. ऋतुपरत्वे, वयपरत्वे आहार-विहार बदलतात. तसं आचाराचं मूळ स्वरूप तसेच ठेवून कालानुरूप थोडा बदल होत असतो. काळासोबत न चालणारे धर्म लुप्त झालेत. म्हणून काळासोबत चालायला शिकलं पाहिजे असे म्हणतात आणि ते खरंही आहे. काही ज्ञानशाखा कालौघात लुप्त झाल्या. पुढच्या पिढीला ते ज्ञान आज ठाऊक नाही. आचार हा जात्याच्या वरच्या पाळूसारखा फिरणारा असावा; पण खालची पाळू अधिष्ठान असते ती स्थिर असावी लागते. कारण ती विचाराची असते. विचाराचं फिरणं हा अधर्म आहे. बैलगाडीचं चाक फिरतं, ‘आस’ फिरत नाही. न फिरणारा आस जगभर फिरणाऱ्या चाकाचा आधार असतो. असाच जीवनमूल्यांचा सिद्धांत स्थिर असावा. पाण्यातली शीतलता, अग्नीतली दाहकता, भूमीचं जडत्व, हवेतली चंचलता व आकाशाची अलिप्तता हे धर्म जडभूतांनी सांभाळले आहेत. गाय मांस खात नाही अन् सिंह गवत खात नाही. हे पशूपण धर्मासी प्रामाणिक आहेत. माणूसच धरसोड करतो. त्याचं स्वभावावर नियंत्रण नाही. निसर्गाने वटवाघूळ, साप, झुरळ, किडे हा आहार सांगितला नाही. त्याचे अतिवाईट परिणाम आपण भोगत आहोत. भोगात भोग असतात तसे रोगही असतात. हेच आरोग्यशास्त्र जगाला सांगत आलं आहे. सृष्टीत विषय खूप आहेत; पण भोगण्याचे ज्ञान हजारात एखाद्याला आहे, म्हणून सदोष भोगापासून सावधान. आजच्या सूत्रात श्रीचक्रधर हेच सांगतात. ‘कलियुगी विखो आति परि विखया नाही’ आपल्याला वाटेल, राजे महाराजे यांच्याजवळ विषय असून वैद्यही असतात. ते पदार्थांचं योग्य सेवन करत असतील? यावर स्वामी म्हणतात, ते भुकेची पिडा दूर करतात. त्यात पोषणाचा विचार नसतो. ते केवळ संकोच फेडतात. त्यांना विषयाचा आनंद संपूर्ण घेता येत नाही. याचा अर्थ कलियुगात सर्वच इंद्रियाचे विषय भरपूर आहेत, पण भोक्ता नाही.