शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

वाघाच्या बछड्याला मिळालेला धडा कदाचित आपल्यालाही उपयोगी पडू शकतो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 17:41 IST

तुमच्या बाजूला नकारात्मक विचारांचे, द्वेष, मत्सर, कोत्या विचारांचे लांडगे असले, तर आपल्याला वाघासारखी डरकाळी फोडून आपल्या शक्तीची कल्पनाच येणार नाही.

एकदा एक वाघीण शिकारीला गेली. तिथे तिला लांडग्यांचा कळप दिसला. त्यातल्या एका लांडग्यावर झडप टाकून तिने त्याची शिकार केली. पण त्याच वेळेस तिचे पिल्लू दृष्टीआड झाले. ते लांडग्यांच्या कळपात गुडूप झाले आणि पुढे काही काळ त्यांच्यात राहू लागले. लांडग्यांनी त्याला त्रास दिला नाही, उलट त्याचा सांभाळ केला. त्यांच्यात राहून वाघिणीचे बछडे स्वतःला लांडगा समजू लागले. ते मोठे होत गेले. शरीर वाघाचे पण वृत्ती लांडग्यांची!

एक दिवस आणखी एका वाघाने त्या लांडग्यांच्या कळपावर हल्ला केला आणि त्यात त्याला हा तरुण वाघ दिसला. परंतु तोही जीव मुठीत घेऊन पळत होता. वाघाने बाकी लांडगे सोडून त्या वाघाला पकडले. तो वाघ गयावया करू लागला. त्यावेळेस शिकार करणाऱ्या वाघाने तरुण वाघाला नदीपाशी नेले आणि त्या पाण्यात प्रतिबिंब दाखवत म्हटले, तू कोण आहेस हे ओळख. लांडगा नाही तर तू वाघ आहेस वाघ! एकदा मोठ्य्याने डरकाळी दे, म्हणजे तुला तुझी खरी ओळख पटेल. असे म्हणत शिकारी वाघाने मोठी डरकाळी फोडली. ते पाहून तरुण वाघाने एक दोनदा घाबरत घाबरत डरकाळी फोडली. तिसऱ्यांदा मात्र त्याने जी गर्जना केली, तेव्हा त्याला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झाली. इतके दिवस आपण ज्यांच्या संपर्कात राहत होतो, त्याच्यात राहून माझी मनोवृत्ती सुद्धा तशीच घडली. माझे व्यक्तिमत्त्व तसे घडले. परंतु, ही माझी खरी ओळख नाही, हे जाणून घेत वाघाने शिकारी वाघाचे आभार मानले आणि नव्याने आयुष्य जगायला सुरुवात केली. 

म्हणूनच आपले ज्येष्ठ, गुरुजन, मार्गदर्शक आपल्यला नेहमी सुसंगतीत राहा असे सांगतात. तुमच्या बाजूला नकारात्मक विचारांचे, द्वेष, मत्सर, कोत्या विचारांचे लांडगे असले, तर आपल्याला वाघासारखी डरकाळी फोडून आपल्या शक्तीची कल्पनाच येणार नाही. म्हणून गर्दीमागे धावू नका. गर्दीची दिशा योग्य असेलच असे नाही. सारासार विचार करा आणि जे तुमच्या बुद्धीला पटेल, मनाला पटेल आणि शक्तीला झेपेल तेच करा आणि स्वतःची ओळख बनवा!