शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

जीवनाचा ‘आस’ स्थिर हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 04:16 IST

काळासोबत चालायला शिकलं पाहिजे असे म्हणतात आणि ते खरंही आहे. काही ज्ञानशाखा कालौघात लुप्त झाल्या. पुढच्या पिढीला ते ज्ञान आज ठाऊक नाही.

- बा. भो. शास्त्रीप्रत्येक युगाचा एक धर्म व अधर्मही असतो. धर्म सिद्धांत अढळ असतात. आचारसंहितेत विचाराला अनुसरून कालपरत्वे परिवर्तन होत असतं. ऋतुपरत्वे, वयपरत्वे आहार-विहार बदलतात. तसं आचाराचं मूळ स्वरूप तसेच ठेवून कालानुरूप थोडा बदल होत असतो. काळासोबत न चालणारे धर्म लुप्त झालेत. म्हणून काळासोबत चालायला शिकलं पाहिजे असे म्हणतात आणि ते खरंही आहे. काही ज्ञानशाखा कालौघात लुप्त झाल्या. पुढच्या पिढीला ते ज्ञान आज ठाऊक नाही. आचार हा जात्याच्या वरच्या पाळूसारखा फिरणारा असावा; पण खालची पाळू अधिष्ठान असते ती स्थिर असावी लागते. कारण ती विचाराची असते. विचाराचं फिरणं हा अधर्म आहे. बैलगाडीचं चाक फिरतं, ‘आस’ फिरत नाही. न फिरणारा आस जगभर फिरणाऱ्या चाकाचा आधार असतो. असाच जीवनमूल्यांचा सिद्धांत स्थिर असावा. पाण्यातली शीतलता, अग्नीतली दाहकता, भूमीचं जडत्व, हवेतली चंचलता व आकाशाची अलिप्तता हे धर्म जडभूतांनी सांभाळले आहेत. गाय मांस खात नाही अन् सिंह गवत खात नाही. हे पशूपण धर्मासी प्रामाणिक आहेत. माणूसच धरसोड करतो. त्याचं स्वभावावर नियंत्रण नाही. निसर्गाने वटवाघूळ, साप, झुरळ, किडे हा आहार सांगितला नाही. त्याचे अतिवाईट परिणाम आपण भोगत आहोत. भोगात भोग असतात तसे रोगही असतात. हेच आरोग्यशास्त्र जगाला सांगत आलं आहे. सृष्टीत विषय खूप आहेत; पण भोगण्याचे ज्ञान हजारात एखाद्याला आहे, म्हणून सदोष भोगापासून सावधान. आजच्या सूत्रात श्रीचक्रधर हेच सांगतात. ‘कलियुगी विखो आति परि विखया नाही’ आपल्याला वाटेल, राजे महाराजे यांच्याजवळ विषय असून वैद्यही असतात. ते पदार्थांचं योग्य सेवन करत असतील? यावर स्वामी म्हणतात, ते भुकेची पिडा दूर करतात. त्यात पोषणाचा विचार नसतो. ते केवळ संकोच फेडतात. त्यांना विषयाचा आनंद संपूर्ण घेता येत नाही. याचा अर्थ कलियुगात सर्वच इंद्रियाचे विषय भरपूर आहेत, पण भोक्ता नाही.